शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कोल्हापूर : आमदार, खासदारांसह शाहू छत्रपती यांनी मोर्चात सहभागी व्हावे, सकल मराठा समाजाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 11:51 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या गाडी मोर्चात शाहू छत्रपती, जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार यांच्यासह समस्त मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.

ठळक मुद्देआमदार, खासदारांसह शाहू छत्रपती यांनी मोर्चात सहभागी व्हावेसकल मराठा समाजाचे आवाहन

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या गाडी मोर्चात शाहू छत्रपती, जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार यांच्यासह समस्त मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.सलग ४२ दिवस झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने आंदोलन मागे घ्यावे यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणासह २२ मागण्यांचे लेखी आश्वासन सरकारने दिले होते. मात्र सरकारने अद्याप एकाही मागणीची पूर्तता केलेली नाही.

सरकार वारंवार मराठा समाजाची फसवणूक करीत असल्याने दबाव निर्माण करण्याकरिता कोल्हापुरातून २६ नोव्हेंबर रोजी विधानभवनावर राज्यव्यापी गाडी मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा यशस्वी होण्याकरिता शाहू छत्रपती, ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्यासह जिल्ह्यातील तीन खासदार, सर्वपक्षीय आमदारांनी सहभागी व्हावे, अशी आमची अपेक्षा असून त्यांना व्यक्तिश: भेटून तसे आवाहन करणार आहोत, असे मुळीक यांनी सांगितले.मंगळवारी (दि. १३) इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शाहू छत्रपती यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांना मोर्चाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शहराबाहेर एका कार्यक्रमात व्यस्त राहिल्याने संपर्क झाला नाही. मराठा समाजाच्या आंदोलनात पहिल्यापासून शाहू छत्रपती स्वत:हून सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांचे मोर्चात असणे महत्त्वाचे आहे. येत्या दोन दिवसांत त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहोत, असेही मुळीक यांनी स्ष्ट केले.

विचारविनिमय व्हायला हवादरम्यान, २६ नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत आपल्याशी कोणी संपर्क साधला नाही किंवा कोणी प्रत्यक्ष भेटूनही माहितीही दिलेली नाही, असे स्पष्टीकरण शाहू छत्रपती यांनी दिले. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे गुरुवारी सादर झाला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूरकरांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.

तोपर्यंत हा अहवाल कसा असेल, त्यातील शिफारशी काय आहेत, यावर विचारविनिमय व्हायला हवा, अभ्यास व्हायला पाहिजे. आम्ही पहिल्यापासून आंदोलनात आहोत, यापुढेही अग्रभागी असू. मात्र पुढचे निर्णय घेत असताना सामुदायिक विचारविनिमय, चर्चा व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा शाहू छत्रपती यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर