शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर : इचलकरंजीचे राजकारण जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत, विजया पाटील यांच्या दाखल्यावरून आवाडे, इंगवलेंमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:14 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेत इचलकरंजीचे राजकारण अधूनमधून डोके वर काढत असते. त्यामुळेच राहुल आवाडे यांनी हाळवणकर समर्थक जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील यांच्या दाखल्याचा मुद्दा उपस्थित करीत प्रशासनाला जाब विचारला.

ठळक मुद्देइचलकरंजीचे राजकारण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत विजया पाटील यांच्या दाखल्यावरून वादआवाडे आणि अरुण इंगवले यांच्यामध्ये वाद जिल्हा परिषदेत राहुल आवाडे शिवसेनेच्या भूमिकेत

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर आणि ताराराणी विकास आघाडीचे प्रकाश आवाडे एकत्र असले तरी इचलकरंजीचे राजकारण मात्र अधूनमधून डोके वर काढत असते.

राहुल आवाडे यांनी हाळवणकर समर्थक जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील यांच्या दाखल्याचा मुद्दा उपस्थित करीत प्रशासनाला जाब विचारला. यावेळी भाजपचे गटनेते अरुण इंगवले यांनी आवाडे यांना रोखल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक रंगली.राहुल आवाडे हे सत्तेत असले तरी त्यांची कार्यपद्धती हे नेहमीच विरोधकाचीच राहिली आहे, याचे प्रत्यंतर शनिवारी (दि. ६) झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत आले.

विजया पाटील या आमदार सुरेश हाळवणकर यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्या दुसऱ्यांदा भाजपकडून कबनूर मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. यावेळी त्यांनी ‘इतर मागास’चा दाखला जोडून निवडणूक लढविली व त्या निवडूनही आल्या.

यानंतर कांता बडवे, मिलिंद कोले यांनी पाटील यांच्या दाखल्याबाबत तक्रार दिली होती. जातपडताळणी समितीने छाननीत पाटील यांचा दाखल अवैध ठरविला होता. यावर पाटील यांनी अपील केल्याने हा विषय सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.‘पाटील अपात्र असताना त्यांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत का बसू दिले?’ असा सवाल या ‘स्थायी’च्या सभेत राहुल आवाडे यांनी उपस्थित केला. पाटील यांनी सहभागी होऊन कबनूर येथील पेयजल योजनेबाबत ठरावही मांडला.आवाडे यांना हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हा अधिकार जिल्हा परिषदेचा नसून तसे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आल्यानंतर मग त्यावर कार्यवाही केली जात असल्याचे आवाडे यांना सांगण्यात आले; परंतु ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यावरूनच अरुण इंगवले आणि त्यांच्यामध्ये वाद झाला.सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भालेराव यांनी आवाडे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून जेव्हा याबाबत आदेश येईल त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे सांगून हा विषय संपविला.

आवाडे शिवसेनेच्या भूमिकेतसध्या राज्यात शिवसेना सत्तेत असली तरीदेखील ती विरोधकांप्रमाणे वागत आहे. हीच भूमिका जिल्हा परिषदेत राहुल आवाडे वठवत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तशी प्रतिक्रिया व्यक्त करून वैयक्तिक राजकारणासाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभागृहाचा वापर होऊ नये, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर