शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कोल्हापूर : शेतकऱ्यांचा रस्त्यावरच ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:59 IST

अखिल भारतीय किसान सभेने सांगली ते कोल्हापूर अशी काढलेली पायी दिंडी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर जाण्याआधीच पोलिसांनी रोखली. मोर्चाची पूर्वकल्पना देऊनही पालकमंत्री गैरहजर राहिल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा निषेध नोंदवत रस्त्यावरच ठाण मांडत आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा निषेध करुन शेतकऱ्यांचा रस्त्यावरच ठिय्याकिसान सभेची पायी दिंडी पोलिसांनी रोखली : जानेवारीत बैठकीचे आश्वासन

कोल्हापूर : अखिल भारतीय किसान सभेने सांगली ते कोल्हापूर अशी काढलेली पायी दिंडी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर जाण्याआधीच पोलिसांनी रोखली. मोर्चाची पूर्वकल्पना देऊनही पालकमंत्री गैरहजर राहिल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा निषेध नोंदवत रस्त्यावरच ठाण मांडत आंदोलन सुरू केले.पालकमंत्र्याचे स्वीय सहायक बाळासाहेब यादव यांनी १ ते १० जानेवारीदरम्यान बैठक बोलावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच तब्बल अडीच तास रोखून धरलेला मार्ग आंदोलकांनी मोकळा केला.अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव सुभाष देशमुख व उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कावळा नाका येथील पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

नागपूर-रत्नागिरी महामार्गबाधित शेतकऱ्यांना न्याय द्या, देवस्थान इनाम वर्ग-३ ची जमीन खालसा करा, या मागण्यांसाठी सोमवारी सकाळपासून सांगलीतून शेतकऱ्यांच्या पायी दिंडीला सुरुवात झाली. १५० शेतकरी ५२ किलोमीटर अंतर चालत मंगळवारी दुपारी सव्वा वाजता कावळा नाका येथे आले.

जुन्या विश्रामगृहातील पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी ते जात असतानाच पोलिसांनी त्यांना रोखले. कार्यालयाचे फाटक बंद करून तेथे चाळीसभर पोलिसांचा पहारा ठेवल्याने चिडलेल्या आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. त्यामुळे कसबा बावड्याकडे जाणारी वाहतूक एकेरी करण्यात आली.आंदोलकांसमोर बोलताना उमेश देशमुख म्हणाले,‘ पालकमंत्र्यांनी अनुपस्थित राहून चालत आलेल्या शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. भेटीची वेळ दिल्याशिवाय येथून उठणार नाही.

उदय नारकर म्हणाले, पालकमंत्री स्वत:ला ‘दादा’ म्हणवतात; पण दादासारखे वागत नाहीत. ते उपस्थित राहून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतील असे वाटले होते; पण ते बोलतात तसे करीत नाहीत. प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी ‘सिटू’ आंदोलकांच्या मागे ठामपणे उभी राहील असे सांगितले. यावेळी दिगंबर कांबळे, गुलाब मुल्लाणी, सुभाष निकम, संभाजी यादव यांची उपस्थिती होती.

पोलिसांचीच संख्या जास्तआंदोलनस्थळी आंंदोलकांपेक्षा पोलिसांचीच संख्या जास्त होती. सांगलीपासून ते कोल्हापुरात येईपर्यंत या आंदोलकांच्या पुढे आणि मागे अशा दोन पोलीस गाड्या लावण्यात आल्या होत्या. कोल्हापुरात आंदोलक दाखल होण्यापूर्वी आणखी दोन गाड्या भरून पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले होते. राज्य राखीव पोलीस दलासह जवळपास २०० पोलिसांमुळे आंदोलनस्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप आले.

राजस्थानातून सुरुवातआंदोलनातील शेतकऱ्याला बंदोबस्तातील पोलिसाने ‘कशाला एवढ्या लांब उन्हातान्हात चालत आलाय?’ असे विचारले. यावर त्या शेतकऱ्यांने ‘आता सरकारला घरी घालवूनच परत जाणार आहे. राजस्थानातील शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे, आता पुढचा नंबर महाराष्ट्राचा आहे, अशी सूचक टिप्पणीही केली.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर