शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

कोल्हापूर : दहा हजार शेतकऱ्यांची सोमवारी ‘नाबार्ड’वर धडक, अपात्र ११२ कोटी परत देण्यासाठी पुणे कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 18:53 IST

केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटी परत द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी सोमवारी ‘नाबार्ड’च्या पुणे कार्यालयावर धडक देणार आहेत. शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत, त्यातच या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नसताना पैसे आडवून ठेवणे अन्यायकारक आहे. याचा निषेध करण्यासाठी शेतकरी ‘नाबार्ड’च्या दारात ठिय्या आंदोलन करणार आहेत.

ठळक मुद्दे दहा हजार शेतकऱ्यांची सोमवारी ‘नाबार्ड’वर धडकअपात्र ११२ कोटी परत देण्यासाठी पुणे कार्यालयासमोर ठिय्याआंदोलन न करण्याचे आवाहन

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटी परत द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी सोमवारी ‘नाबार्ड’च्या पुणे कार्यालयावर धडक देणार आहेत. शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत, त्यातच या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नसताना पैसे आडवून ठेवणे अन्यायकारक आहे. याचा निषेध करण्यासाठी शेतकरी ‘नाबार्ड’च्या दारात ठिय्या आंदोलन करणार आहेत.केंद्र सरकारने दिलेल्या कर्जमाफीची रक्कम ४४ हजार शेतकऱ्यांकडून नाबार्डने परत घेतली आहे. कर्ज मर्यादेच्या निकषाचा आधार घेत नाबार्डने ही रक्कम जिल्हा बॅँकेकडून वसूल केली.

याविरोधात विकास संस्था व काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते; पण नाबार्डने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि स्थगिती मागितली होती.

सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीस नकार दिल्याने उच्च न्यायालयाचा निकाल कायम राहतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तशी मागणी शेतकऱ्यांनी नाबार्डकडे केली होती; पण हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे नाबार्डने सांगितले.

याविरोधात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी उद्या नाबार्ड, पुणे कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करणार आहेत.

नाबार्ड जोपर्यंत पैसे परत देण्याचे लेखी आश्वासन देणार नाही, तोपर्यंत तेथून हलणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाणीव जागृती करण्यासाठी शिरोळ, राधानगरी, गारगोटी, पन्हाळा, करवीर, कागल, शाहूवाडी येथे शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत.

आंदोलन न करण्याचे आवाहनअपात्र कर्जमाफीचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये, असे आवाहन नाबार्डने अपात्र कर्जमाफी कृती समितीला केले होते; पण ते त्यांनी धुडकावून लावले आहे.

जिल्ह्यातून किमान एक हजार वाहनांतून दहा हजार शेतकरी नाबार्डच्या दारात ठिय्या मारणार आहेत. पैसे परत देण्याचे लेखी आश्वासन घेतल्याशिवाय तेथून हलणार नाही.- प्रकाश तिपन्नवार,सदस्य, कृती समिती 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीbankबँक