शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लोक जागा दाखवतील या भीतीनेच राज्यकर्ते निवडणुका टाळताहेत, शरद पवार यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 15:36 IST

Kolhapur: लोक जागा दाखवतील अशी भीती वाटत असल्यानेच राज्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला तयार नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना मांडले.

- विश्वास पाटीलकोल्हापूर - लोक जागा दाखवतील अशी भीती वाटत असल्यानेच राज्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला तयार नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना मांडले. ज्यांची जागा निवडून आणण्याची क्षमता आहे, त्यांनीच ती जागा लढविण्याचा आग्रह धरावा, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असून ती महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत मांडणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पवार शुक्रवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रात माझ्या ठिकठिकाणी सभा झाल्या. त्यामध्ये लोकमाणस बदलत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामध्ये मुख्यत: दोन गोष्टी मला दिसतात. एक तर मूळ भाजपबद्दल लोकांत नाराजी आहे आणि दुसरे त्यांना ज्या घटकांनी गेल्या काही महिन्यांत पाठिंबा दिला त्यांच्याबद्दलही विशेषत: तरुणांत आणि इतर समाजातही कमालीची नाराजी दिसत आहे. ही नाराजी पाहूनच राज्यकर्ते महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्यायला तयार नाहीत. या निवडणुकीत लोक जागा दाखवतील, अशी चिंता त्यांना वाटते. त्याचा परिणाम आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांवर होईल म्हणून त्यांनी या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत.यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, आर.के. पोवार आदी उपस्थित होते.

पवार-मुश्रीफ यांनी केलं ते मान्य नाही ईडीच्या भीतीने नव्हे, तर अजित पवार यांची पक्षात घुसमट होत होती म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो, असे मुश्रीफ म्हणतात. अशी विचारणा केल्यावर पवार म्हणाले, त्यांच्या घरी ईडीचे पथक आल्यावर कोल्हापूरकरांनी निदर्शने केल्याचे मला माहीत आहे; परंतु त्यांनी भाजपसोबत जावे यासाठी अशी काही निदर्शने झाल्याचे मला कुठं समजलं नाही. या मंडळींनी (पवार-मुश्रीफ) जे केलं ते पक्ष म्हणून आम्हाला मान्य नाही, असे पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

राज्यकर्त्यांना शेतीच्या प्रश्नांची चिंता नाहीराज्यातील राज्यकर्त्यांना शेतीच्या प्रश्नांबद्दल ज्ञान आणि आस्थाही नसल्याची टीका पवार यांनी केली. ते म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शेती क्षेत्राच्या ज्ञानाचा अनुभव मला नाही. कदाचित ते ज्ञानी असतील; परंतु ते ज्ञान प्रत्यक्ष कधी बघायला मिळालेले नाही. दुष्काळी स्थिती, कांद्याचा प्रश्न, दूध, साखर उद्योगाच्या अडचणी याबद्दल त्यांनी गांभीर्याने चर्चा केल्याचे दिसले नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांना शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल आस्था नाही, ही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे, असेही पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर