शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

एसटीचं प्रीपेड कार्ड... रिचार्ज करा, मनसोक्त फिरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 18:23 IST

सुट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांत होणारे वाद हे एसटी महामंडळाला नित्याचे झाले आहेत. त्यामुळे ही कटकट बंद करण्यासाठी आणि प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने कॅशलेस ‘स्मार्ट कार्ड’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देरिचार्ज करा आणि एस. टी. प्रवास कराएक मेपासून महामंडळातर्फे प्री-पेड कार्ड देणारप्रवास होणार सुखकारकसाधी, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध गाडीचा घेता येणार फायदा...सुट्या पैशांचा वाद मिटणार

कोल्हापूर : सुट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांत होणारे वाद हे एसटी महामंडळाला नित्याचे झाले आहेत. त्यामुळे ही कटकट बंद करण्यासाठी आणि प्रवाशी संख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने कॅशलेस ‘स्मार्ट कार्ड’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे प्रवाशांना या कार्डवर विशिष्ट रक्कम भरल्यास कुटुंबातील सदस्यांसह कुठेही प्रवास करता येणार आहे. ही योजना एक मेपासून संपूर्ण राज्यात सुरू होणार आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कॅशलेस ‘स्मार्ट कार्ड’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, एक मेपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेंतर्गत प्रवाशांना ५० रुपयांचे स्मार्टकार्ड घ्यावे लागणार आहे. त्यावर सुरुवातीला किमान पाचशे रुपये भरणे आवश्यक आहे.

त्यानंतर किमान शंभर रुपयांच्या पटीत कितीही पैसे भरता येणार आहेत. हे स्मार्ट कार्ड एकप्रकारचे प्री-पेड कार्ड असणार आहे. या योजनेचा लाभ प्रवाशांना येत्या महाराष्ट्र दिनापासून घेता येणार असून, एस.टी.च्या प्रत्येक आगारात हे स्मार्ट कार्ड मिळणार आहे.एस.टी.कडून मासिक पास दिले जातात. मोठ्या संख्येने प्रवासी त्याचा लाभही घेत आहेत. मात्र, हा पास हस्तांतरणीय नसल्याने आणि प्रवास करावाच लागेल याची हमी नसल्याने अनेक प्रवासी पास घेत नसत.

आता स्मार्टकार्डच्या माध्यमातून नागरिकांना एक चांगला पर्याय समोर आला आहे. अनेकदा दूरच्या प्रवासामध्ये प्रवासी खासगी वाहनांचाही अवलंब करतात; परंतु या स्मार्ट काडर्मुळे एस. टी. लाच प्राधान्य दिले जाईल.

या गाडीचा घेता येणार फायदा...एसटीची साधी बस, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी आणि अश्वमेध या कोणत्याही बसने प्रवास करणे यामुळे शक्य होणार आहे. प्रत्येक प्रवाशाने केलेल्या प्रवासाचेच पैसे त्या कार्डामधून वजा होत राहतील. हे कार्ड रिचार्ज करण्याची सोय एसटीच्या आगारांमध्ये असेल, त्याबरोबरच आॅनलाईनदेखील रिचार्ज करता येणार आहे.

सुट्या पैशांचा वाद मिटणाररोख पैशांचा संबंध येणार नसल्याने सुट्या पैशांची चिंता राहणार नाही. त्यामुळे प्रवासी-वाहकांची यातून सुटका होणार आहे. परिणामी, प्रवाशांचा प्रवास सुखकर होऊन वाद-विवाददेखील टाळले जाऊ शकतात. त्यामुळे खिशात सुट्टे पैसे आहेत की नाहीत, याची आता चिंता करण्याची गरज नाही.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूरShivshahiशिवशाही