शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर : दोन दिवसांत जीवनावश्यक वस्तूंचीही कोंडी करणार, मालवाहतूक संघटनांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 18:03 IST

वाहतूक संघटनांकडून पुकारलेल्या बंदच्या परिस्थितीत भाजीपाला, दूध, औषधे यांसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा जनतेला प्राधान्याने पुरवठा व्हावा, यामध्ये कसल्याही प्रकारे कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी बैठकीत केले.

ठळक मुद्देदोन दिवसांत जीवनावश्यक वस्तूंचीही कोंडी करणार, मालवाहतूक संघटनांचा इशारा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; कृत्रिम टंचाई होणार नसल्याची दक्षता

कोल्हापूर : वाहतूक संघटनांकडून पुकारलेल्या बंदच्या परिस्थितीत भाजीपाला, दूध, औषधे यांसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा जनतेला प्राधान्याने पुरवठा व्हावा, यामध्ये कसल्याही प्रकारे कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी बैठकीत केले.दरम्यान, येत्या दोन दिवसांत शासनाने मागण्या मान्य न केल्यास जीवनावश्यक वस्तूंचीही वाहतूक बंद ठेवून कोंडी करणार असल्याचा इशारा वाहतूक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बैठकीत दिला.राज्यातील विविध वाहतूक संघटनांनी २० जुलैपासून संप पुकारला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहू सभागृहात झाली.

बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एम. टी. अल्वारीस, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, साहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अजित पाटील, पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी, पेट्रोलपंप व एलपीजी गॅस संघटनांचे प्रतिनिधी, महापालिकेचे प्रतिनिधी, नगररचना विभागाचे उपसंचालक धनंजय खोत, पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, अन्न व औषध प्रशासनाच्या साहाय्यक आयुक्त एम. एस.ज्वंजाळ- पाटील, एस. ए. चौगुले, बाजार समितीचे सहसचिव जयवंत पाटील, अन्नधान्य वितरण अधिकारी संजय वळवी, कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, किराणा भुसार धान्य असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप कापडिया, कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष किशोर तांदळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विविध असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.वाहतूकदारांच्या संपामुळे जिल्ह्यात अन्नधान्य, भाजीपाला, कांदा-बटाटा, गॅस, पेट्रोल, डिझेल, आदींच्या पुरवठ्याबाबत आणि उपलब्धतेबाबत या बैठकीत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.सक्ती केल्यास वाहने ‘नॉन यूज’ साठी अर्ज करणारवाहतूकदारांच्या संप कालावधीत दूध, भाजीपाला, औषधे, गॅस, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, आदी जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीतपणे पुरवठा व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे, अशी सूचना करून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी जीवनावश्यक वस्तंूसह रेशन धान्याची वाहतूकही सुरळीतपणे चालू राहावी, यासाठी ‘आरटीओ’ मार्फत काही खासगी मालट्रक ताब्यात घेऊन धान्याचा पुरवठा करावा लागेल; पण त्यास वाहतूक संघटनांनी विरोध दर्शवत, अशा पद्धतीने वाहने ताब्यात घेण्याची सक्ती केल्यास आम्ही सामूहिक पद्धतीने ‘नॉन यूज’ साठी (सहा महिने वाहन वापरणार नाही) आरटीओ कार्यालयाकडे अर्ज करणार असल्याचा इशारा दिला.

चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यरतवाहतूकदारांच्या संपकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याचीही दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुभेदार यांनी करून, संपाबाबतची माहिती देण्यासाठी व संपाबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत असल्याचेही सांगितले. 

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी