शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कोल्हापूर : गेल्या ११ महिन्यात कोल्हापूर जिल्हयातील विवाहितेच्या ४९ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 16:20 IST

गेल्या ११ महिन्यात कोल्हापूर जिल्हयातील विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळाच्या केवळ ४९ तक्रारी पोलिस दफ्तरी नोंद आहे. यापुर्वी दिवसाला पोलिस ठाण्यात एक -दोन अशा स्वरुपाच्या यायच्या. पण,कुटूंब कल्याण समितीने केलेल्या समुपदेशनामुळे तक्रारीचे प्रमाण कमी झाले असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना येथे सांगितले.

ठळक मुद्देविवाहितेच्या ११ महिन्यात ४९ तक्रारीकुटूंब कल्याण समितीचे यश : उमेशचंद्र मोरे यांची माहिती

कोल्हापूर : गेल्या ११ महिन्यात कोल्हापूर जिल्हयातील विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळाच्या केवळ ४९ तक्रारी पोलिस दफ्तरी नोंद आहे. यापुर्वी दिवसाला पोलिस ठाण्यात एक -दोन अशा स्वरुपाच्या यायच्या. पण,कुटूंब कल्याण समितीने केलेल्या समुपदेशनामुळे तक्रारीचे प्रमाण कमी झाले असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना येथे सांगितले.शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याबाबत उमेशचंद्र मोरे म्हणाले, स्त्रीच्या शारिरीक व मानसिक छळाचे (भा.द.वि.स.कलम ४९८)तक्रारी मोठ्या प्रमाणात पोलिस ठाण्यात यायच्या. या तक्रारीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश काढले.

याचे अधिकार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले. त्यानूसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अखत्यारित कोल्हापूर जिल्हयाकरिता कुटूंब कल्याण समिती एक आॅगस्ट २०१७ ला स्थापन झाली.

या समितीमध्ये पी.जी.मांढरे, पल्लवी कोरगांवकर व प्रा.हरि वनमोरे यांचा समावेश आहे. ही समिती संबधितांचे समुपदेशन करते, ते शक्य न झाल्यास प्रत्यक्ष परिस्थिती आणि पुरावा, जबाब घेते आणि त्याचा अहवाल एक महिन्यात आत पोलिस ठाण्यात किंवा न्यायालयात देते.

या अहवालानंतरच पोलिसात विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळाच्या तक्रार दाखल होते. आॅगस्ट ते डिसेंबर २०१७ अखेर पर्यंत पाच आणि एक जानेवारी २०१८ ते १४ जुलैअखेर ४४ अशा एकूण ४९ तक्रारी या स्वरुपाच्या दाखल झाल्या आहेत. 

 

टॅग्स :Womenमहिलाkolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा