शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

कोल्हापूर : राष्ट्रवादी ‘उत्तर’वर दावा करणार, प्रदेशाध्यक्षांकडून चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 13:15 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्धार दोन्ही कॉँग्रेसनी केला आहे. जागावाटपात फारशी ताणाताणी होईल, असे वाटत नसले तरी विधानसभेची पाचवी जागा लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला असून, ‘कोल्हापूर उत्तर’वर दावा केला जाणार असल्याने पेच निर्माण होऊ शकतो.

ठळक मुद्दे पुत्रप्रेमापोटी त्याने चक्क बनवली दुचाकीनीलेश कोंडेकर यांनी १० हजारांत बनवली तीन फुटी मोटरसायकल

कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्धार दोन्ही कॉँग्रेसनी केला आहे. जागावाटपात फारशी ताणाताणी होईल, असे वाटत नसले तरी विधानसभेची पाचवी जागा लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला असून, ‘कोल्हापूर उत्तर’वर दावा केला जाणार असल्याने पेच निर्माण होऊ शकतो.

राष्ट्रवादीकडे सध्या येथून ताकदीचा उमेदवार नसला तरी ऐनवेळी मधुरिमाराजे यांना रिंगणात उतरवून भाजपसह शिवसेनेची कोंडी करण्याची रणनीती आहे.भाजपचा संपूर्ण देशात उधळलेला वारू रोखण्यासाठी सर्वपक्षीय मोट बांधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुरू केला आहे. त्याला कॉँग्रेसने पाठबळ दिल्याने आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक दोन्ही कॉँग्रेस एकसंधपणे लढणार, हे निश्चित आहे. राष्ट्रवादीने संघटनात्मक पातळीवर फेरबदल करून निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे.

प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला आणून दिशा स्पष्ट केली आहे. पाटील यांनी जिल्हानिहाय पक्षबांधणीचा आराखडा तयार केला असून, त्यानुसार काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याची भूमिका घेतली आहे.

जिल्ह्यातील एका शिष्टमंडळाने नुकतीच प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद, कॉँग्रेसचे प्राबल्य आणि विरोधी शिवसेना-भाजपची तयारी यांची चाचपणी केली. यावेळी त्यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतला.विधानसभा निवडणुकीत दहापैकी पाच जागा राष्ट्रवादीला घेण्याची रणनीती प्रदेशाध्यक्षांची आहे. ‘चंदगड’, ‘कागल’ येथे पक्षाचे विद्यमान आमदार आहेत, ‘राधानगरी-भुदरगड’, ‘शिरोळ’मध्ये पक्षाची ताकद आहे. त्यामुळे दोन्ही कॉँग्रेसच्या जागावाटपात येथे फारशी ताणाताणी होणार नाही.

‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील आहेत; पण येथून कॉँग्रेसतर्फे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी तयारी केल्याने पेच निर्माण होऊ शकतो. ‘करवीर’, ‘दक्षिण’ आणि ‘उत्तर’ हे शहराशेजारील तिन्ही मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादीचे नेते तयार होतील, असे वाटत नाही.‘उत्तर’मधून लढण्यास राष्ट्रवादीकडे सध्या चेहरा तरी दिसत नाही; पण येथून माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी व राष्ट्रवादीचे दिवंगत नेते दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या मधुरिमाराजे यांना राष्ट्रवादीमधून उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मधुरिमाराजेंचे नाव पुढे आल्यास कॉँग्रेसही शांत होईल आणि छत्रपती घरण्याबद्दल शहरात कमालीचा आदर आहे. त्यात स्वर्गीय खानविलकर यांच्या पुण्याईच्या बळावर मधुरिमाराजे सहज विजयी होतील, असे गणित राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासमोर मांडले आहे.

मधुरिमाराजे यांचे नाव कॉँग्रेस, भाजपकडूनही घेतले असले तरी मुळात शाहू छत्रपती यांनी अजून त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील न दाखविल्याने कॉँग्रेस, भाजप नेत्यांची कोंडी झाली आहे. शाहू छत्रपती यांचे मन वळविण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच करू शकतात. पवार यांनी शब्द टाकल्यास शाहू छत्रपतीही राजी होतील, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे.

‘के.पी., ए.वाय.’ यांची वरिष्ठांवर जबाबदारीराधानगरी-भुदरगड मतदारसंघावर के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनी दावा केल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसमोर पेच आहे. मेहुण्या-पाहुण्यांतील तिढा वरिष्ठ पातळीवरूनच सोडविण्याची नेत्यांनी तयारी केली आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक