शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

राष्ट्रीय पोषण अभियानात कोल्हापूर देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 20:27 IST

केंद्र शासनाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पोषण अभियानामध्ये सर्वाधिक म्हणजे पाच वैयक्तिक पुरस्कार पटकावत कोल्हापूर जिल्ने देशात बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या अभियानामध्ये ७७ पैकी १४ पुरस्कार मिळवून

ठळक मुद्देमहाराष्ट्र देशात पहिलेदेशभर सप्टेंबर महिना हा ‘पोषण माह’ म्हणून साजरा

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पोषण अभियानामध्ये सर्वाधिक म्हणजे पाच वैयक्तिक पुरस्कार पटकावत कोल्हापूर जिल्ने देशात बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या अभियानामध्ये ७७ पैकी १४ पुरस्कार मिळवून महाराष्ट्र देशात पहिले आले आहे.

राजश्री सयाजी साळसकर (अंगणवाडी सेविका माले, ता. पन्हाळा), शोभा महादेव लोहार (आशा), वैशाली भास्कर शितोळे (परिचर), स्मिता सदानंद चोपडे (पर्यवेक्षिका, केखले प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. पन्हाळा), संध्या उल्हास चांदणे (आरोग्य सहाय्यिका, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. कागल) या पाच महिला कर्मचारी वैयक्तिक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

देशभर सप्टेंबर महिना हा ‘पोषण माह’ म्हणून साजरा करण्यात आला. पोषण चळवळ जनचळवळ व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या महिन्यात जिल्हाभरामध्ये पोषण मेळावे, पाककृती स्पर्धा, किशोरी मुली आणि महिलांचे हिमोग्लोबिन तपासणे, गृहभेटी, पोषण पंगती, पोषण दहीहंडी, फळाफुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

या सर्व कार्यक्रमांची नोंद केंद्र शासनाच्या संबंधित संकेतस्थळावर करण्यात आली होती. यातून गावपातळीवर उत्कृष्ट काम करणाºया अंगणवाडी सेविका, आशा, परिचर,आरोग्य पर्यवेक्षिका, सहाय्यिका यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती वंदना मगदूम, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, खातेप्रमुख, बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, आशा, ग्रामपंचायत यंत्रणा या सर्वांच्या सहकार्यातून जिल्हा परिषदेच्या या कर्मचाºयांनी हे यश मिळविले आहे.योजनेत समावेश नसताना मिळविले यशवास्तविक शालेय पोषण अभियानामध्ये कोल्हापूर जिल्'ाचा समावेश नाही. महाराष्ट्रातील २0 जिल्हे या योजनेत आहेत. कोल्हापूरचा तिसºया टप्प्यात समावेश होणार आहे. त्यामुळे यासाठी कोणताही निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध नव्हता. तरीही कोल्हापूर जिल्हा परिषदेने चौदावा वित्त आयोग आणि लोकसहभागातून हे सर्व उपक्रम राबवून त्यामध्ये सर्वाधिक वैयक्तिक पुरस्कार पटकावण्याची कामगिरी केली हे विशेष.

या पाच महिला कर्मचारी वैयक्तिक पुरस्काराच्या मानकरी

  1. राजश्री साळसकर
  2. शोभा लोहार
  3. वैशाली शितोळे
  4. स्मिता चोपडे
  5. संध्या चांदणे

 

जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने चांगली कामगिरी करून दाखविली आहे. सभापती वंदना मगदूम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, त्यांच्या पथकाने सामूहिक शक्तीची प्रचिती आणून दिली. या पाचही महिलांचे मनापासून अभिनंदन. त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेची मान आणखी उंचावली आहे.शौमिका महाडिकअध्यक्षा, जिल्हा परिषद, कोल्हापूर 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर