शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर : महात्मा फुले योजनेत नवीन सहा रुग्णालये : सुभाष नांगरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 11:48 IST

राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील समाविष्ट असलेल्या १0 रुग्णालयांना योजनेतून कायमचे बंद करण्यात आले आहे; पण त्याबदली कोल्हापूर शहरातील तीन, उजळाईवाडी (ता. करवीर) येथील एक आणि जयसिंगपूर, इचलकरंजी येथील प्रत्येकी एक अशा सहा नवीन रुग्णालयांचा समाविष्ट करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहात्मा फुले योजनेत नवीन सहा रुग्णालये : सुभाष नांगरेनिलंबित दहा रुग्णालये बाहेर

कोल्हापूर : राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील समाविष्ट असलेल्या १0 रुग्णालयांना योजनेतून कायमचे बंद करण्यात आले आहे; पण त्याबदली कोल्हापूर शहरातील तीन, उजळाईवाडी (ता. करवीर) येथील एक आणि जयसिंगपूर, इचलकरंजी येथील प्रत्येकी एक अशा सहा नवीन रुग्णालयांचा समाविष्ट करण्यात आला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेत ३२ रुग्णालयांचा समावेश होता. या सर्व रुग्णालयांवर या योजनेचे वरिष्ठ अधिकारी यांनी १४ आॅक्टोबर २०१८ ला छापे टाकले होते. त्यामध्ये चार रुग्णालयांना योजनेतून बाहेर काढण्यात आले होते, तर १0 रुग्णालयांना विविध कारणामुळे तात्पुरते निलंबित करण्यात आले होते.

या निलंबित रुग्णालयांना वरिष्ठ अधिकारी यांनी सोमवारी (दि. १२) कायमचे बंद केले आहे. त्यामध्ये सुश्रुषा हॉस्पिटल, आनंद नर्सिंग होम, बसरगे हॉस्पिटल, महालक्ष्मी हृदयालय (साई कार्डियॉक), पट्टणशेट्टी हॉस्पिटल, पायोस हॉस्पिटल, गणेश हॉस्पिटल आदींचा समावेश आहे.त्या बदल्यात या जनआरोग्य योजनेत लिशा हॉटेल चौकातील ट्युलिप मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, महावीर महाविद्यालयाजवळील डायमंड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, महाराणा प्रताप चौकातील के.पी. सी. हॉस्पिटल, जयसिंगपूरमधील माने केअर व इचलकरंजीतील अलाईन्स व उजळाईवाडीतील अथायु हॉस्पिटल यांना समाविष्ट करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे यांनी दिली. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर