शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

Kolhapur North By Election Result: कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडीनं उधळला विजयाचा गुलाल; जयश्री जाधव ठरल्या पहिल्या महिला आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 17:41 IST

पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर कोल्हापूर पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होते. मात्र या निवडणुकीत मविआनं बाजी मारली आहे.

कोल्हापूर – गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या रणांगणात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव(Jayshree Jadhav) यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. भाजपाने या निवडणुकीत सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली होती. मागील महिनाभरापासून कोल्हापूरात भाजपाविरुद्धमहाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू होत्या. त्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.

कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २६ व्या फेरी अखेर ९६ हजार २२६ मतं तर भाजपाचे सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली. जवळपास १८ हजारांहून अधिक मताधिक्यांनी काँग्रेसचा विजय झाला आहे. जयश्री जाधव यांच्या विजयानंतर कोल्हापूरात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे. याठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजयाचा जल्लोष सुरू केला. कोल्हापूर उत्तरची जागा राखण्यात काँग्रेसला यश आले आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर कोल्हापूर पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होते.

विजयी उमेदवार जयश्री जाधव काय म्हणाल्या?

चंद्रकांत जाधव यांनी विकासाचं जे स्वप्न पाहिलं होते. परंतु दुर्दैवाने नियतीने त्यांचं स्वप्न अर्धवट राहिले. पत्नी म्हणून त्यांचे स्वप्न पूर्ण करणे माझं कर्तव्य होते. आज कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला आहे. भाजपानं मोठे मन दाखवून पोटनिवडणूक टाळायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. कोल्हापूर पुरोगामी विचारांचा बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिले. महालक्ष्मीची कृपा असल्याने महिला आमदार कोल्हापूरातून निवडून आली आहे. कोल्हापूरच्या जनतेला हा विजय समर्पित आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी व्यक्त केला.

संजय राऊत काय म्हणाले?

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भोंगे, हनुमान चालीसा असं राजकारण सुरू केले. मात्र कोल्हापूरच्या जनतेने विरोधकांचे भोंगे खाली उतरवला आहे. समाजात तणाव निर्माण करण्याचं काम कोल्हापूरच्या जनतेने नाकारलं आहे. कोल्हापूरच्या उत्तर जनतेने महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करून दाखवलं आहे. भोंग्याचे राजकारण आजच संपलं आहे असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा