शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

कोल्हापूर : साखर निर्यातीपेक्षा इथेनॉल निर्मितीच्या धोरणाची गरज : शामराव देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 18:53 IST

साखरेचे भाव दिवसेंदिवस खाली येणार असल्याने साखर कारखानदार शासनाकडून प्रति टन १० हजाराचे अनुदान घेऊन ४० लाख टन साखर निर्यात करु इच्छित आहेत. परंतु यापेक्षा ऊसापासून इथेनॉलची निर्मिती करण्याच्या धोरणाची गरज असून ते फायदेशीर आहे.

ठळक मुद्दे साखर निर्यातीपेक्षा इथेनॉल निर्मितीच्या धोरणाची गरज : शामराव देसाईनरेंद्र मोदी व रामविलास पासवान यांना भेटणार

कोल्हापूर : साखरेचे भाव दिवसेंदिवस खाली येणार असल्याने साखर कारखानदार शासनाकडून प्रति टन १० हजाराचे अनुदान घेऊन ४० लाख टन साखर निर्यात करु इच्छित आहेत. परंतु यापेक्षा ऊसापासून इथेनॉलची निर्मिती करण्याच्या धोरणाची गरज असून ते फायदेशीर आहे.

आपण यासाठी मंगळवारी (दि.२४) पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अन्न व नागरि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांना भेटणार आहे, अशी माहिती जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक शामराव देसाई यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

देसाई म्हणाले, भारतात आज साखरेचे दर प्रति किलो २८ रुपये असून ते २५ रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. यासाठी सर्व साखर कारखानदार व त्यांच्या संघटना साखर निर्यात अनुदान प्रति क्विंटल १००० रुपये म्हणजे प्रतिटन १० हजार रुपये शासनाकडे मागत आहेत. यातून ४० लाख टन साखर निर्यात केली जाणार आहे. यासाठी ४ हजार कोटी रुपये अनुदान अपेक्षित आहे.

वास्तविक परदेशात साखरेचे दर भारतापेक्षा कमी म्हणजे प्रति किलो २३ रुपये आहेत. साखर निर्यातीस परवानगी मागणे हे कोणत्या शास्त्रात बसते हा प्रश्न आहे.ते पुढे म्हणाले,यावर रामबाण उपाय म्हणजे ऊसापासून इथेनॉल तयार करण्याच्या धोरणाला सरकारने परवानगी द्यावी. यामुळे ऊसाला ३८०० ते ४००० रुपये दर निश्चित मिळू शकतो. त्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडून इथेनॉल निर्मिती धोरणाची मागणी मान्य करुन घ्यावी. यावेळी नारायण पोवार, सुजाता देसाई उपस्थित होते. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर