शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शेतकऱ्यांचा रस्त्यावरच ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:59 IST

अखिल भारतीय किसान सभेने सांगली ते कोल्हापूर अशी काढलेली पायी दिंडी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर जाण्याआधीच पोलिसांनी रोखली. मोर्चाची पूर्वकल्पना देऊनही पालकमंत्री गैरहजर राहिल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा निषेध नोंदवत रस्त्यावरच ठाण मांडत आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा निषेध करुन शेतकऱ्यांचा रस्त्यावरच ठिय्याकिसान सभेची पायी दिंडी पोलिसांनी रोखली : जानेवारीत बैठकीचे आश्वासन

कोल्हापूर : अखिल भारतीय किसान सभेने सांगली ते कोल्हापूर अशी काढलेली पायी दिंडी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर जाण्याआधीच पोलिसांनी रोखली. मोर्चाची पूर्वकल्पना देऊनही पालकमंत्री गैरहजर राहिल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा निषेध नोंदवत रस्त्यावरच ठाण मांडत आंदोलन सुरू केले.पालकमंत्र्याचे स्वीय सहायक बाळासाहेब यादव यांनी १ ते १० जानेवारीदरम्यान बैठक बोलावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच तब्बल अडीच तास रोखून धरलेला मार्ग आंदोलकांनी मोकळा केला.अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव सुभाष देशमुख व उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कावळा नाका येथील पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

नागपूर-रत्नागिरी महामार्गबाधित शेतकऱ्यांना न्याय द्या, देवस्थान इनाम वर्ग-३ ची जमीन खालसा करा, या मागण्यांसाठी सोमवारी सकाळपासून सांगलीतून शेतकऱ्यांच्या पायी दिंडीला सुरुवात झाली. १५० शेतकरी ५२ किलोमीटर अंतर चालत मंगळवारी दुपारी सव्वा वाजता कावळा नाका येथे आले.

जुन्या विश्रामगृहातील पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी ते जात असतानाच पोलिसांनी त्यांना रोखले. कार्यालयाचे फाटक बंद करून तेथे चाळीसभर पोलिसांचा पहारा ठेवल्याने चिडलेल्या आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. त्यामुळे कसबा बावड्याकडे जाणारी वाहतूक एकेरी करण्यात आली.आंदोलकांसमोर बोलताना उमेश देशमुख म्हणाले,‘ पालकमंत्र्यांनी अनुपस्थित राहून चालत आलेल्या शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. भेटीची वेळ दिल्याशिवाय येथून उठणार नाही.

उदय नारकर म्हणाले, पालकमंत्री स्वत:ला ‘दादा’ म्हणवतात; पण दादासारखे वागत नाहीत. ते उपस्थित राहून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतील असे वाटले होते; पण ते बोलतात तसे करीत नाहीत. प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी ‘सिटू’ आंदोलकांच्या मागे ठामपणे उभी राहील असे सांगितले. यावेळी दिगंबर कांबळे, गुलाब मुल्लाणी, सुभाष निकम, संभाजी यादव यांची उपस्थिती होती.

पोलिसांचीच संख्या जास्तआंदोलनस्थळी आंंदोलकांपेक्षा पोलिसांचीच संख्या जास्त होती. सांगलीपासून ते कोल्हापुरात येईपर्यंत या आंदोलकांच्या पुढे आणि मागे अशा दोन पोलीस गाड्या लावण्यात आल्या होत्या. कोल्हापुरात आंदोलक दाखल होण्यापूर्वी आणखी दोन गाड्या भरून पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले होते. राज्य राखीव पोलीस दलासह जवळपास २०० पोलिसांमुळे आंदोलनस्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप आले.

राजस्थानातून सुरुवातआंदोलनातील शेतकऱ्याला बंदोबस्तातील पोलिसाने ‘कशाला एवढ्या लांब उन्हातान्हात चालत आलाय?’ असे विचारले. यावर त्या शेतकऱ्यांने ‘आता सरकारला घरी घालवूनच परत जाणार आहे. राजस्थानातील शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे, आता पुढचा नंबर महाराष्ट्राचा आहे, अशी सूचक टिप्पणीही केली.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर