शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : प्राथमिक शाळांचे निकाल जाहीर, सुट्यांचे नियोजन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 17:27 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचा निकालामध्ये समावेश होता. महापालिकेच्या शाळांचा निकाल मात्र शनिवारी (दि. १२) जाहीर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्राथमिक शाळांचे निकाल जाहीर, सुट्यांचे नियोजन सुरू महापालिका शाळांचा शनिवारी निकाल

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचा निकालामध्ये समावेश होता. महापालिकेच्या शाळांचा निकाल मात्र शनिवारी (दि. १२) जाहीर करण्यात येणार आहे.माध्यमिक शाळांचे निकाल अगोदर लागतात. या वर्षी १ मे रोजी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व खासगी शाळांचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांच्या निकालाची उत्सुकता होती. साधारणत: १५ एप्रिलनंतर परीक्षा संपल्या की मुले शाळेत येतच नाहीत; पण शिक्षकांची पेपर तपासणी व निकालाची धांदल सुरू असते.

आपल्याकडे निकाल हातात आल्याशिवाय खऱ्या अर्थाने सुटीची सुरुवात होत नाही. निकाल काय लागेल, याची धाकधुक मनात ठेवून कोणी सुटीचा आनंद साजरा करीत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या नजरा निकालाकडे लागलेल्या असतात. निकाल हातात घ्यायचा आणि मामा, आत्या, मावशीच्या गावाला सुटीसाठी जायचे, असे प्रत्येक विद्यार्थ्याचे नियोजन असते.माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनंतर, शनिवारी सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत जिल्हा परिषदेच्या शाळांनी निकालपत्रांचे वाटप केले. जिल्हा परिषदेच्या १९९४ शाळा असून त्यामध्ये सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थी आहेत.

परीक्षा संपल्यापासून गेले पंधरा-वीस दिवस निकालाच्या प्रतीक्षेने विद्यार्थ्यांचा जीव अक्षरश: टांगणीला लागलेला होता. सकाळी उठल्यानंतर पंधरा दिवस अडगळीत टाकलेला गणवेश घालून, आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन विद्यार्थी शाळेत गेले. निकालपत्र घेतल्यानंतर मित्रामित्रांमध्ये श्रेणी किती मिळाली याच्या गप्पा मारीतच विद्यार्थी घराकडे जाताना दिसत होते.महापालिका शाळांची उन्हाळी सुटी वाढविल्याने त्यांच्या निकालाला विलंब झाला आहे. या शाळा शनिवारी निकाल जाहीर करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा १५ जून रोजी सुरू होणार आहेत.

पालकांची तारांबळकाही विद्यार्थी परीक्षा संपल्यानंतर सुटीसाठी परगावी गेले. त्यांच्या पालकांनी निकालपत्र घेतले. सकाळी नेहमीची कामे थांबवून शाळेत जाऊन निकाल घेताना पालकांची तारांबळ उडाल्याची दिसली.

टॅग्स :Schoolशाळाkolhapurकोल्हापूरzp schoolजिल्हा परिषद शाळाMuncipal Corporationनगर पालिका