शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : दहा हजार शेतकऱ्यांची सोमवारी ‘नाबार्ड’वर धडक, अपात्र ११२ कोटी परत देण्यासाठी पुणे कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 18:53 IST

केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटी परत द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी सोमवारी ‘नाबार्ड’च्या पुणे कार्यालयावर धडक देणार आहेत. शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत, त्यातच या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नसताना पैसे आडवून ठेवणे अन्यायकारक आहे. याचा निषेध करण्यासाठी शेतकरी ‘नाबार्ड’च्या दारात ठिय्या आंदोलन करणार आहेत.

ठळक मुद्दे दहा हजार शेतकऱ्यांची सोमवारी ‘नाबार्ड’वर धडकअपात्र ११२ कोटी परत देण्यासाठी पुणे कार्यालयासमोर ठिय्याआंदोलन न करण्याचे आवाहन

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटी परत द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी सोमवारी ‘नाबार्ड’च्या पुणे कार्यालयावर धडक देणार आहेत. शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत, त्यातच या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नसताना पैसे आडवून ठेवणे अन्यायकारक आहे. याचा निषेध करण्यासाठी शेतकरी ‘नाबार्ड’च्या दारात ठिय्या आंदोलन करणार आहेत.केंद्र सरकारने दिलेल्या कर्जमाफीची रक्कम ४४ हजार शेतकऱ्यांकडून नाबार्डने परत घेतली आहे. कर्ज मर्यादेच्या निकषाचा आधार घेत नाबार्डने ही रक्कम जिल्हा बॅँकेकडून वसूल केली.

याविरोधात विकास संस्था व काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते; पण नाबार्डने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि स्थगिती मागितली होती.

सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीस नकार दिल्याने उच्च न्यायालयाचा निकाल कायम राहतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तशी मागणी शेतकऱ्यांनी नाबार्डकडे केली होती; पण हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे नाबार्डने सांगितले.

याविरोधात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी उद्या नाबार्ड, पुणे कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करणार आहेत.

नाबार्ड जोपर्यंत पैसे परत देण्याचे लेखी आश्वासन देणार नाही, तोपर्यंत तेथून हलणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाणीव जागृती करण्यासाठी शिरोळ, राधानगरी, गारगोटी, पन्हाळा, करवीर, कागल, शाहूवाडी येथे शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत.

आंदोलन न करण्याचे आवाहनअपात्र कर्जमाफीचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये, असे आवाहन नाबार्डने अपात्र कर्जमाफी कृती समितीला केले होते; पण ते त्यांनी धुडकावून लावले आहे.

जिल्ह्यातून किमान एक हजार वाहनांतून दहा हजार शेतकरी नाबार्डच्या दारात ठिय्या मारणार आहेत. पैसे परत देण्याचे लेखी आश्वासन घेतल्याशिवाय तेथून हलणार नाही.- प्रकाश तिपन्नवार,सदस्य, कृती समिती 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीbankबँक