शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

महाराष्ट्रातील सोन्याच्या खाणीसाठी कोल्हापूरकरांचा ऐेंशीपासून पाठपुरावा

By संदीप आडनाईक | Updated: December 3, 2022 12:10 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूगर्भातही सोने असल्याची शक्यता पाहून राज्याच्या खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली आहे.

संदीप आडनाईककोल्हापूर : महाराष्ट्रात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोन्याच्या खाणी असल्याचा ठाम दावा १९८० पासून सातत्याने कोल्हापूर खनिकर्म विभागाचे अधिकारी रामसिंग हजारे आणि ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी हे करत आहेत. त्यांना विज्ञान प्रबोधिनी, शासकीय कर्मचारी संघटना, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोशिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव देसाई यांची साथ मिळाली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू असताना डॉ. एम.जी. ताकवले यांनी स्वतः नमुने घेऊन खातरजमा केली होती आणि आपला अहवाल तत्कालीन प्रभारी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि केंद्रीय खाणकाममंत्री श्रीपाद नाईक यांना सादर केला होता. त्याच्या मूळ प्रती अद्यापही उदय कुलकर्णी यांच्याकडे आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूगर्भातही सोने असल्याची शक्यता पाहून राज्याच्या खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली आहे. शिवाय दोन ठिकाणी सोन्याच्या खाणी असल्याचेही विभागाने जाहीर केले आहे; परंतु १९८० मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळणे आणि रेडीज येथील खाणीत सोन्याचे धातू आढळल्याचा अहवाल देण्यात आला होता. यासोबतच बेगमपूर आणि मंगळवेढ्याच्या नदीपात्रातही मौल्यवान धातूचे अंश आढळले होते. मात्र, आर्थिक कारणांमुळे यावर पुढची कार्यवाही झालेली नाही. बेगमपूर येथील वाळू आणि वडाची चार पोती पाने जाळल्यानंतर ०.६ मिलिग्रॅम सोने आढळले होते. यासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव देसाई, कुलगुरू डॉ. एम.जी. ताकवले यांच्यामार्फत खनिकर्मचे रामसिंग हजारे आणि उदय कुलकर्णी यांच्याकडील अहवाल तपासले आणि यात अशास्त्रीय काही नसल्याचे स्पष्ट केले आणि छायाचित्रकार अनिल वेल्हाळ यांनी रसायनशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक यांच्या पथकाने विद्यापीठामार्फत चाचण्या केल्या. स्वत: ताकवले यांनी हजारे यांच्या पद्धतीनुसार चाचण्या घेतल्या आणि नमुने घेतले. हा अहवाल तत्कालीन राज्यपाल, राष्ट्रपतींसोबतच तत्कालीन प्रभारी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि केंद्रीय खाणकाममंत्री श्रीपाद नाईक यांना सादर केला होता.

मान्यवरांची साथया प्रवासात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालीन केंद्रीय मंत्री मधू दंडवते, राज्यातील नेते दिग्विजय खानविलकर, गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. द.ना. धनागरेे, शासकीय कर्मचारी संघटनेचे मारुतराव वायंगणकर, गोखले महाविद्यालयातील भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. प्रभू आदींची साथ मिळाली होती. इंदिरा गांधी यांच्याकडील पत्रव्यवहारामुळे काही काळ लोहखनिजाची निर्यातही बंद झाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGoldसोनंsindhudurgसिंधुदुर्ग