शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जमिनीवरून करवीरपीठाचे नाव कमी करावे, शेतकऱ्यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:51 IST

मौजे हिटणी, कोनोली, वाटंगी, बार्वे, हळदी, खिद्रापूर, हुपरी येथील जमिनी आमच्या मालकीच्या वहिवाटीच्या आहेत. त्यांचा शंकराचार्य पीठाशी कोणताही संबंध नाही; त्यामुळे या जमिनींच्या सातबारावरील करवीरपीठाचे नाव कमी करावे व जमिनी देवस्थानात जाऊ नयेत, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी गुरू बिराजदार यांना देण्यात आले.

ठळक मुद्दे जमिनीवरून करवीरपीठाचे नाव कमी करावेशेतकऱ्यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : मौजे हिटणी, कोनोली, वाटंगी, बार्वे, हळदी, खिद्रापूर, हुपरी येथील जमिनी आमच्या मालकीच्या वहिवाटीच्या आहेत. त्यांचा शंकराचार्य पीठाशी कोणताही संबंध नाही; त्यामुळे या जमिनींच्या सातबारावरील करवीरपीठाचे नाव कमी करावे व जमिनी देवस्थानात जाऊ नयेत, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी गुरू बिराजदार यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज, राधानगरी, आजरा, भुदरगड, करवीर, शिरोळ, मौजे हुपरी, हातकणंगले या विविध गावांमधील जमिनी शंकराचार्य पीठाच्या मालकीच्या नसून आमच्या आहेत. जमिनी पीठाच्या असल्याचा पुरावा नसताना पीठाकडून शासनाची दिशाभूल करण्यात येत आहे.

पीठाला शेतसारा गोळा करण्याचा दुमालदार म्हणून अधिकार होता, तो १९४५ साली काढून घेण्यात आला आहे. जमिनींशी शंकराचार्य पीठाचा कोणताही संबंध नसताना त्यांच्या नावाच्या पोकळ नोंदी आहेत; तर काही गावांत नोंदी कमी करण्यात आल्या आहेत. मात्र शंकराचार्य पीठाने केलेल्या तक्रारीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

पोकळ नोंदीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी जमिनी शासनाला लिहून देण्याचा प्रयत्न पीठाकडून सुरू आहे. तरी शासनाने करवीर पीठाकडून होत असलेला अन्याय थांबवावा. सातबारावरील करवीर पीठाचे नाव कमी करावे, जमिनी देवस्थानात जाऊ नयेत यासाठी प्रयत्न व्हावेत.

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, वारसा नोंदी व्हाव्यात यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शिष्टमंडळात लक्ष्मण पाटील, मलगोंडा पाटी, बाबासाहेब कागवाडे, शिवाजी जिलबिले, हिंदुराव पाटील, सर्जेराव कामते, गणपती मगदूम, सचिन पाटील, बाजीराव पाटील, रामचंद्र कांबळे, आदी उपस्थित होते.

 

वरील सर्व जमिनी या करवीर पीठाच्या ट्रस्टच्या मालकीच्या आहेत. जमिनीच्या सातबारावर पीठाचेच नाव असून, त्या कोणत्याही व्यक्तीच्या नावे करता येत नाहीत. याबाबतचे सर्व पुरावे करवीर पीठाकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. याच शेतकऱ्यांनी २०१३ साली जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात या जमिनी करवीर पीठाच्या असून आम्ही खंड भरत आहोत, असे निवेदन दिले आहे.- शिवस्वरूप भेंडे, सचिव, शंकराचार्य पीठ, करवीर  

 

टॅग्स :Templeमंदिरkolhapurकोल्हापूर