शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

कोल्हापूर : किरकोळ बाजारात साखर ३४ रुपयांवर, भाजीपाला, कडधान्यांचे दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 11:49 IST

घाऊक बाजारात साखरेच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला असून, दर प्रतिकिलो ३४ रुपये राहिला आहे. भाजीपाला, कडधान्य बाजार तुलनेत स्थिर राहिले आहे. फळबाजारात हापूस आंब्याची आवक कमी होऊन अननस, पेरूंची रेलचेल अधिक दिसत आहे.

ठळक मुद्देकिरकोळ बाजारात साखर ३४ रुपयांवरभाजीपाला, कडधान्यांचे दर स्थिर  फळबाजारात अननस, पेरूंची रेलचेल

कोल्हापूर : घाऊक बाजारात साखरेच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला असून, दर प्रतिकिलो ३४ रुपये राहिला आहे. भाजीपाला, कडधान्य बाजार तुलनेत स्थिर राहिले आहे. फळबाजारात हापूस आंब्याची आवक कमी होऊन अननस, पेरूंची रेलचेल अधिक दिसत आहे.साखरेच्या दरात कमालीची घसरण होऊन घाऊक बाजार २७०० रुपये क्विंटलपर्यंत खाली आल्याने किरकोळ दरही कमी झाले होते; पण केंद्र सरकारने बफर स्टॉकसह इतर घेतलेल्या निर्णयाने साखरेचे दर कमालीचे वधारले असून घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ३०५० पासून ३२०० रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे.

पावसाळा सुरू झाल्याने कडधान्याचा बाजार एकदम थंड पडला आहे. त्यामुळे तूरडाळ ६५, हरभराडाळ ५० ते ६०, मटकी ७५ रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. ज्वारीची मागणी अंतिम टप्प्यात असून चांगली ज्वारी २५ ते ३० रुपये किलोपर्यंत आहे. शाबू, सरकी तेलासह इतर वस्तूंचे दर कायम राहिले आहेत.पावसामुळे स्थानिकचा भाजीपाला कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम दरावर दिसतो. कोबी, वांगी, गवार या प्रमुख भाज्यांच्या दरांत थोडी वाढ दिसते; पण इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. टोमॅटोची आवक बऱ्यापैकी असल्याने घाऊक बाजारात सरासरी सात रुपये दर आहे.

मेथी, पोकळा, पालकाची आवक कमी असल्याने दर १० रुपये प्रतिपेंढी आहे. कोथिंबिरीची आवक घटल्याने दर शेकडा १४०० रुपये आहे. फळबाजारावर पावसाचा परिणाम झाला असून, गेले दोन-अडीच महिने पिवळाधमक दिसणारा फळांचा बाजार कमी झाला आहे.

कर्नाटकातून आंब्यांची आवक सुरू असली तरी आणखी चार ते पाच दिवसच ती सुरू राहील. तोतापुरी आंब्यांची आवक सध्या जोरात आहे. अननस, पेरूंची रेलचेल सुरू असून, एका अननसचा दर २० ते ३० रुपये राहिला आहे.

बटाटा-लसूण स्थिरगेल्या आठवड्यापेक्षा बटाटा व लसणाच्या दरांत फारशी चढउतार दिसत नाही; पण पावसामुळे कांद्याची आवक काहीशी कमी झाल्याने दरात थोडी वाढ झालेली आहे. घाऊक बाजारात किलो मागे दीड रुपयाची वाढ झाली.आंब्याचे दर असे-आंबा                                आवक                         सरासरी दर रुपयांतहापूस                               ८० पेटी                               ४५०हापूस                             ४२० बॉक्स                           २२५लालबाग                        ३५० बॉक्स                             ५०मद्रास हापूस                  ५०० बॉक्स                           १२०पायरी                            १५० बॉक्स                             ६०

घाऊक बाजारात प्रमुख भाज्यांचे दर प्रतिकिलो असे-कोबी- ८, वांगी- ३५, टोमॅटो- ११, ढबू- ३०, गवार- २७, कारली- ४०, भेंडी- ३०, वरणा- ४५, दोडका- ४०. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजारfruitsफळे