शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

कोल्हापूर : त्र्यंबोली यात्रेसाठी यंदा आॅगस्ट महिन्यातील दोनच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 18:35 IST

त्र्यंबोलीदेवीच्या आषाढ महिन्यातील यात्रेसाठी यंदा ३ आणि १० आॅगस्ट हे दोनच दिवस मिळणार आहेत. आषाढी एकादशीनंतर ही यात्रा सुरू होते. मात्र त्यानंतरच्या शुक्रवारी आणि मंगळवारी पौर्णिमा, अंगारकी संकष्टी चतुर्थी, पंधरवड्यातील एकादशी आल्याने शेवटच्या दोन शुक्रवारी यात्रेचा धडाका उडणार आहे.

ठळक मुद्देत्र्यंबोली यात्रेसाठी यंदा आॅगस्ट महिन्यातील दोनच दिवसएकादशी, संकष्टी, पौर्णिमेमुळे अडचण

कोल्हापूर : त्र्यंबोलीदेवीच्या आषाढ महिन्यातील यात्रेसाठी यंदा ३ आणि १० आॅगस्ट हे दोनच दिवस मिळणार आहेत. आषाढी एकादशीनंतर ही यात्रा सुरू होते. मात्र त्यानंतरच्या शुक्रवारी आणि मंगळवारी पौर्णिमा, अंगारकी संकष्टी चतुर्थी, पंधरवड्यातील एकादशी आल्याने शेवटच्या दोन शुक्रवारी यात्रेचा धडाका उडणार आहे.दरवर्षी आषाढ महिन्यात त्र्यंबोली देवीची यात्रा होते. या महिन्यातील मंगळवारी आणि शुक्रवारी पंचगंगा नदीला आलेले नवे पाणी मिरवणुकीने नेत ते त्र्यंबोली देवीला अर्पण केले जाते. त्यानिमित्त गल्ली, पेठांमध्ये तरुण मंडळांच्या वतीने वर्गणी काढली जाते. यंदा शनिवार (दि. १४)पासून आषाढ महिना सुरू होत आहे.

पुढील आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार मिळत असला तरी आषाढी एकादशीनंतर आणि गुरुपौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने त्र्यंबोली यात्रेला सुरुवात होते. यंदा आषाढी एकादशी २३ तारखेला आहे. दुसऱ्याच दिवशी मंगळवार असून, त्या दिवशी काही प्रमाणात यात्रा होऊ शकते. त्यानंतरच्या शुक्रवारी गुरुपौर्णिमा आणि मंगळवारी (दि. ३१) अंगारकी संकष्ट चतुर्थी आली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात त्र्यंबोली यात्रेची शक्यता नगण्य आहे.

आॅगस्ट महिन्यातील ३ तारखेचा शुक्रवार यात्रेसाठी मिळणार आहे. त्यानंतरच्या मंगळवारी (दि. ७) एकादशी आहे. त्यामुळे १० आॅगस्ट हा यात्रेचा अखेरचा दिवस असणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता अमावास्या लागणार आहे. त्यामुळे यंदा कोल्हापूरकरांना त्र्यंबोली देवीच्या यात्रेसाठी दोनच दिवस मिळणार आहेत.

वर्गणीच्या पाट्यायात्रेला उशीर असला तरी गल्लोगल्ली, पेठापेठांमध्ये वर्गणीच्या पाट्या लागल्या आहेत. यंदा २०० ते २५० रुपये वर्गणी ठरली असून, सदर रक्कम मंडळाकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपkolhapurकोल्हापूर