शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

कोल्हापुरात रोहित्रे जळण्याचे प्रमाणे केवळ चार टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 13:27 IST

mahavitaran Kolhapur- महावितरणच्या रोहित्रांच्या बाबतीत विदर्भ, मराठवाड्याच्या नेमकी उलटी परिस्थिती कोल्हापुरात आहे. तिकडे महिनों-महिने दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना, कोल्हापुरात मात्र रोहित्र जळाले की जास्तीत जास्त दोन ते चार दिवसांत ती पूर्ववत होतात शिवाय रोहित्रे जळण्याचे प्रमाणही फारच अत्यल्प म्हणजे केवळ चार टक्के इतकेच आहे. शेतकऱ्यांसह महावितरणही कायम अलर्टवर असल्याचा हा परिणाम आहे.

ठळक मुद्दे दुरुस्तीही दोन चार दिवसांतच पूर्ण शेतकऱ्यांसह महावितरणही कायम अलर्टवर असल्याचा परिणाम

 कोल्हापूर: महावितरणच्या रोहित्रांच्या बाबतीत विदर्भ, मराठवाड्याच्या नेमकी उलटी परिस्थिती कोल्हापुरात आहे. तिकडे महिनों-महिने दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना, कोल्हापुरात मात्र रोहित्र जळाले की जास्तीत जास्त दोन ते चार दिवसांत ती पूर्ववत होतात शिवाय रोहित्रे जळण्याचे प्रमाणही फारच अत्यल्प म्हणजे केवळ चार टक्के इतकेच आहे. शेतकऱ्यांसह महावितरणही कायम अलर्टवर असल्याचा हा परिणाम आहे.महावितरणकडून रोहित्रांच्या माध्यमातून कृषी पंपांसाठी वीजपुरवठा केला जातो. एकेका रोहित्रांवर शंभरांभर वीज कनेक्शन दिली जातात. अतिरिक्त दाब येऊन रोहित्रे जळतात, असा शोध लावत राज्यातील मागील फडणवीस सरकारने स्वतंत्र रोहित्रांचा वापर करणे बंधनकारक केले. त्यामुळे महावितरणकडे यंत्रणा कमी पडल्याने वीज जोडण्या प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून आताच्या ठाकरे सरकारने स्वतंत्र रोहित्राची अट काढून टाकून पूर्वीप्रमाणेच एकाच रोहित्रांवर अनेक जोडण्या देण्याचे धोरण हाती घेतले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता हा हरितपट्टा म्हणून ओळखला जात असल्याने येथे शेतकऱ्यांसह महावितरणची यंत्रणाही कायम तत्पर असते. अतिरिक्त दाब येऊ नये यासाठी भारनियमनाचे नियोजन केलेले असते, तरीदेखील काहीवेळा रोहित्रात बिघाड होण्याच्या घटना घडतात.

बिघाड झाला तर शेतकऱ्यांकडून लगेच महावितरणकडे दुरुस्तीसाठी तगादा लावला जातो. महावितरणची यंत्रणाही लगेच कामाला लागते. किमान दोन दिवस आणि जास्तीत जास्त चार दिवस एवढ्या कालावधीत वीजप्रवाह पुन्हा सुरळीत केला जातो. त्यामुळे केवळ रोहित्र जळाले म्हणून पिके वाळल्याची उदाहरणे जिल्ह्यात आढळत नाहीत.नादुरुस्त १०६०पैकी १०४४ तातडीने दुरुस्तजिल्ह्यात महावितरणकडे २६ हजार ५१७ रोहित्रे सध्या कार्यान्वित आहेत. त्यापैकी १ एप्रिल ते आजअखेरपर्यंत १ हजार ६० रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या. त्यातील १०४४ रोहित्रांची तातडीने दुरुस्तीही करण्यात आली. आता केवळ १६ रोहित्रे दुरुस्तीचे काम शिल्लक आहे. ते देखील आठवडाभरात पूर्ण करण्याचे नियोजन सुरू आहे.जिल्ह्यात कृषी ग्राहकसंख्या : १ लाख ४७ हजार ४९३एकूण ग्राहकांपैकी टक्केवारी : १३.९ टक्के

शेतकऱ्यांना एक रुपयाचाही खर्च लागू नये, पिके पाण्याअभावी जळू नयेत यासाठी रोहित्रे जळाल्यापासून ते दुरुस्तीपर्यंत यंत्रणा युद्धपातळीवर लावली जाते. दुरुस्तीमध्ये ऑईलची उपलब्धता हा मोठा घटक असतो, पण ते कमी पडू नये याची आधीच दक्षता घेतली जाते.- किशोर खोबरे, जनसंपर्क अधिकारी, कोल्हापूर परिमंडळ, महावितरण.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर