शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

कोल्हापूर : माजी राजारामिन्स वृक्षरोपणाद्वारे जपणार आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 10:46 IST

महाविद्यालयात घालविलेल्या आठवणी वृक्षाच्या माध्यमातून आयुष्यभर जपण्यासाठी राजाराम महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्दे माजी राजारामिन्स वृक्षरोपणाद्वारे जपणार आठवणीअनोखा उपक्रम; पाच हजार झाडे लावणार

प्रदीप शिंदे

कोल्हापूर : महाविद्यालयातील दिवस आठवताच प्रत्येकाच्या मनात कोलाहल सुरू होतो, तो महाविद्यालयात घालविलेल्या आठवणींचा. मित्रमैत्रिणींसोबत केलेली दंगा-मस्ती, सर्वांनी मिळून साजरे केलेले डे, वर्गातील बाकांवर कोरलेली नावे... हे क्षण पुन्हा कधीही अनुभवता येणार नाहीत, याची जाणीव प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना नेहमीच असते. मात्र याच आठवणी वृक्षाच्या माध्यमातून आयुष्यभर जपण्यासाठी राजाराम महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.

माजी राजारामियन्स ग्रुपचे सदस्य.राजाराम महाविद्यालयाला १३८ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. या महाविद्यालयातून अनेक दिग्गज घडले. महाविद्यालयात असताना अनेक गटातटांची टोकाची ईर्ष्या असायची. मात्र कॉलेज संपल्यानंतर अभिमानाने सर्वजण राजारामियन्स असे सांगताच, महाविद्यालयाप्रती असलेली आत्मीयता आणि कॉलेजच्या आठवणी अखंडपणे जपण्यासाठी या राजारामियन्सनी पुढाकार घेतला आहे.

कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालय परिसरात उपक्रमात सहभागी माजी राजारामियन्स ग्रुपचे सदस्य.

माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन माजी राजारामियन्स ग्रुपची स्थापना केली आहे. दरवर्षी हे विद्यार्थी एकत्र येऊन स्नेहमेळावा घेतात. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देतात. मात्र याच आठवणी जपण्यासाठी, त्यांना सामाजिक बांधीलकीची झालर देत वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम या सर्वांनी हाती घेतला आहे. महाविद्यालयाच्या परिसरात पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. यासाठी प्राचार्य, प्राध्यापक यांच्यासह माजी विद्यार्थ्यांची समिती बनविली आहे. त्यानुसार कामाचे नियोजन केले जात आहे.

प्रत्येक झाडाला नावमहाविद्यालयाच्या परिसरात माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. केवळ झाडे लावून काम संपणार नाही; तर ती झाडे त्या माजी विद्यार्थ्यांना दत्तक देऊन त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. प्रत्येक झाडाची नोंदही केली जाणार आहे.

कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालय परिसरात पाच हजार झाडे लावण्याचा उपक्रमात सहभागी माजी राजारामियन्स ग्रुपचे सदस्य.

माजी विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार दत्तक झाडाला नावही दिले जाणार आहे. वर्षभरात त्या झाडाची निगा कशी राखण्यात येते, हे पाहण्यासाठी त्याच परिसरातील एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या माध्यमातून जोपासलेल्या झाडांची पाहणी करून चांगले झाड संगोपन करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कारही करण्यात येणार आहे.

मंगळवारी श्रमदानदुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होत चालली आहे. भीषण परिस्थितीपुढे सर्वजण हतबल झाले आहेत. भविष्यातील दुष्काळी संकटाचा मुकाबला करण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मंगळवारी सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत महाविद्यालयाच्या परिसरात श्रमदान करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी विद्यार्थ्यांच्या वतीने केले आहे.

आपल्या आठवणी जपामहाविद्यालयातील ते दिवस आयुष्यात पुन्हा कधी येणार नाहीत. मात्र त्या आठवणी वृक्षाच्या स्वरूपात जपण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. ही झाडे पर्यावरणपूरक असणार आहेत. सध्या २००० खड्डे या ठिकाणी मारलेले आहेत. हा सर्व खर्च माजी विद्यार्थी स्वत: करीत आहेत.शशिकांत पाटील,माजी जीएस, राजाराम महाविद्यालय

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालयenvironmentवातावरण