शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत सोमवारी, शुक्रवारी अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:59 IST

बाराही तालुक्यांतून येणाऱ्या अभ्यागतांच्या सोईसाठी सोमवार आणि शुक्रवारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत थांबणे अनिवार्य असल्याचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी काढले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनीही कोणती शिस्त पाळली पाहिजे, याबाबत या परिपत्रकात सविस्तर सूचना करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेत सोमवारी, शुक्रवारी अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्यअभ्यागतांच्या सोईसाठी कर्मचाऱ्यांनाही सीईओंच्या सूचना

कोल्हापूर : बाराही तालुक्यांतून येणाऱ्या अभ्यागतांच्या सोईसाठी सोमवार आणि शुक्रवारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत थांबणे अनिवार्य असल्याचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी काढले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनीही कोणती शिस्त पाळली पाहिजे, याबाबत या परिपत्रकात सविस्तर सूचना करण्यात आल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या अनुषंगाने अनेक वेळा चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर डॉ. खेमनार यांनी हे परिपत्रक काढले आहे. सोमवारी आणि शुक्रवारी सकाळी ११ ते १ व दुपारी ३ ते ५ ही वेळ निश्चित करून येणाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे समाधान करणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बैठका, संपर्क दौरे असल्यास तशी अभ्यागतांना पूर्वकल्पना द्यावी, दूरध्वनी, ई-मेल यांचा वापर करून संबंधितांना त्यांच्या कामासाठी वारंवार जिल्हा परिषदेत यावे लागणार नाही, याची काळजी घ्यावी; दुपारच्या जेवणाची वेळ दुपारी दीड ते दोन अशी ठरली आहे. तिचे पालन व्हावे. कर्मचाऱ्यांनी वेळेवर हजर राहणे. आवश्यकतेनुसार गणवेश, ओळखपत्र धारण करावे. कार्यालयीन शिस्तीचे आणि स्वच्छतेचे पालन करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.अधिकाऱ्यांनी फिरतीच्या ठिकाणी जातानाही कार्यालयाला स्पष्ट कल्पना द्यावी. तालुकास्तरावरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील तळमजल्यावरील माहिती कक्षातील नोंदवहीमध्ये कामाच्या स्वरूपाची नोंद करणे बंधनकारक आहे.

वाहनचालक व परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान करावा. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनीही कार्यालयीन कामासाठी बाहेर जाताना हालचाल नोंदवहीमध्ये नोंद करावी, अशा सूचना या परिपत्रकाद्वारे केल्या आहेत.

जुन्या वस्तूंचे निर्लेखन कराकार्यालयीन दुरुस्ती, संगणक, स्टेशनरी खरेदी, जुन्या वस्तूंचे वेळेत निर्लेखन करण्याकडे विभागप्रमुखांनी नियमित लक्ष द्यावे. गरजेच्या वस्तूंचा वार्षिक आराखडा बनवून नियमाप्रमाणे आपल्या विभागाकडे / जिल्हा परिषदेकडे विहित मुदतीत याबाबतची मागणी करावी. आवश्यक वस्तूंचा तुटवडा भासून त्याचा विकासकामांवर विपरित परिणाम होऊ नये, याची दक्षता विभागप्रमुखांनी घ्यावी, अशीही सूचना देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद