शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

कोल्हापूर : आमदार, खासदारांसह शाहू छत्रपती यांनी मोर्चात सहभागी व्हावे, सकल मराठा समाजाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 11:51 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या गाडी मोर्चात शाहू छत्रपती, जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार यांच्यासह समस्त मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.

ठळक मुद्देआमदार, खासदारांसह शाहू छत्रपती यांनी मोर्चात सहभागी व्हावेसकल मराठा समाजाचे आवाहन

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या गाडी मोर्चात शाहू छत्रपती, जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार यांच्यासह समस्त मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.सलग ४२ दिवस झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने आंदोलन मागे घ्यावे यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणासह २२ मागण्यांचे लेखी आश्वासन सरकारने दिले होते. मात्र सरकारने अद्याप एकाही मागणीची पूर्तता केलेली नाही.

सरकार वारंवार मराठा समाजाची फसवणूक करीत असल्याने दबाव निर्माण करण्याकरिता कोल्हापुरातून २६ नोव्हेंबर रोजी विधानभवनावर राज्यव्यापी गाडी मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा यशस्वी होण्याकरिता शाहू छत्रपती, ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्यासह जिल्ह्यातील तीन खासदार, सर्वपक्षीय आमदारांनी सहभागी व्हावे, अशी आमची अपेक्षा असून त्यांना व्यक्तिश: भेटून तसे आवाहन करणार आहोत, असे मुळीक यांनी सांगितले.मंगळवारी (दि. १३) इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शाहू छत्रपती यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांना मोर्चाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शहराबाहेर एका कार्यक्रमात व्यस्त राहिल्याने संपर्क झाला नाही. मराठा समाजाच्या आंदोलनात पहिल्यापासून शाहू छत्रपती स्वत:हून सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांचे मोर्चात असणे महत्त्वाचे आहे. येत्या दोन दिवसांत त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहोत, असेही मुळीक यांनी स्ष्ट केले.

विचारविनिमय व्हायला हवादरम्यान, २६ नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत आपल्याशी कोणी संपर्क साधला नाही किंवा कोणी प्रत्यक्ष भेटूनही माहितीही दिलेली नाही, असे स्पष्टीकरण शाहू छत्रपती यांनी दिले. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे गुरुवारी सादर झाला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूरकरांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.

तोपर्यंत हा अहवाल कसा असेल, त्यातील शिफारशी काय आहेत, यावर विचारविनिमय व्हायला हवा, अभ्यास व्हायला पाहिजे. आम्ही पहिल्यापासून आंदोलनात आहोत, यापुढेही अग्रभागी असू. मात्र पुढचे निर्णय घेत असताना सामुदायिक विचारविनिमय, चर्चा व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा शाहू छत्रपती यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर