शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

कोल्हापूर : प्राथमिक शाळांचे निकाल जाहीर, सुट्यांचे नियोजन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 17:27 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचा निकालामध्ये समावेश होता. महापालिकेच्या शाळांचा निकाल मात्र शनिवारी (दि. १२) जाहीर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्राथमिक शाळांचे निकाल जाहीर, सुट्यांचे नियोजन सुरू महापालिका शाळांचा शनिवारी निकाल

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचा निकालामध्ये समावेश होता. महापालिकेच्या शाळांचा निकाल मात्र शनिवारी (दि. १२) जाहीर करण्यात येणार आहे.माध्यमिक शाळांचे निकाल अगोदर लागतात. या वर्षी १ मे रोजी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व खासगी शाळांचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांच्या निकालाची उत्सुकता होती. साधारणत: १५ एप्रिलनंतर परीक्षा संपल्या की मुले शाळेत येतच नाहीत; पण शिक्षकांची पेपर तपासणी व निकालाची धांदल सुरू असते.

आपल्याकडे निकाल हातात आल्याशिवाय खऱ्या अर्थाने सुटीची सुरुवात होत नाही. निकाल काय लागेल, याची धाकधुक मनात ठेवून कोणी सुटीचा आनंद साजरा करीत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या नजरा निकालाकडे लागलेल्या असतात. निकाल हातात घ्यायचा आणि मामा, आत्या, मावशीच्या गावाला सुटीसाठी जायचे, असे प्रत्येक विद्यार्थ्याचे नियोजन असते.माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनंतर, शनिवारी सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत जिल्हा परिषदेच्या शाळांनी निकालपत्रांचे वाटप केले. जिल्हा परिषदेच्या १९९४ शाळा असून त्यामध्ये सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थी आहेत.

परीक्षा संपल्यापासून गेले पंधरा-वीस दिवस निकालाच्या प्रतीक्षेने विद्यार्थ्यांचा जीव अक्षरश: टांगणीला लागलेला होता. सकाळी उठल्यानंतर पंधरा दिवस अडगळीत टाकलेला गणवेश घालून, आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन विद्यार्थी शाळेत गेले. निकालपत्र घेतल्यानंतर मित्रामित्रांमध्ये श्रेणी किती मिळाली याच्या गप्पा मारीतच विद्यार्थी घराकडे जाताना दिसत होते.महापालिका शाळांची उन्हाळी सुटी वाढविल्याने त्यांच्या निकालाला विलंब झाला आहे. या शाळा शनिवारी निकाल जाहीर करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा १५ जून रोजी सुरू होणार आहेत.

पालकांची तारांबळकाही विद्यार्थी परीक्षा संपल्यानंतर सुटीसाठी परगावी गेले. त्यांच्या पालकांनी निकालपत्र घेतले. सकाळी नेहमीची कामे थांबवून शाळेत जाऊन निकाल घेताना पालकांची तारांबळ उडाल्याची दिसली.

टॅग्स :Schoolशाळाkolhapurकोल्हापूरzp schoolजिल्हा परिषद शाळाMuncipal Corporationनगर पालिका