शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

कोल्हापूर : आमदार, खासदारांसह शाहू छत्रपती यांनी मोर्चात सहभागी व्हावे, सकल मराठा समाजाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 11:51 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या गाडी मोर्चात शाहू छत्रपती, जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार यांच्यासह समस्त मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.

ठळक मुद्देआमदार, खासदारांसह शाहू छत्रपती यांनी मोर्चात सहभागी व्हावेसकल मराठा समाजाचे आवाहन

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या गाडी मोर्चात शाहू छत्रपती, जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार यांच्यासह समस्त मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.सलग ४२ दिवस झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने आंदोलन मागे घ्यावे यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणासह २२ मागण्यांचे लेखी आश्वासन सरकारने दिले होते. मात्र सरकारने अद्याप एकाही मागणीची पूर्तता केलेली नाही.

सरकार वारंवार मराठा समाजाची फसवणूक करीत असल्याने दबाव निर्माण करण्याकरिता कोल्हापुरातून २६ नोव्हेंबर रोजी विधानभवनावर राज्यव्यापी गाडी मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा यशस्वी होण्याकरिता शाहू छत्रपती, ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्यासह जिल्ह्यातील तीन खासदार, सर्वपक्षीय आमदारांनी सहभागी व्हावे, अशी आमची अपेक्षा असून त्यांना व्यक्तिश: भेटून तसे आवाहन करणार आहोत, असे मुळीक यांनी सांगितले.मंगळवारी (दि. १३) इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शाहू छत्रपती यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांना मोर्चाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शहराबाहेर एका कार्यक्रमात व्यस्त राहिल्याने संपर्क झाला नाही. मराठा समाजाच्या आंदोलनात पहिल्यापासून शाहू छत्रपती स्वत:हून सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांचे मोर्चात असणे महत्त्वाचे आहे. येत्या दोन दिवसांत त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहोत, असेही मुळीक यांनी स्ष्ट केले.

विचारविनिमय व्हायला हवादरम्यान, २६ नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत आपल्याशी कोणी संपर्क साधला नाही किंवा कोणी प्रत्यक्ष भेटूनही माहितीही दिलेली नाही, असे स्पष्टीकरण शाहू छत्रपती यांनी दिले. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे गुरुवारी सादर झाला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूरकरांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.

तोपर्यंत हा अहवाल कसा असेल, त्यातील शिफारशी काय आहेत, यावर विचारविनिमय व्हायला हवा, अभ्यास व्हायला पाहिजे. आम्ही पहिल्यापासून आंदोलनात आहोत, यापुढेही अग्रभागी असू. मात्र पुढचे निर्णय घेत असताना सामुदायिक विचारविनिमय, चर्चा व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा शाहू छत्रपती यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर