शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचं प्रीपेड कार्ड... रिचार्ज करा, मनसोक्त फिरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 18:23 IST

सुट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांत होणारे वाद हे एसटी महामंडळाला नित्याचे झाले आहेत. त्यामुळे ही कटकट बंद करण्यासाठी आणि प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने कॅशलेस ‘स्मार्ट कार्ड’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देरिचार्ज करा आणि एस. टी. प्रवास कराएक मेपासून महामंडळातर्फे प्री-पेड कार्ड देणारप्रवास होणार सुखकारकसाधी, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध गाडीचा घेता येणार फायदा...सुट्या पैशांचा वाद मिटणार

कोल्हापूर : सुट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांत होणारे वाद हे एसटी महामंडळाला नित्याचे झाले आहेत. त्यामुळे ही कटकट बंद करण्यासाठी आणि प्रवाशी संख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने कॅशलेस ‘स्मार्ट कार्ड’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे प्रवाशांना या कार्डवर विशिष्ट रक्कम भरल्यास कुटुंबातील सदस्यांसह कुठेही प्रवास करता येणार आहे. ही योजना एक मेपासून संपूर्ण राज्यात सुरू होणार आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कॅशलेस ‘स्मार्ट कार्ड’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, एक मेपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेंतर्गत प्रवाशांना ५० रुपयांचे स्मार्टकार्ड घ्यावे लागणार आहे. त्यावर सुरुवातीला किमान पाचशे रुपये भरणे आवश्यक आहे.

त्यानंतर किमान शंभर रुपयांच्या पटीत कितीही पैसे भरता येणार आहेत. हे स्मार्ट कार्ड एकप्रकारचे प्री-पेड कार्ड असणार आहे. या योजनेचा लाभ प्रवाशांना येत्या महाराष्ट्र दिनापासून घेता येणार असून, एस.टी.च्या प्रत्येक आगारात हे स्मार्ट कार्ड मिळणार आहे.एस.टी.कडून मासिक पास दिले जातात. मोठ्या संख्येने प्रवासी त्याचा लाभही घेत आहेत. मात्र, हा पास हस्तांतरणीय नसल्याने आणि प्रवास करावाच लागेल याची हमी नसल्याने अनेक प्रवासी पास घेत नसत.

आता स्मार्टकार्डच्या माध्यमातून नागरिकांना एक चांगला पर्याय समोर आला आहे. अनेकदा दूरच्या प्रवासामध्ये प्रवासी खासगी वाहनांचाही अवलंब करतात; परंतु या स्मार्ट काडर्मुळे एस. टी. लाच प्राधान्य दिले जाईल.

या गाडीचा घेता येणार फायदा...एसटीची साधी बस, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी आणि अश्वमेध या कोणत्याही बसने प्रवास करणे यामुळे शक्य होणार आहे. प्रत्येक प्रवाशाने केलेल्या प्रवासाचेच पैसे त्या कार्डामधून वजा होत राहतील. हे कार्ड रिचार्ज करण्याची सोय एसटीच्या आगारांमध्ये असेल, त्याबरोबरच आॅनलाईनदेखील रिचार्ज करता येणार आहे.

सुट्या पैशांचा वाद मिटणाररोख पैशांचा संबंध येणार नसल्याने सुट्या पैशांची चिंता राहणार नाही. त्यामुळे प्रवासी-वाहकांची यातून सुटका होणार आहे. परिणामी, प्रवाशांचा प्रवास सुखकर होऊन वाद-विवाददेखील टाळले जाऊ शकतात. त्यामुळे खिशात सुट्टे पैसे आहेत की नाहीत, याची आता चिंता करण्याची गरज नाही.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूरShivshahiशिवशाही