शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोल्हापूर : साखर निर्यातीपेक्षा इथेनॉल निर्मितीच्या धोरणाची गरज : शामराव देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 18:53 IST

साखरेचे भाव दिवसेंदिवस खाली येणार असल्याने साखर कारखानदार शासनाकडून प्रति टन १० हजाराचे अनुदान घेऊन ४० लाख टन साखर निर्यात करु इच्छित आहेत. परंतु यापेक्षा ऊसापासून इथेनॉलची निर्मिती करण्याच्या धोरणाची गरज असून ते फायदेशीर आहे.

ठळक मुद्दे साखर निर्यातीपेक्षा इथेनॉल निर्मितीच्या धोरणाची गरज : शामराव देसाईनरेंद्र मोदी व रामविलास पासवान यांना भेटणार

कोल्हापूर : साखरेचे भाव दिवसेंदिवस खाली येणार असल्याने साखर कारखानदार शासनाकडून प्रति टन १० हजाराचे अनुदान घेऊन ४० लाख टन साखर निर्यात करु इच्छित आहेत. परंतु यापेक्षा ऊसापासून इथेनॉलची निर्मिती करण्याच्या धोरणाची गरज असून ते फायदेशीर आहे.

आपण यासाठी मंगळवारी (दि.२४) पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अन्न व नागरि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांना भेटणार आहे, अशी माहिती जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक शामराव देसाई यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

देसाई म्हणाले, भारतात आज साखरेचे दर प्रति किलो २८ रुपये असून ते २५ रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. यासाठी सर्व साखर कारखानदार व त्यांच्या संघटना साखर निर्यात अनुदान प्रति क्विंटल १००० रुपये म्हणजे प्रतिटन १० हजार रुपये शासनाकडे मागत आहेत. यातून ४० लाख टन साखर निर्यात केली जाणार आहे. यासाठी ४ हजार कोटी रुपये अनुदान अपेक्षित आहे.

वास्तविक परदेशात साखरेचे दर भारतापेक्षा कमी म्हणजे प्रति किलो २३ रुपये आहेत. साखर निर्यातीस परवानगी मागणे हे कोणत्या शास्त्रात बसते हा प्रश्न आहे.ते पुढे म्हणाले,यावर रामबाण उपाय म्हणजे ऊसापासून इथेनॉल तयार करण्याच्या धोरणाला सरकारने परवानगी द्यावी. यामुळे ऊसाला ३८०० ते ४००० रुपये दर निश्चित मिळू शकतो. त्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडून इथेनॉल निर्मिती धोरणाची मागणी मान्य करुन घ्यावी. यावेळी नारायण पोवार, सुजाता देसाई उपस्थित होते. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर