शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

कोल्हापूर : पानपट्टीधारकांच्या प्रश्नांबाबत अधिवेशनात आवाज उठवू : राजेश क्षीरसागर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:10 IST

राज्यातील पानपट्टीधारकांच्या विविध प्रश्नांबाबत येत्या विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले. कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत यांना मुंबई येथे स्वर्गीय शरद राव स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल अरुण सावंत गौरव समितीतर्फे शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देपानपट्टीधारकांच्या प्रश्नांबाबत अधिवेशनात आवाज उठवू : राजेश क्षीरसागर  अरुण सावंत यांचा गौरव समारंभ

कोल्हापूर : राज्यातील पानपट्टीधारकांच्या विविध प्रश्नांबाबत येत्या विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले. कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत यांना मुंबई येथे स्वर्गीय शरद राव स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल अरुण सावंत गौरव समितीतर्फे शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.आमदार क्षीरसागर म्हणाले, सावंत म्हणजे तरुणांना लाजवेल असे चिरतरुण व्यक्तिमत्त्व आहे. प्रत्येक गोष्ट अभ्यास करूनच त्यात पाऊल टाकणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे अरुण सावंत आहेत. त्यांनी जिल्ह्यातील पानपट्टीधारकांना एकत्रित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबई, दिल्ली, आदी ठिकाणी अनेक वेळा चकरा मारून प्रयत्न केले. त्यातून शासन रोज एक नवीन जाचक अटी आणू पाहत आहे. अशावेळी मी आपल्या असोसिएशनच्या पाठीशी सदैव ठाम उभा राहीन.

राज्य शासनाचा एक घटकपक्ष असलो तरी मी ज्या प्रमाणे धनदांडग्या दारू दुकानदारांकरिता राज्य शासनाने महामार्गालगतच्या दुकानांवर दारू विक्री करण्यासाठी बंदी घातली होती. मात्र, काही महिन्यांतच ही बंदी उठविली. त्याप्रमाणे गेल्या सहा वर्षांपासून पानपट्टीमध्ये सुंगधी तंबाखू विक्री करण्यासही बंदी घातली आहे. तीही उठवावी. याकरिता मी स्वत: येत्या विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून राज्यातील ५ ते ७ लाख पानपट्टीधारकांचा रोजीरोटीचा प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न करेन.

यावेळी महाराष्ट्र पान व्यापारी असोसिएशनचे राज्य अध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी संघटनेला बांधून ठेवण्यासाठी सावंत यांच्या रूपाने एक स्तंभ मिळाल्याची भावना व्यक्त केली. तर संघटनेचे तांत्रिक सल्लागार हेमांग शहा, व्यावसायिक गिरीश शहा, सांगलीचे पदाधिकारी रत्नाकर नांगरे, आदींनी मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना सावंत म्हणाले, मुंबई ज्या दोन थोर व्यक्तींच्यामुळे एका हाकेत बंद पडू शकत होती. अशा एका व्यक्तिमत्त्वाच्या अर्थात कामगार नेते शरद राव यांच्या स्मृतीनिमित्त पुरस्कार मिळाला. ही बाब माझ्यासाठी निश्चितच गौरवास्पद आहे. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या संघटनेतील सर्व सभासद, सदस्यांचा आहे.

विशेष म्हणजे माझ्या प्रत्येक कार्यात सदैव सावलीप्रमाणे उभी असणाऱ्या पत्नीमुळे मला हे शक्य झाले आहे. असेही सावंत यांनी प्रांजळपणे कबूल केले. यावेळी उद्योजक रौनक घोडावत, रमेश इंगळे, रवि सावंत, शरद मोरे, विजय पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Rajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरkolhapurकोल्हापूर