शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

कोल्हापूर : रस्ते नागरी वस्तीतून नको, गायरानमधून न्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:32 AM

कोल्हापूर : प्रादेशिक योजनेतील रेखांकन व नियमावलीत राहिलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी कोल्हापुरात राजारामपुरीतील नगररचना विभागात गुरुवारपासून चारसदस्यीय समितीसमोर फेरसुनावणीला प्रारंभ झाला आहे. सलग तीन दिवसांत करवीर तालुक्यातील नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी होत आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी मोरेवाडी, पाचगाव, टोप-संभापूर, गोकुळ शिरगाव, कणेरी, वसगडे या गावांची सुनावणी घेतली. बहुतांश ग्रामस्थांची नागरी वस्तीतील ...

ठळक मुद्दे करवीर तालुक्यातील हरकतींवर तीन दिवस सुनावणीप्रादेशिक आराखड्याची फेरसुनावणी : हरकतदारांच्या तक्रारी;

कोल्हापूर : प्रादेशिक योजनेतील रेखांकन व नियमावलीत राहिलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी कोल्हापुरात राजारामपुरीतील नगररचना विभागात गुरुवारपासून चारसदस्यीय समितीसमोर फेरसुनावणीला प्रारंभ झाला आहे. सलग तीन दिवसांत करवीर तालुक्यातील नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी होत आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी मोरेवाडी, पाचगाव, टोप-संभापूर, गोकुळ शिरगाव, कणेरी, वसगडे या गावांची सुनावणी घेतली. बहुतांश ग्रामस्थांची नागरी वस्तीतील प्रस्तावित रस्त्याबाबत हरकती घेतल्याचे दिसून आले.

जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्याबाबत जिल्ह्यातून सुमारे दहा हजार तक्रारी दाखल झाल्या होत्या. गेल्या वर्षी याबाबत नागरिक व संस्थांच्या हरकतींवर सुनावणी झाली. तरीही सुमारे २००० तक्रारदारांचे निराकरण झाले नाही. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन हरकतदारांचे समाधान करणार असल्याचे आश्वासन एका हरकतदारांच्या शिष्ठमंडळाला दिले होते. त्यामुळे पहिल्या सुनावणीवेळी ज्यांचे समाधान झाले नाही, त्यांच्या हरकतीवर फेरसुनावणीचे नियोजन केले. या फेरसुनावणी नगररचना विभागाचे उपसंचालक शिवराज पाटील, निवृत्त उपसंचालक वाय. एस. कुलकर्णी, नगररचनाकार मिलिंद किणेकर, सहायक नगररचनाकार संजय चव्हाण यांच्यासमोर सुरू आहे.

पहिल्या टप्प्यात गुरुवारपासून शनिवारपर्यंत तीन दिवस करवीर तालुक्यातील फेरसुनावणी सुरू केली आहे. प्रत्येक दिवशी किमान १५० हरकतीवर सुनावणी घेण्यात येत आहे. जिल्ह्याचा ७० टक्के भाग हा बृहत् आराखड्यात समाविष्ट केला आहे; त्यामुळे या बृहत आराखड्यातील त्रुटी असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्स या संस्थेकडूनही दाखविण्यात येणार आहेत.

दरम्यान, गुरुवारी पहिल्या दिवशी मोरेवाडी, पाचगाव, टोप, संभापूर, गोकुळ शिरगाव, कणेरी, वसगडे या गावांतील लेखी तक्रारी घेऊन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले; पण फेरसुनावणीवेळी लेखी हरकती घेतल्यानंतर त्यांची अनेक ग्रामस्थांनी पोहोच मागितली; पण ती देण्यास या समितीने नकार दिला. त्यावरून समिती आणि हरकतदार ग्रामस्थ यांच्यात वादावादीचे प्रसंग उद्भवत होते.गुरुवारी झालेल्या तक्रारी ह्या गावातून जाणाºया प्रस्तावित रस्त्याबाबत आहेत. गावातून अनेक रस्ते सुरू आहेत. मग राजकीय लोकांनी अतिक्रमित केलेले रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याऐवजी खासगी जमिनींतून रस्ते निर्माण करण्याची उठाठेव कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करून गावानजीक गायरान जमिनी असताना नागरी वस्तीतून अगर शेतीतून हे रस्ते करू नयेत, अशाही तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या.

तीन दिवस करवीर तालुका, त्यानंतर इतर तालुक्यांतील हरकती ऐकून घेण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व हरकतींवर फेरसुनावणी पूर्ण करून भौगोलिक संलग्नता पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. त्याबाबतचा अहवालही शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.- शिवराज पाटील, उपसंचालक, नगररचना, प्रादेशिक योजना, कोल्हापूर. 

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकkolhapurकोल्हापूर