शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : प्राधिकरण नकोच, यावर ४२ गावे ठाम,पालकमंत्र्यांसोबत आठ दिवसांत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 11:24 IST

प्राधिकरणाला विरोध करणारे गावसभांचे ठराव पालकमंत्री चंद्रकांत पाटील व तिन्ही आमदारांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

ठळक मुद्देप्राधिकरण नकोच, यावर ४२ गावे ठाम, पालकमंत्र्यांसोबत आठ दिवसांत बैठकप्राधिकरण विरोधी कृती समिती गावोगावी जाऊन जनजागृती करणार

कोल्हापूर : गेल्या वर्षभरात प्राधिकरण म्हणजे काय आणि ते झाल्यानंतर काय अडचणी येणार हेच ग्रामस्थांना माहीत नाही. यासाठी ४२ गावांचा दौरा करून जनजागृती करू, पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची भेट घेऊन विरोध दर्शवू, एवढे करून सरकार दडपशाहीने प्राधिकरण लादणार असेल, तर जनहित याचिका दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्राधिकरण विरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर प्राधिकरणाला विरोध करणारे गावसभांचे ठराव पालकमंत्री चंद्रकांत पाटील व तिन्ही आमदारांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला.प्राधिकरण विरोधी कृती समितीची बैठक करवीर पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी कृती समितीचे निमंत्रक व करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी होते.

प्रास्ताविकात वडणगेचे सरपंच सचिन चौगले म्हणाले, प्राधिकरणाच्या फायदे-तोट्यांची माहिती झाली असून, आता याला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला विकास पाहिजे पण विकासासाठी आम्ही भूमिहीन होणार असेल तर तसा विकासच नको. इतर ठिकाणी जमिनी घेतल्या त्या पडीक होत्या, आमच्या पिकाऊ जमिनी असल्याने त्या देवून भिकेला लागायचे का? असा सवाल केला.

गावठाण्यात आहेत तेवढीच घरे नियमित करून उर्वरित बांधकामे बेकायदेशीर ठरवून त्यावर दंड आकारणार. या दंडाच्या रकमेतून आमचा विकास करणार, आम्हाला लुटून कोण विकास करणार असेल, तर तो कदापि मान्य करणार नसल्याचा इशारा अशोक पाटील (शिंगणापूर) यांनी दिला.

प्रा. बी. जी. मांगले म्हणाले, कोणत्याही प्रश्नांचे सार्वत्रिकरण झाल्याशिवाय त्याची उकल होत नाही. जनहित याचिकेचा पर्याय सर्वांत शेवटचा आहे. तत्पूर्वी लोकप्रतिनिधींना निवेदने देऊच, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ४२ गावांत जाऊन जनजागृती केली पाहिजे. तेथील लोकांना या रेट्यात सहभागी करून घेतले तरच प्राधिकरणविरोधात जनआंदोलन उभे राहील.

ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनाही या लढ्यात सहभागी करून घेऊया, अभ्यासू लोकांची समिती स्थापन करून प्राधिकरण का नको, आम्हाला काय हवे आहे, याचा आराखडा मंत्र्यांकडे चर्चेला जाताना हवा. जी. आर. कुलकर्णी (कोल्हापूर) यांनी विकासाच्या दृष्टीने प्राधिकरण कसे योग्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला जोरदार विरोध झाला.

प्राधिकरणामुळे जमिनी जाऊन भीक मागण्याची वेळ येईल, लोकांना भिकेला लावून कोण विकास साधणार असेल तर त्याला विरोधच राहील, असे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी ठणकावून सांगितले.शरद निगडे (नागदेववाडी), प्रकाश पाटील (नेर्ली), संदीप पाटील (वाशी), प्रताप साळोखे (कळंबा) यांनी मनोगत व्यक्त केले. शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे, अमर पाटील, कृष्णात धोत्रे, विश्वास कामिरे, आदी उपस्थित होते.दरम्यान, राजेंद्र सूर्यवंशी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. आठवड्याभरात याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन पाटील यांनी दिल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

जमीन मालकांवर वॉचमनची वेळपिंपरी चिंचवड प्राधिकरणासारखे दिवास्वप्न दाखवले जाते. भूसंपादनातून ग्रामस्थांकडे पैसा आला, बंगला-गाड्या झाल्या पण कालांतराने पैसे संपले आणि हीच मंडळी ज्यांना जमिनी विकल्या त्यांच्या दारात वॉचमन म्हणून काम करण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे सचिन चौगले यांनी सांगितले.

‘लोकमत’चे अभिनंदनराज्यात ज्या शहरांत प्राधिकरण झाले, तेथील वस्तुस्थिती ‘लोकमत’ने अभ्यासपूर्णरित्या मांडले. प्राधिकरणाचा बुरखा फाडून सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याचे सांगत करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, पंडित लाड (निगवे दुमाला), अशोक पाटील (शिंगणापूर) आदींनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले.

सूर्यवंशींचा सदस्यत्वाचा राजीनामात्या तालुक्याचे सभापती हे प्राधिकरण समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. पण प्राधिकरणाला ४२ गावांचा विरोध असेल, तर आपण जनतेसोबत राहू, असे सांगत करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर