शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कोल्हापूर :वाफेच्या तंत्रज्ञानाने खर्च, श्रम, इंधनाची बचत : बिलेनबर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:48 IST

शाहू मार्केट यार्ड येथील छत्रपती शाहू सहकारी गूळ खरेदी-विक्री संघातर्फे संघाच्या हॉल येथे आयोजित नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे संपूर्णत: वाफेवर गूळ निर्मिती मार्गदर्शन कार्यक्रमात अमेरिकेच्या व्हीलेज इंडस्ट्रीयल पॉवर कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी कार्ल बिलेनबर्ग प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देवाफेच्या तंत्रज्ञानाने खर्च, श्रम, इंधनाची बचत : बिलेनबर्ग वाफेवर गूळनिर्मितीच्या तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन कार्यक्रमशाहू गूळ खरेदी-विक्री संघातर्फे आयोजन

कोल्हापूर : नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे पूर्णपणे वाफेवर गूळ निर्मिती केल्यास खर्च, श्रम आणि इंधनाची बचत होते. त्यामुळे हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे, असे प्रतिपादन अमेरिकेच्या व्हीलेज इंडस्ट्रीयल पॉवर कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी कार्ल बिलेनबर्ग यांनी गुरुवारी येथे केले.शाहू मार्केट यार्ड येथील छत्रपती शाहू सहकारी गूळ खरेदी-विक्री संघातर्फे संघाच्या हॉल येथे आयोजित नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे संपूर्णत: वाफेवर गूळ निर्मिती मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

यावेळी संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील, कृषी विभागाचे कोल्हापूर विभागीय सहसंचालक महावीर जंगटे, सेंद्रीय शेतीतज्ज्ञ ज्योतिकुमार पाटील, पश्चिम महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे आदींची होती.बिलेनबर्ग म्हणाले, साखर कारखान्यात बगॅस जाळून वाफ तयार करून रस उकळला जातो. यासाठी जे काही इंधन जळते व त्यातून मिळणाऱ्या वाफेतून एकाचवेळी एकापेक्षा अधिक काहिलींना ही ऊर्जा मिळते. त्याच पद्धतीने वाफेवर गूळ निर्मिती करण्याची पद्धत आहे. यामुळे वेळ, श्रम, इंधनाची बचत होते. यापूर्वी केनियामध्ये या नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे वाफेवर आंब्याच्या रस गरम करून उत्पादन तयार करण्यात आले आहे.

महाराष्ट्रत उसाचे उत्पादन जादा आहे. त्यामध्ये अजूनही गूळनिर्मितीकडे शेतकऱ्यांचा ओढा असल्याने त्यांना या नवतंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी प्रसार केला जात आहे. या नवतंत्रज्ञानासाठी देशातील मुख्य केंद्र हे पुण्यातील उरळी कांचन येथे करण्यात येणार आहे.महावीर जंगटे म्हणाले, सेंद्रीय गुळाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर निर्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे. खर्च व मनुष्यबळ कमी लागत असल्याने वाफेवर गूळ निर्मितीच्या नवतंत्रज्ञानाचा चांगल्या पद्धतीने वापर होईल. त्याचबरोबर राज्य सरकारने नवीन कृषी उद्योगांसाठी ‘मुख्यमंत्री कृषी प्रक्रिया योजना’ आणली आहे. त्यामध्ये गुळाचाही समावेश करण्यात आला आहे.राजाराम पाटील यांनी वाफेवर गूळनिर्मितीच्या तंत्रज्ञानाचा कोल्हापूरात प्रकल्प करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, सेंद्रीय घटक वापरून अन्न व औषध प्रशासनाच्या नियमावलीनुसार गूळनिर्मिती केल्याबद्दल तुगरी (ता. उदगीर, जि. लातूर) येथील कैलास पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarket Yardमार्केट यार्ड