शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी महापालिकेस नोटीस, करवीर प्रांताधिकाऱ्यांचे आदेश : गुरुवारी सुनावणीवेळी म्हणणे मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:55 AM

कोल्हापूर शहरातील जयंती नाल्याद्वारे सांडपाणी व रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी महापालिकेस फौजदारी दाखल का करू नये, म्हणून बुधवारी नोटीस बजावली. याबाबत  गुरुवारी सुनावणीवेळी प्रत्यक्ष अथवा अधिकृत प्रतिनिधींमार्फत पुराव्यांनिशी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देपंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत प्रजासत्ताक सामाजिक संस्थेची याचिका सुनावणीवेळी प्रत्यक्ष अथवा अधिकृत प्रतिनिधींमार्फत पुराव्यांनिशी म्हणणे मांडण्याचे आदेश बुधवारी घेणार पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने

कोल्हापूर : शहरातील जयंती नाल्याद्वारे सांडपाणी व रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी महापालिकेस फौजदारी दाखल का करू नये, म्हणून बुधवारी नोटीस बजावली. याबाबत  गुरुवारी सुनावणीवेळी प्रत्यक्ष अथवा अधिकृत प्रतिनिधींमार्फत पुराव्यांनिशी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती; पण त्यावर उच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्याबाबत महापालिकेने कोणतीच कारवाई केली नसल्याने सन २०१० मध्ये देसाई यांनी पुनर्याचिका दाखल केली.

याचदरम्यान इचलकरंजीतूनही कोल्हापूर महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने या दोन्हीही जनहित याचिकेच्या सुनावणी एकत्रित चालविण्यासाठी जिल्हाधिकारी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कमिटी नियुक्त केली; पण या कमिटीच्या दर महिन्याला बैठका होत होत्या, पण कारवाई होत नसल्याचे पुरावे उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आले.

त्यानुसार उच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी करवीरचे उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांना पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्याचे कायदेशीर नमुने घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी इचलकरंजी येथे पंचगंगा नदीतील रसायनयुक्त व सांडपाणीयुक्त प्रदूषित पाण्याचे नमुने घेतले. ते प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

त्यानुसार पंचगंगा प्रदूषण रोखण्यास महापालिकेला अपयश आल्याने त्यांना जबाबदार धरून नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या जीवितास धोका असल्याने चौकशी करून कारवाई करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.त्यानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते प्रदूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे फौजदारी दाखल का करू नये, अशी नोटीस करवीर उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) सचिन इथापे यांनी महापालिका आयुक्त, जलअभियंता, मुख्याधिकारी, पर्यावरण अधिकाऱ्यांना बजावली आहे. महापालिकेने  गुरुवारी दुपारी १ वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली कागदपत्रांच्या पुराव्यांसह बाजू मांडावी, असे नोटिसीत म्हटले आहे.कोल्हापुरात बुधवारी घेणार नमुनेजयंती नाल्यातून मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याने बुधवारी पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने करवीर उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे घेणार असल्याची माहिती ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका