शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘उज्ज्वला’चे उर्वरित ३० हजार लाभार्थी मार्चपर्यंत पूर्ण करणार: अलोक कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 16:02 IST

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४५ हजार लाभार्थ्यांना गॅस जोडणी दिली आहे. आता १८ डिसेंबरपासून दुसरा टप्पा सुरू झाला असून, मार्चपर्यंत उर्वरित ३० हजार जणांना गॅस जोडणी देण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती हिंदुस्थान पेट्रोलियमचे वरिष्ठ अधिकारी अलोक कुमार यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे ‘उज्ज्वला’चे उर्वरित ३० हजार लाभार्थी मार्चपर्यंत पूर्ण करणार: अलोक कुमारआतापर्यंत १ लाख ४५ हजार जणांना गॅस जोडणी

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४५ हजार लाभार्थ्यांना गॅस जोडणी दिली आहे. आता १८ डिसेंबरपासून दुसरा टप्पा सुरू झाला असून, मार्चपर्यंत उर्वरित ३० हजार जणांना गॅस जोडणी देण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती हिंदुस्थान पेट्रोलियमचे वरिष्ठ अधिकारी अलोक कुमार यांनी  पत्रकार परिषदेत दिली.अलोक कुमार म्हणाले, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मार्चपर्यंत ‘बीपीएल’ कुटुंबांच्या महिला सदस्यांना पाच कोटी गॅस जोडणी कनेक्शन आणि मार्च २०२० पर्यंत अतिरिक्त तीन कोटी गॅस जोडणी करण्यासाठी १२,८०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. ही योजना केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केली आहे. आज या योजनेने पाच कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

या योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात येणार असून नवीन ७ वर्ग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, अंत्योदय अन्न योजना, वनवासी, सर्वाधिक मागासवर्गीय, टीए आणि एक्स बेट गार्डन जमाती, बेटे तसेच नदीबेटांवर राहणारे लोक यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. तसेच पिवळे रेशनकार्ड धारक व गरीब कुटुंबातील लोकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांवरील कॅबिनेट समितीने गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्याचा नवीन निर्णय दिला आहे. ज्या गरीब कुटुंबांना गॅस, स्टोव्ह खरेदी करण्यासाठी प्रथम आगाऊ पैसे भरता येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध केली आहे. यावेळी थोरात गॅस एजन्सीचे व्यवस्थापक सागर पाटील उपस्थित होते.

जिल्ह्यात १ लाख ४५ हजार गॅस जोडण्याजिल्ह्यात या योजनेंतर्गत ९१ टक्के लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. योजनेंतर्गत ‘एचपीसी’ने ८० हजार, ‘बीपीसी’चे ३५ हजार, ‘आयओसी’चे ३० हजार २०० असे मिळून १ लाख ४५ हजार २०० लाभार्थ्यांना गॅस जोडण्या दिल्या आहेत. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर