शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कोल्हापूर : बिंदू चौक सबजेलजवळ पाण्यासाठी रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 16:04 IST

गेल्या दोन वर्षापासून अपूऱ्या व कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्याला वैतागलेल्या नागरीकांनी शुक्रवारी बिंदू चौक सबजेल परिसरात रस्तारोको आंदोलन करुन महापालिका पाणी पुरवठा विभागाचा निषेध केला. तसेच या विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सोमवारपासून सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देबिंदू चौक सबजेलजवळ पाण्यासाठी रास्तारोकोमहापालिका पाणी पुरवठा विभागाचा निषेध

कोल्हापूर : गेल्या दोन वर्षापासून अपूऱ्या व कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्याला वैतागलेल्या नागरीकांनी शुक्रवारी बिंदू चौक सबजेल परिसरात रस्तारोको आंदोलन करुन महापालिका पाणी पुरवठा विभागाचा निषेध केला. तसेच या विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सोमवारपासून सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.बिंदू चौक सबजेल ते करवीर नगर वाचनमंदिर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला रहात असलेल्या नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. या परिसराला गेल्या दोन वर्षापासून दिवसभरात एक तास तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा होत असतो. त्यातून नागरीकांची गरज भागत नाही. त्यामुळे नागरीकांनी भागातील नगरसेविक हसिना फरास यांच्याकडे तक्रारी केल्या. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र या प्रश्नाकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही. त्यामुळे नागरीकांतून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.ऐन सणासुदीच्या दिवसातही नागरीकांना पाणी मिळाले नसल्याने शुक्रवारी या परिसरातील नागरीकांचा उद्रेक झाला. सतप्त महिलांनी घागरी, बादल्या हाती घेऊन रस्त्यावर येत रास्ता रोको आंदोलन सुरु केले. अचानक झालेल्या या रास्तारोको मुळे या मार्गावरील वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात आली.

दरम्यान, या भागाचे नगरसेविका हसिना फरास, आदिल फरास यांनाही संपर्क साधून रास्तारोको झाल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांचे नातेवाईक रुग्णालयात अत्यवस्त असल्याने ते दोघेही रुग्णालयात थांबून होते. त्यांनी भागातील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सुरवसे यांना फोनवरुन नागरीकांना भेटून त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्या असे सांगितले.सुरवसे यांनी नागरीकांची भेट घेतली. पण पाणी कधी सोडणार ते आधी सांगा, इतके दिवस तक्रारी करत असतानाही दखल का घेतली नाही अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर सुरु केली. पाणी पुरवठ्याचे नवीन नियोजन केले असून येत्या सोमवारपासून सुरळीत पाणी मिळेल, तोपर्यंत पाण्याचे टॅँकर दिले जातील असे सुरवसे यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलन मागे घेतले.

२५ लाखाचा निधी फुकट गेलानगरसेविका हसिना फरास महापौर असताना त्यांनी त्यांच्या बजेटमधून २५ लाखाचा निधी उपलब्ध करुन देऊन परिसरातील नागरीकांच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचे ठरविले होते. हा भाग उंचवट्यावर असल्याने पाणी कमी मिळते, म्हणून खर्चाच्या पाण्यासाठी एका विहिरीवर मोटार बसवून चावीद्वारे हे पाणी द्यायचे नियोजन फरास यांनी केले होते. त्यासाठी २५ लाखाची तरतुद केली होते. परंतु आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी हे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे निधी फुकट गेलाच शिवाय नागरीकांचा पश्नही तेथेच राहिला.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीkolhapurकोल्हापूर