शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

कोल्हापूर : शिरोळ नगरपरिषद : स्वतंत्र लढल्याने भाजप-शिवसेनेचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:06 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचा खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना हा महत्त्वाचा घटक होणार असून, या तिन्हींच्या आघाडीच्या पहिल्या विजयाची नोंद सोमवारी शिरोळ नगरपरिषदेत झाली.

ठळक मुद्देशिरोळ नगरपरिषद : स्वतंत्र लढल्याने भाजप-शिवसेनेचा पराभवदोन्ही काँग्रेससह ‘स्वाभिमानी’च्या आघाडीचा विजय

विश्वास पाटील

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचा खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना हा महत्त्वाचा घटक होणार असून, या तिन्हींच्या आघाडीच्या पहिल्या विजयाची नोंद सोमवारी शिरोळ नगरपरिषदेत झाली.

या नगरपरिषदेत सत्ताधारी भाजपला धूळ चारून नगराध्यक्षासह दहा जागा जिंकून सत्ता काबीज केली. या विजयामुळे हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याच्या हालचालींना वेग येणार आहे. भाजप-शिवसेना स्वतंत्र लढली तर त्यांचा पराभव होऊ शकतो याचेही प्रत्यंतर या निकालाने दिले आहे.गेल्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि खासदार शेट्टी यांनी पुुढाकार घेऊन महाआघाडी स्थापन केली व दोन्ही काँग्रेसच्या विरोधातील सर्व पक्षांची एकत्रित मोट बांधून महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

राज्यात व केंद्रात सत्तांतर झाले, आता शेतकऱ्यांनाही अच्छे दिन येतील असे वाटत असतानाच मोदी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या रागातून खासदार शेट्टी यांनी मोदी यांच्या नेतृत्वाविरुद्धच रणशिंग फुंकले.

आता शेट्टी हे केंद्र व राज्यातूनही भाजपचे सरकार उलथवून टाका यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे त्यांचे दोन्ही काँग्रेससोबत आघाडी करण्याचे निश्चित झाले आहे. संघटनेची आघाडी ही काँग्रेसशी होणार आहे. त्या आघाडीची लिटमस चाचणी घेणारी निवडणूक म्हणून शिरोळच्या निवडणुकीकडे पाहिले गेले.शिरोळची नगरपरिषद म्हणून ही पहिलीच निवडणूक होती. तिथे मावळत्या सभागृहात ‘गोकुळ’चे संचालक व भाजपचे नेते अनिल यादव यांची सत्ता होती. तिथे शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र यड्रावकर हे एकत्र आले. त्यांना पडद्यामागून काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांनी ताकद दिली. त्यामुळे सत्तेचा गुलाल मिळाला. भाजपने स्वबळावर लढूनही चांगले यश मिळविले आहे. यापूर्वी काँग्रेस विरुद्ध अन्य सर्व पक्ष असे चित्र असे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध अन्य सर्व पक्ष असे चित्र दिसले.

शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील व ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी बहुजन विकास आघाडी केली; परंतु त्यांना मतदारांनी स्वीकारले नाही. शिवसेनेचा भाजपसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न होता; परंतु भाजपने त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यांची युती झाली असती तर त्यांचीच सत्ता आली असती, हे वेगळे सांगायची गरज नाही.

नगरपरिषदेचे एकूण मतदान २१ हजार ७३१ आहे. एका नगरपरिषदेच्या निकालाचा फारसा परिणाम शिरोळ विधानसभा निवडणुकीवरही होणार नाही; परंतु कोण कुणासोबत जाणार व कुणाची काय अडचण होणार याचे आडाखे बांधण्यासाठी म्हणून मात्र या निकालाचा नक्कीच उपयोग होणार आहे.

नगरपरिषदेत एकत्र आलेल्या स्वाभिमानी व दोन्ही काँग्रेसची विधानसभेलाही मोठीच पंचाईत होणार आहे. कारण या तिन्ही पक्षांकडे विधानसभेचे उमेदवार लांगा घालून तयार आहेत. स्वाभिमानी काँग्रेससोबत राज्य आघाडीत सहभागी झाल्यास संघटनेचा या जागेवर दावा असेल. त्यावेळी या तिन्ही पक्षांचीही मोठीच कोंडी होणार आहे. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरBJPभाजपा