शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

एसटीचं प्रीपेड कार्ड... रिचार्ज करा, मनसोक्त फिरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 18:23 IST

सुट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांत होणारे वाद हे एसटी महामंडळाला नित्याचे झाले आहेत. त्यामुळे ही कटकट बंद करण्यासाठी आणि प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने कॅशलेस ‘स्मार्ट कार्ड’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देरिचार्ज करा आणि एस. टी. प्रवास कराएक मेपासून महामंडळातर्फे प्री-पेड कार्ड देणारप्रवास होणार सुखकारकसाधी, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध गाडीचा घेता येणार फायदा...सुट्या पैशांचा वाद मिटणार

कोल्हापूर : सुट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांत होणारे वाद हे एसटी महामंडळाला नित्याचे झाले आहेत. त्यामुळे ही कटकट बंद करण्यासाठी आणि प्रवाशी संख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने कॅशलेस ‘स्मार्ट कार्ड’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे प्रवाशांना या कार्डवर विशिष्ट रक्कम भरल्यास कुटुंबातील सदस्यांसह कुठेही प्रवास करता येणार आहे. ही योजना एक मेपासून संपूर्ण राज्यात सुरू होणार आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कॅशलेस ‘स्मार्ट कार्ड’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, एक मेपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेंतर्गत प्रवाशांना ५० रुपयांचे स्मार्टकार्ड घ्यावे लागणार आहे. त्यावर सुरुवातीला किमान पाचशे रुपये भरणे आवश्यक आहे.

त्यानंतर किमान शंभर रुपयांच्या पटीत कितीही पैसे भरता येणार आहेत. हे स्मार्ट कार्ड एकप्रकारचे प्री-पेड कार्ड असणार आहे. या योजनेचा लाभ प्रवाशांना येत्या महाराष्ट्र दिनापासून घेता येणार असून, एस.टी.च्या प्रत्येक आगारात हे स्मार्ट कार्ड मिळणार आहे.एस.टी.कडून मासिक पास दिले जातात. मोठ्या संख्येने प्रवासी त्याचा लाभही घेत आहेत. मात्र, हा पास हस्तांतरणीय नसल्याने आणि प्रवास करावाच लागेल याची हमी नसल्याने अनेक प्रवासी पास घेत नसत.

आता स्मार्टकार्डच्या माध्यमातून नागरिकांना एक चांगला पर्याय समोर आला आहे. अनेकदा दूरच्या प्रवासामध्ये प्रवासी खासगी वाहनांचाही अवलंब करतात; परंतु या स्मार्ट काडर्मुळे एस. टी. लाच प्राधान्य दिले जाईल.

या गाडीचा घेता येणार फायदा...एसटीची साधी बस, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी आणि अश्वमेध या कोणत्याही बसने प्रवास करणे यामुळे शक्य होणार आहे. प्रत्येक प्रवाशाने केलेल्या प्रवासाचेच पैसे त्या कार्डामधून वजा होत राहतील. हे कार्ड रिचार्ज करण्याची सोय एसटीच्या आगारांमध्ये असेल, त्याबरोबरच आॅनलाईनदेखील रिचार्ज करता येणार आहे.

सुट्या पैशांचा वाद मिटणाररोख पैशांचा संबंध येणार नसल्याने सुट्या पैशांची चिंता राहणार नाही. त्यामुळे प्रवासी-वाहकांची यातून सुटका होणार आहे. परिणामी, प्रवाशांचा प्रवास सुखकर होऊन वाद-विवाददेखील टाळले जाऊ शकतात. त्यामुळे खिशात सुट्टे पैसे आहेत की नाहीत, याची आता चिंता करण्याची गरज नाही.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूरShivshahiशिवशाही