शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : देशातील करदात्यांची संख्या १० कोटींपर्यंत जाईल : आशू जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:46 IST

नागरिकांना आपली संपत्ती, मिळकत जाहीर करण्याचे आवाहन शासनाने केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या आयकरदात्यांची संख्या तीन कोटींवरून सहा कोटींवर पोहोचली आहे. नागरिकांनी योग्य कर भरल्यास ही संख्या दहा कोटींपर्यंत जाईल. गेल्या आर्थिक वर्षात देशात १० लाख कोटी रुपयांचा कर जमा झाला. कारवाई टाळण्यासाठी करदात्यांनी प्रामाणिकपणे आणि वेळेत कर भरावा, असे आवाहन पुणे येथील प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशू जैन यांनी सोमवारी येथे केले.

ठळक मुद्देदेशातील करदात्यांची संख्या १० कोटींपर्यंत जाईल : आशू जैनआयकर विभाग कोल्हापूर शाखेतर्फे करदाते, सल्लागार यांच्याशी संवाद

कोल्हापूर : नागरिकांना आपली संपत्ती, मिळकत जाहीर करण्याचे आवाहन शासनाने केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या आयकरदात्यांची संख्या तीन कोटींवरून सहा कोटींवर पोहोचली आहे. नागरिकांनी योग्य कर भरल्यास ही संख्या दहा कोटींपर्यंत जाईल. गेल्या आर्थिक वर्षात देशात १० लाख कोटी रुपयांचा कर जमा झाला. कारवाई टाळण्यासाठी करदात्यांनी प्रामाणिकपणे आणि वेळेत कर भरावा, असे आवाहन पुणे येथील प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशू जैन यांनी सोमवारी येथे केले.

येथील आयकर विभाग आणि वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल आॅफ द इन्स्टिट्यूट चार्टर्ड अकौंटंट आॅफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेतर्फे आयोजित करदाते, सल्लागार यांच्याशी संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. न्यू शाहुुपुरीतील ‘द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट’च्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

यावेळी प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशू जैन म्हणाले, यावर्षी ११ लाख ५० हजार कोटी रुपयांपर्यंत कर जमा करण्याचे ध्येय आहे. नोटाबंदीच्या कालावधीत ज्यांनी अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम भरली आहे. त्यांच्याबाबतची सर्व माहिती एकत्रित झाली आहे. त्यातील एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरणाऱ्यांना आयकर विभागाकडून नोटीस गेली आहे.

या नोटिसीला ज्यांनी उत्तर दिलेले नाही. त्यांना दुसरी आॅनलाईन नोटीस पाठविली आहे. अतिरिक्त रकमेचे विवरण ज्यांना देता येणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी यांचे कर भरण्याचे प्रमाण चांगले आहे.कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यापारी, उद्योजकांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशू जैन यांचे पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे, माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर, ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव, द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट आॅफ इंडियाचे कोल्हापूर अध्यक्ष डॉ. नवीन महाजन, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, ‘मॅक’चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ‘गोशिमा’चे लक्ष्मीदास पटेल, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, आदींसह चार्टर्ड अकौंटंट, करसल्लागार, उपस्थित होते. आयकर विभागाचे प्रधान आयुक्त एम. एल. कर्माकर यांनी प्रास्ताविक केले. कोल्हापूर विभागाचे आयुक्त (अपील्स-२) एस. बी. मोरे यांनी आभार मानले.

एका ‘क्लिक’वर करदात्याची माहितीआयकर विभागाच्या कामकाजामध्ये संगणकीकरण वाढत आहे. त्यामुळे एकीकडे विवरणपत्र भरणे, रिफंड मिळविणे करदात्यांसाठी सोपे झाले आहे. दुसरीकडे प्रत्येक करदात्याची संपूर्ण माहिती, त्यांचा उद्योग, व्यवसायाचे स्वरूप, त्यांची गुंतवणूक, बँकेतील व्यवहार, आदी स्वरूपातील सर्व माहिती एका क्लिकवर आयकर विभागाकडे उपलब्ध आहे. या माहितीचे विश्लेषण करणारी यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यातून वेळेवर कर भरणारे आणि कर भरत नसलेल्यांची यादी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे करदात्यांनी प्रामाणिकपणे आणि वेळेत कर भरून कारवाई टाळावी, असे आवाहन प्रधान मुख्य आयकर आयुक्त जैन यांनी केले.

जैन म्हणाले

  1. कर हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
  2. नागरिकांनी जास्तीत जास्त कर भरावा, यासाठी शासनाने विविध योजना बनविल्या आहेत.
  3. कररूपी महसुलातून आरोग्य, संरक्षण, शिक्षण, रोजगार, विज्ञान-तंत्रज्ञान, दळणवळण, आदी क्षेत्रांच्या विकासासाठी केला जातो.
  4. नागरिकांनी कर भरून देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे.
  5.  देशात २२ आयकर सेवा केंद्रे कार्यन्वित

 

 

टॅग्स :Taxकरkolhapurकोल्हापूर