शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बिंदू चौक सबजेलजवळ पाण्यासाठी रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 16:04 IST

गेल्या दोन वर्षापासून अपूऱ्या व कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्याला वैतागलेल्या नागरीकांनी शुक्रवारी बिंदू चौक सबजेल परिसरात रस्तारोको आंदोलन करुन महापालिका पाणी पुरवठा विभागाचा निषेध केला. तसेच या विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सोमवारपासून सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देबिंदू चौक सबजेलजवळ पाण्यासाठी रास्तारोकोमहापालिका पाणी पुरवठा विभागाचा निषेध

कोल्हापूर : गेल्या दोन वर्षापासून अपूऱ्या व कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्याला वैतागलेल्या नागरीकांनी शुक्रवारी बिंदू चौक सबजेल परिसरात रस्तारोको आंदोलन करुन महापालिका पाणी पुरवठा विभागाचा निषेध केला. तसेच या विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सोमवारपासून सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.बिंदू चौक सबजेल ते करवीर नगर वाचनमंदिर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला रहात असलेल्या नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. या परिसराला गेल्या दोन वर्षापासून दिवसभरात एक तास तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा होत असतो. त्यातून नागरीकांची गरज भागत नाही. त्यामुळे नागरीकांनी भागातील नगरसेविक हसिना फरास यांच्याकडे तक्रारी केल्या. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र या प्रश्नाकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही. त्यामुळे नागरीकांतून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.ऐन सणासुदीच्या दिवसातही नागरीकांना पाणी मिळाले नसल्याने शुक्रवारी या परिसरातील नागरीकांचा उद्रेक झाला. सतप्त महिलांनी घागरी, बादल्या हाती घेऊन रस्त्यावर येत रास्ता रोको आंदोलन सुरु केले. अचानक झालेल्या या रास्तारोको मुळे या मार्गावरील वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात आली.

दरम्यान, या भागाचे नगरसेविका हसिना फरास, आदिल फरास यांनाही संपर्क साधून रास्तारोको झाल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांचे नातेवाईक रुग्णालयात अत्यवस्त असल्याने ते दोघेही रुग्णालयात थांबून होते. त्यांनी भागातील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सुरवसे यांना फोनवरुन नागरीकांना भेटून त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्या असे सांगितले.सुरवसे यांनी नागरीकांची भेट घेतली. पण पाणी कधी सोडणार ते आधी सांगा, इतके दिवस तक्रारी करत असतानाही दखल का घेतली नाही अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर सुरु केली. पाणी पुरवठ्याचे नवीन नियोजन केले असून येत्या सोमवारपासून सुरळीत पाणी मिळेल, तोपर्यंत पाण्याचे टॅँकर दिले जातील असे सुरवसे यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलन मागे घेतले.

२५ लाखाचा निधी फुकट गेलानगरसेविका हसिना फरास महापौर असताना त्यांनी त्यांच्या बजेटमधून २५ लाखाचा निधी उपलब्ध करुन देऊन परिसरातील नागरीकांच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचे ठरविले होते. हा भाग उंचवट्यावर असल्याने पाणी कमी मिळते, म्हणून खर्चाच्या पाण्यासाठी एका विहिरीवर मोटार बसवून चावीद्वारे हे पाणी द्यायचे नियोजन फरास यांनी केले होते. त्यासाठी २५ लाखाची तरतुद केली होते. परंतु आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी हे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे निधी फुकट गेलाच शिवाय नागरीकांचा पश्नही तेथेच राहिला.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीkolhapurकोल्हापूर