शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोल्हापूर : आठवड्याभरात मिळणार दाखले, मराठा दाखल्यांची आॅनलाईन नोंदणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 11:56 IST

सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता त्याच्या दाखल्यांच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ‘आपले सरकार’ केंद्रांमधून आॅनलाईनद्वारे दाखल्यांच्या नोंदणीला गुरुवारपासून सुरुवात झाली. सेवा हमी कायद्यानुसार ४५ दिवसांत दाखला देणे बंधनकारक आहे; परंतु हे काम युद्धपातळीवर करून किमान आठवड्याभरात हा दाखला देण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.

ठळक मुद्देआठवड्याभरात मिळणार दाखलेमराठा दाखल्यांची आॅनलाईन नोंदणी सुरू

कोल्हापूर : सरकारकडूनमराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता त्याच्या दाखल्यांच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ‘आपले सरकार’ केंद्रांमधून आॅनलाईनद्वारे दाखल्यांच्या नोंदणीला गुरुवारपासून सुरुवात झाली. सेवा हमी कायद्यानुसार ४५ दिवसांत दाखला देणे बंधनकारक आहे; परंतु हे काम युद्धपातळीवर करून किमान आठवड्याभरात हा दाखला देण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.मराठा समाजाला जाहीर झालेले आरक्षण हे नोकरी व शिक्षणासाठी आहे. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांमधून आॅनलाईनद्वारे या दाखल्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा असल्याने जिल्ह्यातील या केंद्रांवर मराठी तरुणांची दाखल्यांसाठी लगबग सुरू होती.

दाखल्यासाठी आॅनलाईन अर्जासोबत १९६७ पूर्वीचा मराठा असल्याचा पुरावा म्हणजे आजोबा, वडील व स्वत:चा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला, तत्कालीन रहिवासी पुरावा, स्वत:च्या ओळखीचा पुरावा असलेले पॅन कार्ड, रेशन कार्ड, आदी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे. त्यानंतर हा दाखल डेस्क- १ कारकून, डेस्क- २ नायब तहसीलदार / तहसीलदार व डेस्क- ३ प्रांताधिकारी या स्तरांवर सह्या होणे अशी दाखला मिळण्याची प्रक्रिया आहे.

प्रांताधिकाऱ्यांच्या अंतिम सहीनंतर हा दाखला दिला जातो. मराठा दाखल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. वास्तविक कोणताही दाखला हा ४५ दिवसांच्या आत द्यावा, असे सेवा हमी कायदा सांगतो. तरीही मुलांच्या शिक्षणासह नोकरीसाठी हे दाखले अत्यावश्यक असल्याने ते लवकरात लवकर मिळावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नोंदणीनंतर संबंधित अर्जदाराला हे दाखले आठवड्याभरात मिळणार आहेत. 

 

टॅग्स :marathaमराठाkolhapurकोल्हापूरGovernmentसरकार