शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कोल्हापूर विभागामध्ये यंदा उसाचे गाळप ५३ लाख टनाने घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:51 IST

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुरामुळे नदी व ओढ्याकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या पुरात आठ-दहा दिवस, तर दुसऱ्यांदा आलेल्या पुरात पाच-सहा दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने तो कुजला आहे.

ठळक मुद्दे कारखान्यांचा ठोकताळा : महापुराचा फटका; तीन महिनेच हंगाम!

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : महापुराने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल्याने यंदा कोल्हापूर विभागात कसाबसा १ कोटी ७२ लाख टन ऊसच साखर कारखान्यांकडे गाळपासाठी येईल. गतवर्षीपेक्षा तब्बल ५३ लाख टन उसाच्या उत्पादनात घट होणार असल्याने हंगाम जेमतेम तीन महिनेच चालण्याचा ठोकताळा कारखान्यांचा आहे. सर्वाधिक फटका कोल्हापूर जिल्ह्यात बसणार आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुरामुळे नदी व ओढ्याकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या पुरात आठ-दहा दिवस, तर दुसऱ्यांदा आलेल्या पुरात पाच-सहा दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने तो कुजला आहे. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक काळ पुराचे पाणी राहिल्याने तिथे मोठे नुकसान झाले आहे. तीच परिस्थिती सांगली जिल्ह्यातही पुराच्या पाण्याने झाली. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात ६१ हजार ९९९ हेक्टरवरील ऊस पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले.

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने घेतलेल्या आढाव्यात आगामी हंगामातील उसाच्या उत्पादनाचा अंदाज आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १०५ लाख, तर सांगली जिल्ह्यात ६७ लाख टन उसाचे गाळप होईल.गेल्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात १३५ लाख टन, तर सांगलीत ९० लाख टन उसाचे गाळप झाले होते. या तुलनेत यंदा कोल्हापुरात ३० लाख, तर सांगलीत २३ लाख टनाने उसाच्या उत्पादनात घट होईल, असा अंदाज साखर विभागाचा आहे.१५ नोव्हेंबरनंतरच हंगामाला प्रारंभ!उसाची कमतरता आणि साखर उतारा पाहता, १ डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्याच्या हालचाली सरकारच्या पातळीवर आहेत; पण पुणे विभागात उसाचे उत्पादन चांगले होईल, असा अंदाज असल्याने १ नोव्हेंबरपासूनच हंगामाला परवानगी द्यावी, अशी तेथील कारखानदारांची मागणी आहे, तर कोल्हापूर विभागात तीन महिनेच हंगाम चालेल एवढाच ऊस आहे. फेबु्रवारी फार तर मार्चच्या दुसºया आठवड्यात हंगाम संपणार असल्याने उताºयासाठी हंगाम उशिरा सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरनंतरच धुराडी पेटणार हे निश्चित आहे.

उघडीप नसल्याने वाढ खुंटलीसाधारणत: आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात उसाची वाढ जोमात होते. २००५ मध्येही महापुरात ऊसपिकाचे मोठे नुकसान झाले होते; पण पूर ओसरल्यानंतर ऊन पडल्याने पुरात सापडलेल्या उसासह उर्वरित उसाची वाढ होण्यास मदत झाली होती. पण यावेळेला आॅगस्टसह सप्टेंबरच्या निम्म्यापर्यंत वाढीस पोषक वातावरणच न राहिल्याने उसाची वाढ खुंटल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

महापुरामुळे उसाचे नुकसान झाले आहेच, त्याचबरोबर अपेक्षित वाढ नसल्याने उत्पादन घटणार आहे. आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये उसाची जोमाने वाढ होते, पण या काळातच पावसाने झोडपून काढल्याने वाढ खुंटली आहे.- विजय औताडे,साखर उद्योगातील तज्ज्ञ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर