शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

कोल्हापूर :  शाळा बंद ठेवून मोर्चात सहभागी व्हा, चार हजार शाळांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 19:03 IST

शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीच्यावतीने शुक्रवारी (दि. २३) गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा काढण्यात येणाऱ्या मोर्चात शाळा बंद ठेवून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करणारी सुमारे चार हजार पत्रे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्ह्यातील विविध शाळांना पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती समितीचे समन्वयक गिरीष फोंडे यांनी दिली.

ठळक मुद्देशाळा बंद ठेवून मोर्चात सहभागी व्हा, चार हजार शाळांना पत्रशिक्षक बनणार स्वयंसेवक

कोल्हापूर : शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीच्यावतीने शुक्रवारी (दि. २३) गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा काढण्यात येणाऱ्या मोर्चात शाळा बंद ठेवून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करणारी सुमारे चार हजार पत्रे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्ह्यातील विविध शाळांना पाठविण्यात आली आहेत,अशी माहिती समितीचे समन्वयक गिरीष फोंडे यांनी दिली.राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नयेत, कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास परवानगी देऊ नये, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. गांधी मैदान येथून सकाळी दहा वाजता निघणाऱ्या मोर्चात शहरासह जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सहभागी होणार आहेत.

खरी कॉर्नर, मिरजकर तिकटी, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय, असा मोर्चाचा मार्ग असणार आहे. गांधी मैदान येथे सकाळी विविध संघटनांचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील हे मार्गदर्शन करतील. शुक्रवारी (दि.२३) भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा शहीद दिन आहे. त्यामुळे त्यांची वेशभूषा परिधान करून अनेक विद्यार्थी या मोर्चात सहभागी होणार आहेत.

शहरातील पाच संघटना होणार स्वयंसेवकमोर्चात पन्नास हजारांहून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक, नागरिक सहभागी होणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरणार आहेत. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील पाच शिक्षक संघटना स्वयंसेवकांची भूमिका बजाविणार आहेत. त्यामध्ये खासगी शिक्षक महासंघ, खासगी शिक्षक समिती, मनपा शिक्षक समिती, मनपा शिक्षक संघ, मनपा शिक्षक पुरोगामी संघटनेचा समावेश असेल, अशी माहिती संतोष आयरे यांनी दिली.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाहीशाळा बंद ठेवून शिक्षक मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे जादा वेळ देऊन शुक्रवारी होणारे शैक्षणिक नुकसान शिक्षकांच्यावतीने भरून काढण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे या मोर्चामुळे नुकसान होणार नाही, असे शैक्षणिक व्यासपीठातर्फे सांगण्यात आले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरeducationशैक्षणिक