शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात नाही, शिक्षकांच्या बहिष्काराचा परिणाम; बारावी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 19:44 IST

विविध प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे. त्याचा परिणाम म्हणजे बारावीचे पाचहून अधिक पेपर झाले, तरी अद्यापही उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज सुरू झालेले नाही.

ठळक मुद्देबारावी परीक्षा : उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात नाही बारावी परीक्षा : शिक्षकांच्या बहिष्काराचा परिणाम शासनाने लवकर निर्णय घ्यावा, बेमुदत धरणे आंदोलन मंगळवारपासून

कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे. त्याचा परिणाम म्हणजे बारावीचे पाचहून अधिक पेपर झाले, तरी अद्यापही उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज सुरू झालेले नाही.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय शासनाने घेतला आहे; पण, गेल्या तीन वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे.

याअंतर्गतच बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात जाहीर केला. याबाबतची नोटीस देखील कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाला दिली आहे.

यानंतर राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीने कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या प्रवेशद्वारात प्रतिकात्मक उत्तरपत्रिकांची होळी करुन मूल्यमापनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बहिष्काराचा निर्णय जाहीर करुन पाच दिवस उलटले, तरी अद्यापही याबाबत शासनाकडून काहीच कार्यवाही झालेली नाही.

या आंदोलनामुळे बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामकाजाची सुरुवात झालेली नाही. दरम्यान, याबाबत शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पुष्पलता पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बारावीचे पाचहून अधिक पेपर आतापर्यंत झाले आहेत. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापनची प्रक्रिया सुरू झालेली नाही. याबाबत शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सुचनांनुसार कार्यवाही केली जाईल.

शासनाने लवकर निर्णय घ्यावाउत्तरपत्रिका मूल्यमापनावरील बहिष्कार आंदोलनाला पाच दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापही शासनाकडून काहीच कार्यवाही झालेली नाही. या आंदोलनामुळे कोल्हापूर विभागातील बारावीच्या सुमारे साडेतीन लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून असल्याचे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, शासनाने आमच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास मुदतीत उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण केली जाईल.

बेमुदत धरणे आंदोलन मंगळवारपासूनकृती समितीच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे बारावी आणि दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर आम्ही बहिष्कार टाकला असल्याचे राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बी. एस. बरगे यांनी सांगितले. ते म्हणाले, समितीतर्फे मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे. त्यासह मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबईतील आझाद मैदानावरील धरणे आंदोलन सुरुच राहणार आहे.

 

 

कृती समितीच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे समितीने गुरुवारी प्रतीकात्मक उत्तरपत्रिकांची होळी करून आंदोलनाची सुरुवात केली आहे. बारावी आणि दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. आमच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयांसमोर आणि मुंबईतील आझाद मैदानात दि. २७ फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल.- बी. एस. बरगे, जिल्हाध्यक्ष,राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समिती

टॅग्स :examपरीक्षाTeacherशिक्षकkolhapurकोल्हापूर