शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : माजी राजारामिन्स वृक्षरोपणाद्वारे जपणार आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 10:46 IST

महाविद्यालयात घालविलेल्या आठवणी वृक्षाच्या माध्यमातून आयुष्यभर जपण्यासाठी राजाराम महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्दे माजी राजारामिन्स वृक्षरोपणाद्वारे जपणार आठवणीअनोखा उपक्रम; पाच हजार झाडे लावणार

प्रदीप शिंदे

कोल्हापूर : महाविद्यालयातील दिवस आठवताच प्रत्येकाच्या मनात कोलाहल सुरू होतो, तो महाविद्यालयात घालविलेल्या आठवणींचा. मित्रमैत्रिणींसोबत केलेली दंगा-मस्ती, सर्वांनी मिळून साजरे केलेले डे, वर्गातील बाकांवर कोरलेली नावे... हे क्षण पुन्हा कधीही अनुभवता येणार नाहीत, याची जाणीव प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना नेहमीच असते. मात्र याच आठवणी वृक्षाच्या माध्यमातून आयुष्यभर जपण्यासाठी राजाराम महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.

माजी राजारामियन्स ग्रुपचे सदस्य.राजाराम महाविद्यालयाला १३८ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. या महाविद्यालयातून अनेक दिग्गज घडले. महाविद्यालयात असताना अनेक गटातटांची टोकाची ईर्ष्या असायची. मात्र कॉलेज संपल्यानंतर अभिमानाने सर्वजण राजारामियन्स असे सांगताच, महाविद्यालयाप्रती असलेली आत्मीयता आणि कॉलेजच्या आठवणी अखंडपणे जपण्यासाठी या राजारामियन्सनी पुढाकार घेतला आहे.

कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालय परिसरात उपक्रमात सहभागी माजी राजारामियन्स ग्रुपचे सदस्य.

माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन माजी राजारामियन्स ग्रुपची स्थापना केली आहे. दरवर्षी हे विद्यार्थी एकत्र येऊन स्नेहमेळावा घेतात. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देतात. मात्र याच आठवणी जपण्यासाठी, त्यांना सामाजिक बांधीलकीची झालर देत वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम या सर्वांनी हाती घेतला आहे. महाविद्यालयाच्या परिसरात पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. यासाठी प्राचार्य, प्राध्यापक यांच्यासह माजी विद्यार्थ्यांची समिती बनविली आहे. त्यानुसार कामाचे नियोजन केले जात आहे.

प्रत्येक झाडाला नावमहाविद्यालयाच्या परिसरात माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. केवळ झाडे लावून काम संपणार नाही; तर ती झाडे त्या माजी विद्यार्थ्यांना दत्तक देऊन त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. प्रत्येक झाडाची नोंदही केली जाणार आहे.

कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालय परिसरात पाच हजार झाडे लावण्याचा उपक्रमात सहभागी माजी राजारामियन्स ग्रुपचे सदस्य.

माजी विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार दत्तक झाडाला नावही दिले जाणार आहे. वर्षभरात त्या झाडाची निगा कशी राखण्यात येते, हे पाहण्यासाठी त्याच परिसरातील एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या माध्यमातून जोपासलेल्या झाडांची पाहणी करून चांगले झाड संगोपन करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कारही करण्यात येणार आहे.

मंगळवारी श्रमदानदुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होत चालली आहे. भीषण परिस्थितीपुढे सर्वजण हतबल झाले आहेत. भविष्यातील दुष्काळी संकटाचा मुकाबला करण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मंगळवारी सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत महाविद्यालयाच्या परिसरात श्रमदान करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी विद्यार्थ्यांच्या वतीने केले आहे.

आपल्या आठवणी जपामहाविद्यालयातील ते दिवस आयुष्यात पुन्हा कधी येणार नाहीत. मात्र त्या आठवणी वृक्षाच्या स्वरूपात जपण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. ही झाडे पर्यावरणपूरक असणार आहेत. सध्या २००० खड्डे या ठिकाणी मारलेले आहेत. हा सर्व खर्च माजी विद्यार्थी स्वत: करीत आहेत.शशिकांत पाटील,माजी जीएस, राजाराम महाविद्यालय

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालयenvironmentवातावरण