शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कोल्हापूर : यशस्वी यादव जातील तिथे वादग्रस्त, कोल्हापूरच्या प्रकरणातही झाली होती बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 18:49 IST

जातील तिथे ‘वादग्रस्त’ अशी लेबल लागलेले औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव २००९-१० मध्ये कोल्हापूरमध्ये चांगलेच वादग्रस्त ठरले. महिला पोलीस लैंगिक अत्याचार प्रकरणामधून त्यांची तडकाफडकी बदली झाली. त्यांच्या कारकिर्दीत खादी वर्दीला लागलेला बदनामीचा डाग खात्याला अद्यापही पुसता आलेला नाही.

ठळक मुद्देयशस्वी यादव जातील तिथे वादग्रस्तकोल्हापूरच्या महिला लैंगिक शोषण प्रकरणातून झाली होती बदली

कोल्हापूर : जातील तिथे ‘वादग्रस्त’ अशी लेबल लागलेले औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव २००९-१० मध्ये कोल्हापूरमध्ये चांगलेच वादग्रस्त ठरले. महिला पोलीस लैंगिक अत्याचार प्रकरणामधून त्यांची तडकाफडकी बदली झाली. त्यांच्या कारकिर्दीत खादी वर्दीला लागलेला बदनामीचा डाग खात्याला अद्यापही पुसता आलेला नाही.औरंगाबादमधील मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी मारहाण केल्याने पोलीस आयुक्त यादव यांना शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविले. या प्रकरणावरून पुन्हा यादव राज्यभर चर्चेत आले. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून यशस्वी यादव यांनी २००९ मध्ये पदभार स्वीकारला होता.

सुरुवातीपासून त्यांनी स्वत:ची ‘दबंग’ पर्सनॅलिटी ठेवली होती. त्यांच्या अवतीभवती नेहमी पोलिसांची फौज असायची. डोळ्यांवर किमती गॉगल अशा रुबाबात त्यांनी दीड वर्ष कार्यभार सांभाळला. त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांनी त्यांचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतला.

तत्कालीन गृह पोलीस उपअधीक्षक विजय परखाळे, ‘शाहूपुरी’चे तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे हे दोन अधिकारी महिला लैंगिक प्रकरणात चांगलेच गाजले. मुंडे यांचे हॉटेलमधील चित्रीकरण राज्यभर प्रसारित झाले.

या दोन अधिकाऱ्यांना पाठबळ दिल्यामुळे तर यशस्वी यादव चांगलेच अडचणीत आले. काही प्रमाणात त्यांचाही या प्रकरणात हात असल्याची चर्चा झाली. या तिन्ही अधिकाऱ्यांमुळे खात्यातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली होती.पोलीस अधीक्षक यादव यांचा अवैध व्यावसायिकांवर वचक नव्हता; त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र अवैध व्यवसाय फोफावले होते. गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व वाढले होते. कायदा व सुव्यवस्था पूर्णत: हाताबाहेर गेली होती.

यादव हे नागरिकांत कधी सहभागी झालेच नाहीत; त्यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद दुरावला होता. त्यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच महिला लैंगिक अत्याचारामध्ये ते वादग्रस्त ठरले आणि त्यांची तडकाफडकी बदली झाली.

त्यांच्या कारर्किर्दीतील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणाची तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पोलीस महासंचालकांनी चौकशी लावली होती. याच कालावधीत त्यांच्या पत्नी जयश्री भोज-यादव ह्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर