शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर : कुलगुरूंच्या पक्षपाती कृतीचा निषेध, ‘सुटा’च्या अधिसभा सदस्यांचे धरणे आंदोलन; बैठकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 18:20 IST

‘कुलगुरूंच्या पक्षपाती कृतीचा निषेध असो’, ‘प्रश्न, ठराव नाकारणाऱ्या कुलगुरुंचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) अधिसभा सदस्यांनी मंगळवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा निषेध केला. या सदस्यांनी धरणे आंदोलन करुन विद्यापीठाच्या अधिसभेवर बहिष्कार घातला.

ठळक मुद्देकुलगुरूंच्या पक्षपाती कृतीचा निषेध‘सुटा’च्या अधिसभा सदस्यांचे धरणे आंदोलनबैठकीवर बहिष्कार

कोल्हापूर : ‘कुलगुरूंच्या पक्षपाती कृतीचा निषेध असो’, ‘प्रश्न, ठराव नाकारणाऱ्या कुलगुरुंचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) अधिसभा सदस्यांनी मंगळवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा निषेध केला. या सदस्यांनी धरणे आंदोलन करुन विद्यापीठाच्या अधिसभेवर बहिष्कार घातला.‘सुटा’च्या अधिसभा सदस्यांनी सात ठराव आणि १८ प्रश्न हे अधिसभेसाठी विहित मुदतीमध्ये आणि विद्यापीठाच्या मार्गदर्शक निकषांनुसार सादर केले होते. यातील केवळ चार प्रश्न कुलगुरु डॉ. शिंदे यांनी स्वीकारले. कुलगुरुंनी जाणीवपूर्वक, पक्षपाती पद्धतीने आमचे प्रश्न वगळले असल्याचे सांगत सुटाच्या अधिसभा सदस्यांनी कुलगुरुंचा मंगळवारी निषेध केला.

या सदस्यांनी अधिसभेवर बहिष्कार घातला. त्यांनी अधिसभा सुरू असताना सभागृहाबाहेर ‘घटनाबाह्य सताकेंद्र म्हणून नेमलेल्या शैक्षणिक सल्लागारांची नियुक्ती रद्द करा’, ‘सदस्यांच्या लोकशाही हक्कांवर गदा आणणाऱ्यां कुलगुरुंचा निषेध असो’, अशी जोरदार घोषणाबाजीने कुलगुरुंचा निषेध केला. यानंतर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर धरणे आंदोलन केले.

दुपारी अर्थसंकल्पाबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर कुलगुरु डॉ. शिंदे यांनी सुटाच्या सदस्यांना सभागृहात चर्चेसाठी निमंत्रित केले. मात्र, या सदस्यांनी त्याला नकार देत आंदोलन कायम ठेवले. या आंदोलनात सुटाचे अधिसभा सदस्य प्रा. ए. बी. पाटील, एन. के. खंदारे, एम. डी. गुजर, आर. आर. थोरात, अरुण पाटील, इला जोगी, अलका निकम, सुटाचे जिल्हा समन्वयक सुधाकर मानकर, आदी सहभागी झाले.

बैठकीत अनेक मुद्यांवर मौनया आंदोलनापूर्वी सुटाच्या सदस्यांना कुलगुरू डॉ. शिंदे यांनी चर्चेसाठी बोलविले. सकाळी साडेदहा वाजता त्यांच्यातील चर्चा सुरू झाली. यात सुटा सदस्यांनी आमचे ठराव आणि प्रश्न का? नाकारले अशी विचारणा केली असता, यावर कुलगुरुंनी मौन बाळगल्याचे सुटाचे जिल्हा समन्वयक सुधाकर मानकर यांनी सांगितले.

ते म्हणाले, नामनिर्देशनातील चुका या सदस्यांनी दाखवून दिल्या. त्यावर कुलगुरुंनी हे गंभीर असल्याचे मत व्यक्त केले. साधारणत: पाऊण तास चाललेल्या बैठकीत आम्ही मांडलेल्या मुद्यांबाबत त्यांना काहीच ठोस सांगता आले नाही. त्यामुळे आमच्या सदस्यांनी अधिसभेवरील बहिष्कार कायम ठेवून धरणे आंदोलन केले. ठराव नाकारुन कुलगुरुंनी विद्यापीठाच्या परिनियमांची पायमल्ली केली आहे.

.

 

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूर