शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर : उदिष्टपुर्ती न करणाऱ्या जिल्हा बॅँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 15:49 IST

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या उदिष्टापैकी किमान ६७ टक्के पुर्तता केलेली नाही, अशा कर्मचाऱ्यांची वेतनवाढीला स्थगिती दिली आहे. साडे सहाशे कर्मचाऱ्यांना नोटीसा लागू केल्या असून व्यवसायाबरोबर नफा वाढला तरच पगारवाढ अशी व्यावसायिक बॅँकांप्रमाणे जिल्हा बॅँकेने भूमिका घेतल्याने आता कर्मचाऱ्यांना कात टाकावी लागणार आहे.

ठळक मुद्देउदिष्टपुर्ती न करणाऱ्या जिल्हा बॅँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीला स्थगितीजिल्हा बॅँक : साडे सहाशे कर्मचाऱ्यांना नोटीसा

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या उदिष्टापैकी किमान ६७ टक्के पुर्तता केलेली नाही, अशा कर्मचाऱ्यांची वेतनवाढीला स्थगिती दिली आहे. साडे सहाशे कर्मचाऱ्यांना नोटीसा लागू केल्या असून व्यवसायाबरोबर नफा वाढला तरच पगारवाढ अशी व्यावसायिक बॅँकांप्रमाणे जिल्हा बॅँकेने भूमिका घेतल्याने आता कर्मचाऱ्यांना कात टाकावी लागणार आहे.जिल्हा बॅँक संचित तोट्यातून बाहेर येऊन नफ्यात आली हे जरी खरे असले तरी व्यवसाय वाढीला अपेक्षित गती मिळत नाही. त्यासाठी संचालक मंडळाने सहा हजार कोटीच्या ठेवी, शंभर कोटी नफ्याचे उदिष्ट ठेवून गेले वर्षभर काम केले.

शाखानिहाय कर्मचाऱ्यांना व्यवसायवृध्दीचे टार्गेट दिले होते. पण मार्च २०१८ चा ताळेबंद निश्चित करताना जेमतेम ४ हजार कोटीच्या ठेवी आणि ५६ कोटीचा नफा झाल्याने संचालकांचे नियोजन कोलमडले. त्यामुळे संचालकांनी कोणी किती काम केले याचा लेखाजोखा मांडण्यास सुरूवात केली आहे.

यामध्ये दिलेले उदिष्ट अजिबात पुर्ण न केलेले शंभरहून अधिक कर्मचारी आहेत. जे काम करणार नाहीत, त्यांना सुविधा मिळणार नाहीत, अशी भूमिका संचालकांनी घेतली आहे. त्यामुळे सरासरी ६७ टक्केपेक्षा कमी उदिष्ट पुर्ण केले त्यांची वेतनवाढीला स्थगिती दिली आहे. साधारणता साडे चारशे पासून पंधराशे रूपयांपर्यंत वेतनवाढ दिली जाते. ती रोखल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.दरम्यान, व्यवसाय वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी वर्षभर प्रयत्न केले, पण सध्या साखर उद्योग अडचणीत असल्याने शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यातच खरीप हंगाम, लग्न सराईमुळे शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने ठेवी संकलनावर परिणाम झाल्याचे मत कर्मचाऱ्यांचे आहे.

लेखी घेऊन वेतनवाढ शक्यवेतनवाढ रोखण्याची कारवाई अनपेक्षितपणे बॅँक व्यवस्थापनाने केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची खळबळ उडाली आहे. आगामी काळात उदिष्टपुर्ती करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर वेतनवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. तशा हालचाली बॅँक पातळीवर सुरू असल्याचे समजते.

पुढारीपण करणाऱ्यांचे काय?जिल्हा बॅँकेत अजूनही संचालकांच्या मागे-पुढे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे जीव ओतून काम कणाऱ्यांनीच करायचे आणि पुढारीपणा करणाऱ्यांनी निवांत रहायचे, याबाबत कर्मचाऱ्यांमध्येच असंतोष आहे. या कर्मचाऱ्यांना चाप लावला तरच उदिष्टपुर्ती होऊ शकते, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक