शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : दहा हजार शेतकऱ्यांची सोमवारी ‘नाबार्ड’वर धडक, अपात्र ११२ कोटी परत देण्यासाठी पुणे कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 18:53 IST

केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटी परत द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी सोमवारी ‘नाबार्ड’च्या पुणे कार्यालयावर धडक देणार आहेत. शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत, त्यातच या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नसताना पैसे आडवून ठेवणे अन्यायकारक आहे. याचा निषेध करण्यासाठी शेतकरी ‘नाबार्ड’च्या दारात ठिय्या आंदोलन करणार आहेत.

ठळक मुद्दे दहा हजार शेतकऱ्यांची सोमवारी ‘नाबार्ड’वर धडकअपात्र ११२ कोटी परत देण्यासाठी पुणे कार्यालयासमोर ठिय्याआंदोलन न करण्याचे आवाहन

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटी परत द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी सोमवारी ‘नाबार्ड’च्या पुणे कार्यालयावर धडक देणार आहेत. शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत, त्यातच या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नसताना पैसे आडवून ठेवणे अन्यायकारक आहे. याचा निषेध करण्यासाठी शेतकरी ‘नाबार्ड’च्या दारात ठिय्या आंदोलन करणार आहेत.केंद्र सरकारने दिलेल्या कर्जमाफीची रक्कम ४४ हजार शेतकऱ्यांकडून नाबार्डने परत घेतली आहे. कर्ज मर्यादेच्या निकषाचा आधार घेत नाबार्डने ही रक्कम जिल्हा बॅँकेकडून वसूल केली.

याविरोधात विकास संस्था व काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते; पण नाबार्डने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि स्थगिती मागितली होती.

सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीस नकार दिल्याने उच्च न्यायालयाचा निकाल कायम राहतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तशी मागणी शेतकऱ्यांनी नाबार्डकडे केली होती; पण हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे नाबार्डने सांगितले.

याविरोधात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी उद्या नाबार्ड, पुणे कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करणार आहेत.

नाबार्ड जोपर्यंत पैसे परत देण्याचे लेखी आश्वासन देणार नाही, तोपर्यंत तेथून हलणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाणीव जागृती करण्यासाठी शिरोळ, राधानगरी, गारगोटी, पन्हाळा, करवीर, कागल, शाहूवाडी येथे शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत.

आंदोलन न करण्याचे आवाहनअपात्र कर्जमाफीचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये, असे आवाहन नाबार्डने अपात्र कर्जमाफी कृती समितीला केले होते; पण ते त्यांनी धुडकावून लावले आहे.

जिल्ह्यातून किमान एक हजार वाहनांतून दहा हजार शेतकरी नाबार्डच्या दारात ठिय्या मारणार आहेत. पैसे परत देण्याचे लेखी आश्वासन घेतल्याशिवाय तेथून हलणार नाही.- प्रकाश तिपन्नवार,सदस्य, कृती समिती 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीbankबँक