शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

कोल्हापूर : पानपट्टीधारकांच्या प्रश्नांबाबत अधिवेशनात आवाज उठवू : राजेश क्षीरसागर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:10 IST

राज्यातील पानपट्टीधारकांच्या विविध प्रश्नांबाबत येत्या विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले. कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत यांना मुंबई येथे स्वर्गीय शरद राव स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल अरुण सावंत गौरव समितीतर्फे शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देपानपट्टीधारकांच्या प्रश्नांबाबत अधिवेशनात आवाज उठवू : राजेश क्षीरसागर  अरुण सावंत यांचा गौरव समारंभ

कोल्हापूर : राज्यातील पानपट्टीधारकांच्या विविध प्रश्नांबाबत येत्या विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले. कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत यांना मुंबई येथे स्वर्गीय शरद राव स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल अरुण सावंत गौरव समितीतर्फे शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.आमदार क्षीरसागर म्हणाले, सावंत म्हणजे तरुणांना लाजवेल असे चिरतरुण व्यक्तिमत्त्व आहे. प्रत्येक गोष्ट अभ्यास करूनच त्यात पाऊल टाकणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे अरुण सावंत आहेत. त्यांनी जिल्ह्यातील पानपट्टीधारकांना एकत्रित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबई, दिल्ली, आदी ठिकाणी अनेक वेळा चकरा मारून प्रयत्न केले. त्यातून शासन रोज एक नवीन जाचक अटी आणू पाहत आहे. अशावेळी मी आपल्या असोसिएशनच्या पाठीशी सदैव ठाम उभा राहीन.

राज्य शासनाचा एक घटकपक्ष असलो तरी मी ज्या प्रमाणे धनदांडग्या दारू दुकानदारांकरिता राज्य शासनाने महामार्गालगतच्या दुकानांवर दारू विक्री करण्यासाठी बंदी घातली होती. मात्र, काही महिन्यांतच ही बंदी उठविली. त्याप्रमाणे गेल्या सहा वर्षांपासून पानपट्टीमध्ये सुंगधी तंबाखू विक्री करण्यासही बंदी घातली आहे. तीही उठवावी. याकरिता मी स्वत: येत्या विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून राज्यातील ५ ते ७ लाख पानपट्टीधारकांचा रोजीरोटीचा प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न करेन.

यावेळी महाराष्ट्र पान व्यापारी असोसिएशनचे राज्य अध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी संघटनेला बांधून ठेवण्यासाठी सावंत यांच्या रूपाने एक स्तंभ मिळाल्याची भावना व्यक्त केली. तर संघटनेचे तांत्रिक सल्लागार हेमांग शहा, व्यावसायिक गिरीश शहा, सांगलीचे पदाधिकारी रत्नाकर नांगरे, आदींनी मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना सावंत म्हणाले, मुंबई ज्या दोन थोर व्यक्तींच्यामुळे एका हाकेत बंद पडू शकत होती. अशा एका व्यक्तिमत्त्वाच्या अर्थात कामगार नेते शरद राव यांच्या स्मृतीनिमित्त पुरस्कार मिळाला. ही बाब माझ्यासाठी निश्चितच गौरवास्पद आहे. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या संघटनेतील सर्व सभासद, सदस्यांचा आहे.

विशेष म्हणजे माझ्या प्रत्येक कार्यात सदैव सावलीप्रमाणे उभी असणाऱ्या पत्नीमुळे मला हे शक्य झाले आहे. असेही सावंत यांनी प्रांजळपणे कबूल केले. यावेळी उद्योजक रौनक घोडावत, रमेश इंगळे, रवि सावंत, शरद मोरे, विजय पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Rajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरkolhapurकोल्हापूर