शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

कोल्हापूर : जमिनीवरून करवीरपीठाचे नाव कमी करावे, शेतकऱ्यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:51 IST

मौजे हिटणी, कोनोली, वाटंगी, बार्वे, हळदी, खिद्रापूर, हुपरी येथील जमिनी आमच्या मालकीच्या वहिवाटीच्या आहेत. त्यांचा शंकराचार्य पीठाशी कोणताही संबंध नाही; त्यामुळे या जमिनींच्या सातबारावरील करवीरपीठाचे नाव कमी करावे व जमिनी देवस्थानात जाऊ नयेत, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी गुरू बिराजदार यांना देण्यात आले.

ठळक मुद्दे जमिनीवरून करवीरपीठाचे नाव कमी करावेशेतकऱ्यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : मौजे हिटणी, कोनोली, वाटंगी, बार्वे, हळदी, खिद्रापूर, हुपरी येथील जमिनी आमच्या मालकीच्या वहिवाटीच्या आहेत. त्यांचा शंकराचार्य पीठाशी कोणताही संबंध नाही; त्यामुळे या जमिनींच्या सातबारावरील करवीरपीठाचे नाव कमी करावे व जमिनी देवस्थानात जाऊ नयेत, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी गुरू बिराजदार यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज, राधानगरी, आजरा, भुदरगड, करवीर, शिरोळ, मौजे हुपरी, हातकणंगले या विविध गावांमधील जमिनी शंकराचार्य पीठाच्या मालकीच्या नसून आमच्या आहेत. जमिनी पीठाच्या असल्याचा पुरावा नसताना पीठाकडून शासनाची दिशाभूल करण्यात येत आहे.

पीठाला शेतसारा गोळा करण्याचा दुमालदार म्हणून अधिकार होता, तो १९४५ साली काढून घेण्यात आला आहे. जमिनींशी शंकराचार्य पीठाचा कोणताही संबंध नसताना त्यांच्या नावाच्या पोकळ नोंदी आहेत; तर काही गावांत नोंदी कमी करण्यात आल्या आहेत. मात्र शंकराचार्य पीठाने केलेल्या तक्रारीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

पोकळ नोंदीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी जमिनी शासनाला लिहून देण्याचा प्रयत्न पीठाकडून सुरू आहे. तरी शासनाने करवीर पीठाकडून होत असलेला अन्याय थांबवावा. सातबारावरील करवीर पीठाचे नाव कमी करावे, जमिनी देवस्थानात जाऊ नयेत यासाठी प्रयत्न व्हावेत.

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, वारसा नोंदी व्हाव्यात यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शिष्टमंडळात लक्ष्मण पाटील, मलगोंडा पाटी, बाबासाहेब कागवाडे, शिवाजी जिलबिले, हिंदुराव पाटील, सर्जेराव कामते, गणपती मगदूम, सचिन पाटील, बाजीराव पाटील, रामचंद्र कांबळे, आदी उपस्थित होते.

 

वरील सर्व जमिनी या करवीर पीठाच्या ट्रस्टच्या मालकीच्या आहेत. जमिनीच्या सातबारावर पीठाचेच नाव असून, त्या कोणत्याही व्यक्तीच्या नावे करता येत नाहीत. याबाबतचे सर्व पुरावे करवीर पीठाकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. याच शेतकऱ्यांनी २०१३ साली जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात या जमिनी करवीर पीठाच्या असून आम्ही खंड भरत आहोत, असे निवेदन दिले आहे.- शिवस्वरूप भेंडे, सचिव, शंकराचार्य पीठ, करवीर  

 

टॅग्स :Templeमंदिरkolhapurकोल्हापूर