शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कोल्हापूर : ‘आरटीई’अतंर्गत पहिलीची २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 15:44 IST

‘आरटीई’ अंतर्गत सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता १ ली ची २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने सुरु आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांकडून आॅनलाईन अर्ज स्विकारण्यास बुधवार (दि.७) पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद (माध्यमिक)चे शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी शुक्रवारी येथे दिली.

ठळक मुद्दे‘आरटीई’अतंर्गत पहिलीची २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया सुरुआॅनलाईन अर्ज स्वीकारण्यास बुधवारपर्यंत मुदतवाढ : सुभाष चौगुले

कोल्हापूर : ‘आरटीई’ अंतर्गत सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता १ ली ची २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने सुरु आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांकडून आॅनलाईन अर्ज स्विकारण्यास बुधवार (दि.७) पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद (माध्यमिक)चे शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी शुक्रवारी येथे दिली.वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश व अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी २५ टक्के पर्यंतच्या जागा नजिकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे ‘आरटीई’ अंतर्गत बंधनकारक आहे.

या अंतर्गत सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता १ ली ची २५टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर आॅनलाईन चालू आहे. यासाठी पालकांकडून आॅनलाईन अर्ज स्विकारणेची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी पर्यंत होती. परंतु पालकांच्या मागणीनुसार बुधवार (दि.७) पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

कालावधीत सामाजिक वंचित घटक, आर्थिक दुर्बल घटक, घटस्फोटीत तसेच विधवा महिला, अनाथ, बालके, दिव्यांग बालके आदी घटकांतील मुलांच्या प्रवेशासाठी पालकांनी वरील लिंकवर अर्ज करावेत, असे आवाहन चौगुले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रत्येक तालुक्यात मदत केंद्रेप्रत्येक तालुक्यामध्ये मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. RTE Portal वर तसेच तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये मदत केंद्राची माहिती उपलब्ध आहे. तरी आॅनलाईन अर्ज करतेवेळी पालकांना कोणतीही समस्या आल्यास मदत केंद्रांशी संपर्क साधावा किंवा मदत केंद्रावरून आॅनलाईन अर्ज करावेत, असे आवाहनही चौगुले यांनी केले आहे.

 

टॅग्स :educationशैक्षणिकkolhapurकोल्हापूर