शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

कोल्हापूर :  शाळा बंद ठेवून मोर्चात सहभागी व्हा, चार हजार शाळांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 19:03 IST

शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीच्यावतीने शुक्रवारी (दि. २३) गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा काढण्यात येणाऱ्या मोर्चात शाळा बंद ठेवून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करणारी सुमारे चार हजार पत्रे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्ह्यातील विविध शाळांना पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती समितीचे समन्वयक गिरीष फोंडे यांनी दिली.

ठळक मुद्देशाळा बंद ठेवून मोर्चात सहभागी व्हा, चार हजार शाळांना पत्रशिक्षक बनणार स्वयंसेवक

कोल्हापूर : शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीच्यावतीने शुक्रवारी (दि. २३) गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा काढण्यात येणाऱ्या मोर्चात शाळा बंद ठेवून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करणारी सुमारे चार हजार पत्रे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्ह्यातील विविध शाळांना पाठविण्यात आली आहेत,अशी माहिती समितीचे समन्वयक गिरीष फोंडे यांनी दिली.राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नयेत, कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास परवानगी देऊ नये, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. गांधी मैदान येथून सकाळी दहा वाजता निघणाऱ्या मोर्चात शहरासह जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सहभागी होणार आहेत.

खरी कॉर्नर, मिरजकर तिकटी, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय, असा मोर्चाचा मार्ग असणार आहे. गांधी मैदान येथे सकाळी विविध संघटनांचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील हे मार्गदर्शन करतील. शुक्रवारी (दि.२३) भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा शहीद दिन आहे. त्यामुळे त्यांची वेशभूषा परिधान करून अनेक विद्यार्थी या मोर्चात सहभागी होणार आहेत.

शहरातील पाच संघटना होणार स्वयंसेवकमोर्चात पन्नास हजारांहून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक, नागरिक सहभागी होणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरणार आहेत. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील पाच शिक्षक संघटना स्वयंसेवकांची भूमिका बजाविणार आहेत. त्यामध्ये खासगी शिक्षक महासंघ, खासगी शिक्षक समिती, मनपा शिक्षक समिती, मनपा शिक्षक संघ, मनपा शिक्षक पुरोगामी संघटनेचा समावेश असेल, अशी माहिती संतोष आयरे यांनी दिली.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाहीशाळा बंद ठेवून शिक्षक मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे जादा वेळ देऊन शुक्रवारी होणारे शैक्षणिक नुकसान शिक्षकांच्यावतीने भरून काढण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे या मोर्चामुळे नुकसान होणार नाही, असे शैक्षणिक व्यासपीठातर्फे सांगण्यात आले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरeducationशैक्षणिक