शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

‘कोल्हापूर ’ पर्यटकांनी ‘फुल्ल’, अंबाबाई मंदिर, न्यू पॅलेस, गर्दीने ओसांडून ; पार्किंगही फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 18:42 IST

नाताळच्या पार्श्वभूमीवर सलग मिळालेल्या सुटीमुळे कोल्हापूर अक्षरश: पर्यटकांनी बहरले होते. त्यामुळे रविवारी सलग दुस-या दिवशी दिवसभर अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कोल्हापूर - नाताळच्या पार्श्वभूमीवर सलग मिळालेल्या सुटीमुळे कोल्हापूर अक्षरश: पर्यटकांनी बहरले होते. त्यामुळे रविवारी सलग दुस-या दिवशी दिवसभर अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर यात्रीनिवास, हॉटेल्स, धर्मशाळा ‘फुल्ल’ झाली होती. महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, चप्पल लेन, भवानी मंडपात तर जणू पर्यटकांचा जथ्य्यामुळे मांदियाळीचेच रूप आले होते. 

चौथा शनिवार व रविवार व सोमवार अशा सलग तीन सुट्ट्या मिळाल्याने राज्यासह परराज्यांतील पर्यटकांनी करवीरनगरीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत दीड लाखांहून अधिक पर्यटकांनी कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर व शहरास भेट दिली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शनमंडप उभे केले आहेत. ‘खिसेकापूपासून सावध रहा’, ‘किमती व मौल्यवान वस्तू सांभाळा’, ‘लहान मुले सांभाळा’ असा पुकारा माईकवरून सातत्याने दिला जात होता. अनेक भाविकांनी एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी असूनही देवीचे दर्शन चांगले झाल्याची भावना व्यक्त केली.  बिंदू चौक येथे दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान कॉमर्स कॉलेजकडील मार्ग, देवल क्लबकडील मार्ग, शाहू टॉकीजकडील या मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यासह बिंदू चौक पार्किंग तर ओसांडून वाहत होते.  

शहरातील प्रमुख मार्ग गजबजलेला

सलग सुट्यांमुळे शहरात प्रवेश करणाºया पर्यटकांबरोबर शाळांच्या सहलींमुळे शहराचे प्रमुख मार्ग गजबजलेले. त्यामुळे ताराराणी चौक, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, रंकाळा परिसर, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, शिवाजी चौक, लक्ष्मीपुरी आदी भागांत वाहनांच्या रांगा आणि वाहतुकीची कोंडी असे चित्र दिवसभर पाहण्यास मिळाले. बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी असे चित्र वारंवार दिसले. ते हलवताना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. गेले दोन दिवस शहर वाहतूक शाखेकडून एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षकांसह २४ कर्मचारी वाहतूक व्यवस्था मार्गी लावण्यासाठी तैनात केले होते.  

कोल्हापुरी पाहुणचाराचा आस्वाद

कोल्हापुरी मिसळ आणि ‘तांबडा-पांढरा’ची चव काय न्यारीच त्यामुळे दिवसभर शहरातील प्रसिद्ध मिसळ केंद्रे व हॉटेल्समध्ये पर्यटकांच्या मिसळ खाण्यासाठी व जेवणासाठी रांगा लागल्या होत्या. यासह कोल्हापूर चप्पल, गूळ आणि स्वस्त फळे घेण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी दिसत होती.  

अंबाबाई दर्शनानंतर अनेक पर्यटकांनी जवळील ठिकाण म्हणून न्यू पॅलेस; तर काहींनी देवीच्या दर्शनानंतर, पन्हाळा, जोतिबा, नृसिंहवाडी गाठणे पसंत केले. सलग सुटीमुळे कोल्हापूरच्या मुक्कामानंतर कोकणकडे पर्यटकांचा ओढा जाणवला. विशेषत: नूतन वर्ष साजरे करण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आदी ठिकाणी जाण्यासाठी रत्नागिरी राज्यमार्ग, राधानगरी, गारगोटी मार्गावर वाहतुकीचा ताण वाढला होता. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर