शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

कोल्हापूर : डेंग्यू रोखण्यास असमर्थ, मनपाविरुध्द शिवसेनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 17:02 IST

डेंग्यूला रोखण्यास महापालिका प्रशासन असमर्थ ठरल्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्या वतीने आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी निष्क्रिय अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणीही शिवसैनिकांनी केला.

ठळक मुद्दे डेंग्यू रोखण्यास असमर्थ, मनपाविरुध्द शिवसेनेची निदर्शनेआयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या

कोल्हापूर : शहरात गेल्या काही महिन्यापासून डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून महानगरपालिका प्रशासनाची निष्क्रीयता व ढोंगीपणाचे अनेक बळी गेले आहेत व शेकडो रुग्ण बाधित आहेत.

डेंग्यूला रोखण्यास महापालिका प्रशासन असमर्थ ठरल्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्या वतीने आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी निष्क्रिय अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणीही शिवसैनिकांनी केला.गेल्या काही महिन्यापासून कोल्हापूर शहरात डेंग्यू या भयानक रोगाने अक्षरश: दुमाकुळ घातला असून शेकडो जणांना त्याची बाधा झाली आहे. आठ रुग्ण दगावले आहेत. याला महानगरपालिका आरोग्य विभागाची यंत्रणाच जबाबदार आहे.

त्याच्या निषेधार्थ शिवसेने सोमवारी आधी महानगरपालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर निदर्शने केली. नंतर आयुक्त अभिजित चौधरी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या प्रश्नाकडे आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, आणि शहरातील नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.आयुक्त चौधरी यांनी शिवसैनिकांचे म्हणणे जाणून घेतले. आरोग्य विभागातर्फे स्वच्छता, औषध फवारणी, धूर फवारणी सातत्याने करणे आवश्यक आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयपणामुळे ही साथ पसरलेली आहे, त्या अधिकाऱ्यांना ताबडतोब बडतर्फ करावे, म्हणजे यंत्रणा कामाला लागेल, असे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आयुक्तांना सांगितले.

शहरात किमान दोन हजार रुग्णांना डेंग्यू झाला असून ते खासगी रुग्णालयातून उपचार घेत आहेत यावरुनच या रोगाचे वास्तव स्पष्ट होते, असेही पवारांनी निदर्शनास आणून दिले.गणेशोत्सव जवळ आलेला आहे. त्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते, सर्व कोंडाळे, गटारी, नाले साफ करुन घ्यावेत, अशी सुचना शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रज यांनी केली. शहरातील गांधी मैदानावर मोठ्याप्रमाणात पाणी साचून राहते. शहरातील अनेक मुताऱ्या स्वच्छ केल्या जात नाहीत. बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजमधील सांडपाणी रस्त्यावर पसरून दुर्गंधी सुटलेली असते याकडे मनपा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष पुरवावे, असे उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी सांगितले.

बांधकाम परवाने रद्द करणार : आयुक्तशहरात वारंवार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहते. त्यातून डेंग्यूच्या डासांची निर्माती होत आहे. आम्ही शहरात प्रबोधनाची मोहिम हाती घेतली आहे. घराघरात जाऊन जनजागृती केली जात आहे. प्रत्येक कुटुंबाने खबरदारी घेतली तर डेंग्यूच्या डासांचा बंदोबस्त प्रभावीपणे करता येईल,असे आयुक्त चौधरी यांनी शिवसैनिकांशी बोलतना सांगितले. बांधकाम साईटवर जेथे डेंग्यूच्या डास आळ्या सापडतील त्या बांधकामा व्यावसायिकांना दंड करण्यात आला होता आता परवाने रद्द केली जातील, असेही आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूरdengueडेंग्यू