शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

कोल्हापूर : साखर निर्यातीपेक्षा इथेनॉल निर्मितीच्या धोरणाची गरज : शामराव देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 18:53 IST

साखरेचे भाव दिवसेंदिवस खाली येणार असल्याने साखर कारखानदार शासनाकडून प्रति टन १० हजाराचे अनुदान घेऊन ४० लाख टन साखर निर्यात करु इच्छित आहेत. परंतु यापेक्षा ऊसापासून इथेनॉलची निर्मिती करण्याच्या धोरणाची गरज असून ते फायदेशीर आहे.

ठळक मुद्दे साखर निर्यातीपेक्षा इथेनॉल निर्मितीच्या धोरणाची गरज : शामराव देसाईनरेंद्र मोदी व रामविलास पासवान यांना भेटणार

कोल्हापूर : साखरेचे भाव दिवसेंदिवस खाली येणार असल्याने साखर कारखानदार शासनाकडून प्रति टन १० हजाराचे अनुदान घेऊन ४० लाख टन साखर निर्यात करु इच्छित आहेत. परंतु यापेक्षा ऊसापासून इथेनॉलची निर्मिती करण्याच्या धोरणाची गरज असून ते फायदेशीर आहे.

आपण यासाठी मंगळवारी (दि.२४) पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अन्न व नागरि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांना भेटणार आहे, अशी माहिती जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक शामराव देसाई यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

देसाई म्हणाले, भारतात आज साखरेचे दर प्रति किलो २८ रुपये असून ते २५ रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. यासाठी सर्व साखर कारखानदार व त्यांच्या संघटना साखर निर्यात अनुदान प्रति क्विंटल १००० रुपये म्हणजे प्रतिटन १० हजार रुपये शासनाकडे मागत आहेत. यातून ४० लाख टन साखर निर्यात केली जाणार आहे. यासाठी ४ हजार कोटी रुपये अनुदान अपेक्षित आहे.

वास्तविक परदेशात साखरेचे दर भारतापेक्षा कमी म्हणजे प्रति किलो २३ रुपये आहेत. साखर निर्यातीस परवानगी मागणे हे कोणत्या शास्त्रात बसते हा प्रश्न आहे.ते पुढे म्हणाले,यावर रामबाण उपाय म्हणजे ऊसापासून इथेनॉल तयार करण्याच्या धोरणाला सरकारने परवानगी द्यावी. यामुळे ऊसाला ३८०० ते ४००० रुपये दर निश्चित मिळू शकतो. त्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडून इथेनॉल निर्मिती धोरणाची मागणी मान्य करुन घ्यावी. यावेळी नारायण पोवार, सुजाता देसाई उपस्थित होते. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर