शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

कोल्हापूर : प्राधिकरण नकोच, यावर ४२ गावे ठाम,पालकमंत्र्यांसोबत आठ दिवसांत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 11:24 IST

प्राधिकरणाला विरोध करणारे गावसभांचे ठराव पालकमंत्री चंद्रकांत पाटील व तिन्ही आमदारांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

ठळक मुद्देप्राधिकरण नकोच, यावर ४२ गावे ठाम, पालकमंत्र्यांसोबत आठ दिवसांत बैठकप्राधिकरण विरोधी कृती समिती गावोगावी जाऊन जनजागृती करणार

कोल्हापूर : गेल्या वर्षभरात प्राधिकरण म्हणजे काय आणि ते झाल्यानंतर काय अडचणी येणार हेच ग्रामस्थांना माहीत नाही. यासाठी ४२ गावांचा दौरा करून जनजागृती करू, पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची भेट घेऊन विरोध दर्शवू, एवढे करून सरकार दडपशाहीने प्राधिकरण लादणार असेल, तर जनहित याचिका दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्राधिकरण विरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर प्राधिकरणाला विरोध करणारे गावसभांचे ठराव पालकमंत्री चंद्रकांत पाटील व तिन्ही आमदारांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला.प्राधिकरण विरोधी कृती समितीची बैठक करवीर पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी कृती समितीचे निमंत्रक व करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी होते.

प्रास्ताविकात वडणगेचे सरपंच सचिन चौगले म्हणाले, प्राधिकरणाच्या फायदे-तोट्यांची माहिती झाली असून, आता याला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला विकास पाहिजे पण विकासासाठी आम्ही भूमिहीन होणार असेल तर तसा विकासच नको. इतर ठिकाणी जमिनी घेतल्या त्या पडीक होत्या, आमच्या पिकाऊ जमिनी असल्याने त्या देवून भिकेला लागायचे का? असा सवाल केला.

गावठाण्यात आहेत तेवढीच घरे नियमित करून उर्वरित बांधकामे बेकायदेशीर ठरवून त्यावर दंड आकारणार. या दंडाच्या रकमेतून आमचा विकास करणार, आम्हाला लुटून कोण विकास करणार असेल, तर तो कदापि मान्य करणार नसल्याचा इशारा अशोक पाटील (शिंगणापूर) यांनी दिला.

प्रा. बी. जी. मांगले म्हणाले, कोणत्याही प्रश्नांचे सार्वत्रिकरण झाल्याशिवाय त्याची उकल होत नाही. जनहित याचिकेचा पर्याय सर्वांत शेवटचा आहे. तत्पूर्वी लोकप्रतिनिधींना निवेदने देऊच, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ४२ गावांत जाऊन जनजागृती केली पाहिजे. तेथील लोकांना या रेट्यात सहभागी करून घेतले तरच प्राधिकरणविरोधात जनआंदोलन उभे राहील.

ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनाही या लढ्यात सहभागी करून घेऊया, अभ्यासू लोकांची समिती स्थापन करून प्राधिकरण का नको, आम्हाला काय हवे आहे, याचा आराखडा मंत्र्यांकडे चर्चेला जाताना हवा. जी. आर. कुलकर्णी (कोल्हापूर) यांनी विकासाच्या दृष्टीने प्राधिकरण कसे योग्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला जोरदार विरोध झाला.

प्राधिकरणामुळे जमिनी जाऊन भीक मागण्याची वेळ येईल, लोकांना भिकेला लावून कोण विकास साधणार असेल तर त्याला विरोधच राहील, असे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी ठणकावून सांगितले.शरद निगडे (नागदेववाडी), प्रकाश पाटील (नेर्ली), संदीप पाटील (वाशी), प्रताप साळोखे (कळंबा) यांनी मनोगत व्यक्त केले. शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे, अमर पाटील, कृष्णात धोत्रे, विश्वास कामिरे, आदी उपस्थित होते.दरम्यान, राजेंद्र सूर्यवंशी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. आठवड्याभरात याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन पाटील यांनी दिल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

जमीन मालकांवर वॉचमनची वेळपिंपरी चिंचवड प्राधिकरणासारखे दिवास्वप्न दाखवले जाते. भूसंपादनातून ग्रामस्थांकडे पैसा आला, बंगला-गाड्या झाल्या पण कालांतराने पैसे संपले आणि हीच मंडळी ज्यांना जमिनी विकल्या त्यांच्या दारात वॉचमन म्हणून काम करण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे सचिन चौगले यांनी सांगितले.

‘लोकमत’चे अभिनंदनराज्यात ज्या शहरांत प्राधिकरण झाले, तेथील वस्तुस्थिती ‘लोकमत’ने अभ्यासपूर्णरित्या मांडले. प्राधिकरणाचा बुरखा फाडून सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याचे सांगत करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, पंडित लाड (निगवे दुमाला), अशोक पाटील (शिंगणापूर) आदींनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले.

सूर्यवंशींचा सदस्यत्वाचा राजीनामात्या तालुक्याचे सभापती हे प्राधिकरण समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. पण प्राधिकरणाला ४२ गावांचा विरोध असेल, तर आपण जनतेसोबत राहू, असे सांगत करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर