शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कोल्हापूर : आरक्षणविरोधक, समर्थकांत भाजपचा भांडणे लावण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 14:38 IST

आरक्षणविरोधक आणि आरक्षणसमर्थक यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप ‘भारिप-बहुजन महासंघा’चे संस्थापक-अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देआरक्षणविरोधक, समर्थकांत भाजपचा भांडणे लावण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीत वंचितांना प्रतिनिधित्व देणार; विधानसभा स्वबळावर

कोल्हापूर : आरक्षणविरोधक आणि आरक्षणसमर्थक यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप ‘भारिप-बहुजन महासंघा’चे संस्थापक-अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.धनगर, घिसाडी, कैकाडी समाज यांना स्वातंत्र्यानंतर अद्यापही लोकसभा प्रतिनिधित्व मिळालेले नाही. अशा वंचित समाजाला लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे, ही भूमिका साकारण्यासाठी सर्व समाजबांधवांच्या सहमतीने ‘वंचित बहुजन आघाडी’ची स्थापना केली.

आघाडीचा जाहीरनामा तयार करण्याच्या पार्श्वभूमीवर आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. आंबेडकर यांचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून झाली. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, लोकशाहीचा लाभ सर्वांना सारखाच मिळावा यासाठी आम्ही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत. केवळ लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी, पुरोगामी विचारधारा असलेल्या पक्षांसोबत दोस्ती करण्यास तयार आहोत. मात्र विधानसभेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढविणार आहोत.

लोकसभा निवडणुकीत संबंधित पक्षाने २ जागा धनगर समाजाला, २ माळी, २ भटके विमुक्त आणि लहान ओबीसींना, २ मुस्लिम समाजाला आणि २ अनुसूचित जाती-जमातींना अशा १० जागा दिल्या पाहिजेत; तरच ही आघाडी होऊ शकते; अन्यथा सर्वच्या सर्व ४८ जागा आम्ही स्वबळावर लढवू, असेही ते म्हणाले.शासनाने सचिव पातळीवरील नोकरभरतीतून आरक्षण मोडीत काढण्याचे षड्यंत्र सुरू केले आहे; पण भाजपचा तो डाव आम्ही हाणून पाडू, असाही इशारा त्यांनी दिला. यावेळी सर्वश्री. माजी आमदार अ‍ॅड. विलासराव मोरे, हरिभाऊ भदे, लक्ष्मण माने, धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंगतात्या शेंडगे, अशोकराव बन्नेनवार, आदी उपस्थित होते.

भाजप-सेनेशी युती नाहीधर्मवादी, जातीयवादी संघटनेकडे आज विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही. फक्त दंगल घडविणे हाच त्यांचा हेतू आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेशी आगामी निवडणुकीत युती केली जाणार असल्याचेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आता हिंदू-मुस्लिम दंगली घडत नाहीत; त्यामुळे आर. एस. एस. आता होमहवन व यज्ञ करीत आहे. आरक्षणाविरोधात वादळ उभे करण्यासाठी लोकांना शपथ दिली जात आहे. हा सर्व अराजकता माजविण्याचाच प्रकार आहे, असेही ते म्हणाले.आंबेडकरांना मुख्यमंत्री करणार : लक्ष्मण मानेसोलापूर आणि पुण्यात धनगर समाजाचा मेळावे झाले. तेथे वंचित घटकांना निवडून आणून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला असल्याचे माजी आमदार लक्ष्मण माने म्हणाले.लोकसभेच्या १०, विधानसभेच्या ५० जागा लढविणारलोकसभेच्या १०, तर विधानसभेच्या ५० जागा लढविणार असल्याचे सांगून अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत वंचित घटकांना प्राधान्य देणाऱ्या पुरोगामी पक्षांना चर्चेसाठी आपल्या आघाडीचे दरवाजे खुले आहेत. 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरkolhapurकोल्हापूर