शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

कोल्हापूर : अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवा, शिवसेनेची मोर्चाद्वारे महापालिकेकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 18:17 IST

राष्ट्रीय फेरीवाला धोरणांनुसार आधी सर्व फेरीवाले, विक्रेते, केबिनधारक या सर्वांचे योग्य पुनर्वसन करावे, मगच अतिक्रमण विरोधी कारवाई राबवावी. सध्या ‘अतिक्रमणा’च्या नावाखाली जी फेरीवाल्यांना उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू आहे ती त्वरित थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मंगळवारी फेरीवाल्यांच्या मोर्चाद्वारे केली.

ठळक मुद्देशिवसेनेच्यावतीने महानगरपालिकेवर मोर्चा काढून निदर्शने कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांच्या विविध मागण्यामोर्चेकऱ्यांनी दिले अतिरिक्त आयुक्तांना निवेदन

कोल्हापूर : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांनुसार आधी सर्व फेरीवाले, विक्रेते, केबिनधारक या सर्वांचे योग्य पुनर्वसन करावे, मगच अतिक्रमण विरोधी कारवाई राबवावी. सध्या ‘अतिक्रमणा’च्या नावाखाली जी फेरीवाल्यांना उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू आहे ती त्वरित थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मंगळवारी फेरीवाल्यांच्या मोर्चाद्वारे केली.शिवसेनेने फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मंगळवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक येथून शिवसेनेने हा फेरीवाल्यांचा मोर्चा काढला.

मोर्चा निवृत्ती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे महानगरपालिकेसमोर आला. त्यावेळी आमदार राजेश क्षीरसागरही मोर्चात सहभागी झाले. यावेळी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, इस्टेट विभाग प्रमुख प्रमोद बराले हे मोर्चाला सामोरे गेले. आमदार क्षीरसागर यांनी पाटणकर यांना निवेदन देऊन अतिक्रमणविरोधी कारवाई आधी थांबवा, अशी मागणी केली.

कोल्हापूरसह महाराष्ट्रातून आलेल्या विक्रेत्यांना, फेरीवाल्यांना आधी जागा द्या, नंतरच बिहार, उत्तर प्रदेश येथून आलेल्यांना जागा द्यावी, अशीही त्यांनी मागणी केली.महानगरपालिका करत असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे शहरातील अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

उपासमारीची वेळ त्यांच्यावर येत आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आधी राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक असताना कायद्याचा बडगा दाखवत फेरीवाल्यांवर केलेला अन्याय अत्यंत जुलमी आहे.

हातावरचे पोट असलेल्या फेरीवाल्यांवरील कारवाई त्वरित थांबवावी, असे निवेदन मोर्चेकऱ्यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले.

ताराबाई रोड, महाद्वार रोड परिसरातील फेरीवाल्यांचे पुनर्वसन आहे त्याच जागी करण्यात यावे, अन्यथा सरस्वती चित्रमंदिरजवळील मोकळ्या जागेत संकुल उभे करून त्या ठिकाणी फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, असा पर्यायसुद्धा निवेदनात देण्यात आला आहे.

मोर्चाचे नेतृत्व आमदार क्षीरसागर यांच्यासह धनाजी दळवी, दीपक गौड, किशोर घाटगे, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, शामराव जाधव यांनी केले.

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना