शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : यशस्वी यादव जातील तिथे वादग्रस्त, कोल्हापूरच्या प्रकरणातही झाली होती बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 18:49 IST

जातील तिथे ‘वादग्रस्त’ अशी लेबल लागलेले औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव २००९-१० मध्ये कोल्हापूरमध्ये चांगलेच वादग्रस्त ठरले. महिला पोलीस लैंगिक अत्याचार प्रकरणामधून त्यांची तडकाफडकी बदली झाली. त्यांच्या कारकिर्दीत खादी वर्दीला लागलेला बदनामीचा डाग खात्याला अद्यापही पुसता आलेला नाही.

ठळक मुद्देयशस्वी यादव जातील तिथे वादग्रस्तकोल्हापूरच्या महिला लैंगिक शोषण प्रकरणातून झाली होती बदली

कोल्हापूर : जातील तिथे ‘वादग्रस्त’ अशी लेबल लागलेले औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव २००९-१० मध्ये कोल्हापूरमध्ये चांगलेच वादग्रस्त ठरले. महिला पोलीस लैंगिक अत्याचार प्रकरणामधून त्यांची तडकाफडकी बदली झाली. त्यांच्या कारकिर्दीत खादी वर्दीला लागलेला बदनामीचा डाग खात्याला अद्यापही पुसता आलेला नाही.औरंगाबादमधील मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी मारहाण केल्याने पोलीस आयुक्त यादव यांना शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविले. या प्रकरणावरून पुन्हा यादव राज्यभर चर्चेत आले. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून यशस्वी यादव यांनी २००९ मध्ये पदभार स्वीकारला होता.

सुरुवातीपासून त्यांनी स्वत:ची ‘दबंग’ पर्सनॅलिटी ठेवली होती. त्यांच्या अवतीभवती नेहमी पोलिसांची फौज असायची. डोळ्यांवर किमती गॉगल अशा रुबाबात त्यांनी दीड वर्ष कार्यभार सांभाळला. त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांनी त्यांचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतला.

तत्कालीन गृह पोलीस उपअधीक्षक विजय परखाळे, ‘शाहूपुरी’चे तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे हे दोन अधिकारी महिला लैंगिक प्रकरणात चांगलेच गाजले. मुंडे यांचे हॉटेलमधील चित्रीकरण राज्यभर प्रसारित झाले.

या दोन अधिकाऱ्यांना पाठबळ दिल्यामुळे तर यशस्वी यादव चांगलेच अडचणीत आले. काही प्रमाणात त्यांचाही या प्रकरणात हात असल्याची चर्चा झाली. या तिन्ही अधिकाऱ्यांमुळे खात्यातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली होती.पोलीस अधीक्षक यादव यांचा अवैध व्यावसायिकांवर वचक नव्हता; त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र अवैध व्यवसाय फोफावले होते. गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व वाढले होते. कायदा व सुव्यवस्था पूर्णत: हाताबाहेर गेली होती.

यादव हे नागरिकांत कधी सहभागी झालेच नाहीत; त्यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद दुरावला होता. त्यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच महिला लैंगिक अत्याचारामध्ये ते वादग्रस्त ठरले आणि त्यांची तडकाफडकी बदली झाली.

त्यांच्या कारर्किर्दीतील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणाची तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पोलीस महासंचालकांनी चौकशी लावली होती. याच कालावधीत त्यांच्या पत्नी जयश्री भोज-यादव ह्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर