शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

कोल्हापुरात रोहित्रे जळण्याचे प्रमाणे केवळ चार टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 13:27 IST

mahavitaran Kolhapur- महावितरणच्या रोहित्रांच्या बाबतीत विदर्भ, मराठवाड्याच्या नेमकी उलटी परिस्थिती कोल्हापुरात आहे. तिकडे महिनों-महिने दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना, कोल्हापुरात मात्र रोहित्र जळाले की जास्तीत जास्त दोन ते चार दिवसांत ती पूर्ववत होतात शिवाय रोहित्रे जळण्याचे प्रमाणही फारच अत्यल्प म्हणजे केवळ चार टक्के इतकेच आहे. शेतकऱ्यांसह महावितरणही कायम अलर्टवर असल्याचा हा परिणाम आहे.

ठळक मुद्दे दुरुस्तीही दोन चार दिवसांतच पूर्ण शेतकऱ्यांसह महावितरणही कायम अलर्टवर असल्याचा परिणाम

 कोल्हापूर: महावितरणच्या रोहित्रांच्या बाबतीत विदर्भ, मराठवाड्याच्या नेमकी उलटी परिस्थिती कोल्हापुरात आहे. तिकडे महिनों-महिने दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना, कोल्हापुरात मात्र रोहित्र जळाले की जास्तीत जास्त दोन ते चार दिवसांत ती पूर्ववत होतात शिवाय रोहित्रे जळण्याचे प्रमाणही फारच अत्यल्प म्हणजे केवळ चार टक्के इतकेच आहे. शेतकऱ्यांसह महावितरणही कायम अलर्टवर असल्याचा हा परिणाम आहे.महावितरणकडून रोहित्रांच्या माध्यमातून कृषी पंपांसाठी वीजपुरवठा केला जातो. एकेका रोहित्रांवर शंभरांभर वीज कनेक्शन दिली जातात. अतिरिक्त दाब येऊन रोहित्रे जळतात, असा शोध लावत राज्यातील मागील फडणवीस सरकारने स्वतंत्र रोहित्रांचा वापर करणे बंधनकारक केले. त्यामुळे महावितरणकडे यंत्रणा कमी पडल्याने वीज जोडण्या प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून आताच्या ठाकरे सरकारने स्वतंत्र रोहित्राची अट काढून टाकून पूर्वीप्रमाणेच एकाच रोहित्रांवर अनेक जोडण्या देण्याचे धोरण हाती घेतले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता हा हरितपट्टा म्हणून ओळखला जात असल्याने येथे शेतकऱ्यांसह महावितरणची यंत्रणाही कायम तत्पर असते. अतिरिक्त दाब येऊ नये यासाठी भारनियमनाचे नियोजन केलेले असते, तरीदेखील काहीवेळा रोहित्रात बिघाड होण्याच्या घटना घडतात.

बिघाड झाला तर शेतकऱ्यांकडून लगेच महावितरणकडे दुरुस्तीसाठी तगादा लावला जातो. महावितरणची यंत्रणाही लगेच कामाला लागते. किमान दोन दिवस आणि जास्तीत जास्त चार दिवस एवढ्या कालावधीत वीजप्रवाह पुन्हा सुरळीत केला जातो. त्यामुळे केवळ रोहित्र जळाले म्हणून पिके वाळल्याची उदाहरणे जिल्ह्यात आढळत नाहीत.नादुरुस्त १०६०पैकी १०४४ तातडीने दुरुस्तजिल्ह्यात महावितरणकडे २६ हजार ५१७ रोहित्रे सध्या कार्यान्वित आहेत. त्यापैकी १ एप्रिल ते आजअखेरपर्यंत १ हजार ६० रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या. त्यातील १०४४ रोहित्रांची तातडीने दुरुस्तीही करण्यात आली. आता केवळ १६ रोहित्रे दुरुस्तीचे काम शिल्लक आहे. ते देखील आठवडाभरात पूर्ण करण्याचे नियोजन सुरू आहे.जिल्ह्यात कृषी ग्राहकसंख्या : १ लाख ४७ हजार ४९३एकूण ग्राहकांपैकी टक्केवारी : १३.९ टक्के

शेतकऱ्यांना एक रुपयाचाही खर्च लागू नये, पिके पाण्याअभावी जळू नयेत यासाठी रोहित्रे जळाल्यापासून ते दुरुस्तीपर्यंत यंत्रणा युद्धपातळीवर लावली जाते. दुरुस्तीमध्ये ऑईलची उपलब्धता हा मोठा घटक असतो, पण ते कमी पडू नये याची आधीच दक्षता घेतली जाते.- किशोर खोबरे, जनसंपर्क अधिकारी, कोल्हापूर परिमंडळ, महावितरण.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर