शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सांगलीत ‘शत-प्रतिशत’ खड्डेमुक्ती, युद्धपातळीवर प्रयत्न करून अधिकाऱ्यांनी केले काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 14:54 IST

कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील रस्ते शत-प्रतिशत खड्डेमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याचे या खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूरचे असल्याने अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून या दोन्ही जिल्ह्यांतील हे काम पूर्ण केले आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हयात होते १०३१ किलोमीटरमध्ये खड्डे सांगली जिल्ह्यात होते ११२१ किलोमीटरमध्ये खड्डे खड्डे भरण्याचे काम सुमारे १५० कंत्राटदारांकडे खड्डे भरण्यासाठी सुमारे ६ कोटी रुपये खर्च

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील रस्ते शत-प्रतिशत खड्डेमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याचे या खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूरचे असल्याने अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून या दोन्ही जिल्ह्यांतील हे काम पूर्ण केले आहे.कोल्हापूर जिल्हयात १०९६ किलोमीटरचे राज्य रस्ते आहेत. त्यातील ६८७ किलोमीटरच्या रस्त्यामध्ये खड्डे होते तर प्रमुख जिल्हा मार्ग १५२२ किलोमीटरचे आहेत. त्यातील १०३१ किलोमीटरमध्ये खड्डे होते.

सांगली जिल्ह्यात १२४१ किलोमीटरचे राज्य रस्ते आहेत. त्यातील ७४३ किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये खड्डे होते तर प्रमुख जिल्हा मार्ग १९१८ किलोमीटरचे आहेत. त्यातील ११२१ किलोमीटरमध्ये खड्डे होते. या दोन्ही जिल्ह्यांतील रस्त्यांचे खड्डे भरण्याचे काम सुमारे १५० कंत्राटदारांकडे दिले होते व त्यासाठी सुमारे ६ कोटी रुपये खर्च आला.

 

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याने सुरुवातीपासूनच या कामामध्ये आघाडी घेतली होती. या खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील जे १७ जिल्हे खड्डेमुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. त्यात या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. शासनाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे हे खड्डे भरण्यात आले आहेत.- सदाशिव साळुंखे, अधीक्षक अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरSangliसांगली