शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागामध्ये यंदा उसाचे गाळप ५३ लाख टनाने घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:51 IST

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुरामुळे नदी व ओढ्याकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या पुरात आठ-दहा दिवस, तर दुसऱ्यांदा आलेल्या पुरात पाच-सहा दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने तो कुजला आहे.

ठळक मुद्दे कारखान्यांचा ठोकताळा : महापुराचा फटका; तीन महिनेच हंगाम!

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : महापुराने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल्याने यंदा कोल्हापूर विभागात कसाबसा १ कोटी ७२ लाख टन ऊसच साखर कारखान्यांकडे गाळपासाठी येईल. गतवर्षीपेक्षा तब्बल ५३ लाख टन उसाच्या उत्पादनात घट होणार असल्याने हंगाम जेमतेम तीन महिनेच चालण्याचा ठोकताळा कारखान्यांचा आहे. सर्वाधिक फटका कोल्हापूर जिल्ह्यात बसणार आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुरामुळे नदी व ओढ्याकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या पुरात आठ-दहा दिवस, तर दुसऱ्यांदा आलेल्या पुरात पाच-सहा दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने तो कुजला आहे. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक काळ पुराचे पाणी राहिल्याने तिथे मोठे नुकसान झाले आहे. तीच परिस्थिती सांगली जिल्ह्यातही पुराच्या पाण्याने झाली. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात ६१ हजार ९९९ हेक्टरवरील ऊस पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले.

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने घेतलेल्या आढाव्यात आगामी हंगामातील उसाच्या उत्पादनाचा अंदाज आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १०५ लाख, तर सांगली जिल्ह्यात ६७ लाख टन उसाचे गाळप होईल.गेल्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात १३५ लाख टन, तर सांगलीत ९० लाख टन उसाचे गाळप झाले होते. या तुलनेत यंदा कोल्हापुरात ३० लाख, तर सांगलीत २३ लाख टनाने उसाच्या उत्पादनात घट होईल, असा अंदाज साखर विभागाचा आहे.१५ नोव्हेंबरनंतरच हंगामाला प्रारंभ!उसाची कमतरता आणि साखर उतारा पाहता, १ डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्याच्या हालचाली सरकारच्या पातळीवर आहेत; पण पुणे विभागात उसाचे उत्पादन चांगले होईल, असा अंदाज असल्याने १ नोव्हेंबरपासूनच हंगामाला परवानगी द्यावी, अशी तेथील कारखानदारांची मागणी आहे, तर कोल्हापूर विभागात तीन महिनेच हंगाम चालेल एवढाच ऊस आहे. फेबु्रवारी फार तर मार्चच्या दुसºया आठवड्यात हंगाम संपणार असल्याने उताºयासाठी हंगाम उशिरा सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरनंतरच धुराडी पेटणार हे निश्चित आहे.

उघडीप नसल्याने वाढ खुंटलीसाधारणत: आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात उसाची वाढ जोमात होते. २००५ मध्येही महापुरात ऊसपिकाचे मोठे नुकसान झाले होते; पण पूर ओसरल्यानंतर ऊन पडल्याने पुरात सापडलेल्या उसासह उर्वरित उसाची वाढ होण्यास मदत झाली होती. पण यावेळेला आॅगस्टसह सप्टेंबरच्या निम्म्यापर्यंत वाढीस पोषक वातावरणच न राहिल्याने उसाची वाढ खुंटल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

महापुरामुळे उसाचे नुकसान झाले आहेच, त्याचबरोबर अपेक्षित वाढ नसल्याने उत्पादन घटणार आहे. आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये उसाची जोमाने वाढ होते, पण या काळातच पावसाने झोडपून काढल्याने वाढ खुंटली आहे.- विजय औताडे,साखर उद्योगातील तज्ज्ञ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर