शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी शिवाजी चौकात रिक्षाचालकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 12:09 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर शहर-जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी शिवाजी चौकात रिक्षांसह ठिय्या आंदोलन केले. त्यामध्ये भाजी विक्रेत्या महिला सहभागी झाल्या. त्यांनी सकल मराठा शौर्यपीठातर्फे सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा जाहीर केला.

ठळक मुद्देमराठा आरक्षणासाठी शिवाजी चौकात रिक्षाचालकांचा ठिय्यासकल मराठा शौर्यपीठांवर पाठिंबा जाहीर; भाजी विक्रेत्या महिलांचा सहभाग

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर शहर-जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी शिवाजी चौकात रिक्षांसह ठिय्या आंदोलन केले. त्यामध्ये भाजी विक्रेत्या महिला सहभागी झाल्या. त्यांनी सकल मराठा शौर्यपीठातर्फे सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा जाहीर केला. ठिय्या आंदोलनामुळे शिवाजी चौकातील वाहतूक ठप्प झाली.या चौकात दुपारी साडेबाराच्या सुमारास रिक्षाचालक आणि भाजी विक्रेत्या महिला दाखल झाल्या. त्यातील चालकांनी आपल्या रिक्षा शिवाजी चौक ते माळकर तिकटीपर्यंत रस्त्यावर लावल्या.

कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवाजी चौकात सकल मराठा शौर्यपीठातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात भाजी विक्रेत्या महिला सहभागी झाल्या. (छाया : नसीर अत्तार) 

भाजी विक्रेत्या महिलांनी शौर्यपीठावर ठिय्या मारला. त्यानंतर ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणांनी त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी प्रसाद जाधव, राजू जाधव, दीपा पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले.

या आंदोलनात उदय लाड, राहुल इंगवले, शिवाजीराव लोंढे, बाबासो देसाई, सुभाष पाटील, बंडा रकटे, शामराव भोजणे, अमोल पाटील, श्रीकांत वंदुरे, रंंजना खाडे, वंदना बुचडे, पार्वती शहा, हमिदा चौगुले, वैशाली पाटील, वंदना सताजी, उज्ज्वला पिसाळ, सावित्री पाटील, अक्काताई अवळे, मुमताज करंडे, सखूबाई शिंदे, राजश्री मोरे, वहिदा मुजावर, सलमा बागवान, मनीषा क्षीरसागर, आदींसह कसबा बावडा, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत-नेर्ली, शिवाजी चौक रिक्षा मित्रमंडळ, भवानी मंडप, वडगाव, गांधीनगर, जरगनगर, पाचगाव, कळंबा रिक्षा स्टॉपवरील चालक, शाहूपुरी, गांधीनगर, टिंबर मार्केट भाजी मंडईतील महिला भाजी विक्रेत्या सहभागी झाल्या.

दरम्यान,  आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी दि. २ सप्टेंबरला विविध तालीम संस्था, मंडळांची व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याचे प्रसाद जाधव यांनी सांगितले.

आरक्षणाची गरजया आंदोलनावेळी काही रिक्षाचालक, भाजी विक्रेत्या महिलांनी मनोगत व्यक्त केले. त्यात रिक्षाचालकांनी वाहनखरेदीसाठी बँकांकडून कर्ज घेताना आलेले अनुभव सांगितले. भाजी विक्रेत्यांनी आम्ही भोगलेली वाताहत आमच्या पुढील पिढीला भोगायला लागू नये, म्हणून मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याची भावना व्यक्त केली.

 

 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर