शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत सोमवारी, शुक्रवारी अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:59 IST

बाराही तालुक्यांतून येणाऱ्या अभ्यागतांच्या सोईसाठी सोमवार आणि शुक्रवारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत थांबणे अनिवार्य असल्याचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी काढले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनीही कोणती शिस्त पाळली पाहिजे, याबाबत या परिपत्रकात सविस्तर सूचना करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेत सोमवारी, शुक्रवारी अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्यअभ्यागतांच्या सोईसाठी कर्मचाऱ्यांनाही सीईओंच्या सूचना

कोल्हापूर : बाराही तालुक्यांतून येणाऱ्या अभ्यागतांच्या सोईसाठी सोमवार आणि शुक्रवारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत थांबणे अनिवार्य असल्याचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी काढले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनीही कोणती शिस्त पाळली पाहिजे, याबाबत या परिपत्रकात सविस्तर सूचना करण्यात आल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या अनुषंगाने अनेक वेळा चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर डॉ. खेमनार यांनी हे परिपत्रक काढले आहे. सोमवारी आणि शुक्रवारी सकाळी ११ ते १ व दुपारी ३ ते ५ ही वेळ निश्चित करून येणाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे समाधान करणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बैठका, संपर्क दौरे असल्यास तशी अभ्यागतांना पूर्वकल्पना द्यावी, दूरध्वनी, ई-मेल यांचा वापर करून संबंधितांना त्यांच्या कामासाठी वारंवार जिल्हा परिषदेत यावे लागणार नाही, याची काळजी घ्यावी; दुपारच्या जेवणाची वेळ दुपारी दीड ते दोन अशी ठरली आहे. तिचे पालन व्हावे. कर्मचाऱ्यांनी वेळेवर हजर राहणे. आवश्यकतेनुसार गणवेश, ओळखपत्र धारण करावे. कार्यालयीन शिस्तीचे आणि स्वच्छतेचे पालन करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.अधिकाऱ्यांनी फिरतीच्या ठिकाणी जातानाही कार्यालयाला स्पष्ट कल्पना द्यावी. तालुकास्तरावरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील तळमजल्यावरील माहिती कक्षातील नोंदवहीमध्ये कामाच्या स्वरूपाची नोंद करणे बंधनकारक आहे.

वाहनचालक व परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान करावा. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनीही कार्यालयीन कामासाठी बाहेर जाताना हालचाल नोंदवहीमध्ये नोंद करावी, अशा सूचना या परिपत्रकाद्वारे केल्या आहेत.

जुन्या वस्तूंचे निर्लेखन कराकार्यालयीन दुरुस्ती, संगणक, स्टेशनरी खरेदी, जुन्या वस्तूंचे वेळेत निर्लेखन करण्याकडे विभागप्रमुखांनी नियमित लक्ष द्यावे. गरजेच्या वस्तूंचा वार्षिक आराखडा बनवून नियमाप्रमाणे आपल्या विभागाकडे / जिल्हा परिषदेकडे विहित मुदतीत याबाबतची मागणी करावी. आवश्यक वस्तूंचा तुटवडा भासून त्याचा विकासकामांवर विपरित परिणाम होऊ नये, याची दक्षता विभागप्रमुखांनी घ्यावी, अशीही सूचना देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद