शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

कोल्हापूर : जमिनीवरून करवीरपीठाचे नाव कमी करावे, शेतकऱ्यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:51 IST

मौजे हिटणी, कोनोली, वाटंगी, बार्वे, हळदी, खिद्रापूर, हुपरी येथील जमिनी आमच्या मालकीच्या वहिवाटीच्या आहेत. त्यांचा शंकराचार्य पीठाशी कोणताही संबंध नाही; त्यामुळे या जमिनींच्या सातबारावरील करवीरपीठाचे नाव कमी करावे व जमिनी देवस्थानात जाऊ नयेत, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी गुरू बिराजदार यांना देण्यात आले.

ठळक मुद्दे जमिनीवरून करवीरपीठाचे नाव कमी करावेशेतकऱ्यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : मौजे हिटणी, कोनोली, वाटंगी, बार्वे, हळदी, खिद्रापूर, हुपरी येथील जमिनी आमच्या मालकीच्या वहिवाटीच्या आहेत. त्यांचा शंकराचार्य पीठाशी कोणताही संबंध नाही; त्यामुळे या जमिनींच्या सातबारावरील करवीरपीठाचे नाव कमी करावे व जमिनी देवस्थानात जाऊ नयेत, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी गुरू बिराजदार यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज, राधानगरी, आजरा, भुदरगड, करवीर, शिरोळ, मौजे हुपरी, हातकणंगले या विविध गावांमधील जमिनी शंकराचार्य पीठाच्या मालकीच्या नसून आमच्या आहेत. जमिनी पीठाच्या असल्याचा पुरावा नसताना पीठाकडून शासनाची दिशाभूल करण्यात येत आहे.

पीठाला शेतसारा गोळा करण्याचा दुमालदार म्हणून अधिकार होता, तो १९४५ साली काढून घेण्यात आला आहे. जमिनींशी शंकराचार्य पीठाचा कोणताही संबंध नसताना त्यांच्या नावाच्या पोकळ नोंदी आहेत; तर काही गावांत नोंदी कमी करण्यात आल्या आहेत. मात्र शंकराचार्य पीठाने केलेल्या तक्रारीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

पोकळ नोंदीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी जमिनी शासनाला लिहून देण्याचा प्रयत्न पीठाकडून सुरू आहे. तरी शासनाने करवीर पीठाकडून होत असलेला अन्याय थांबवावा. सातबारावरील करवीर पीठाचे नाव कमी करावे, जमिनी देवस्थानात जाऊ नयेत यासाठी प्रयत्न व्हावेत.

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, वारसा नोंदी व्हाव्यात यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शिष्टमंडळात लक्ष्मण पाटील, मलगोंडा पाटी, बाबासाहेब कागवाडे, शिवाजी जिलबिले, हिंदुराव पाटील, सर्जेराव कामते, गणपती मगदूम, सचिन पाटील, बाजीराव पाटील, रामचंद्र कांबळे, आदी उपस्थित होते.

 

वरील सर्व जमिनी या करवीर पीठाच्या ट्रस्टच्या मालकीच्या आहेत. जमिनीच्या सातबारावर पीठाचेच नाव असून, त्या कोणत्याही व्यक्तीच्या नावे करता येत नाहीत. याबाबतचे सर्व पुरावे करवीर पीठाकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. याच शेतकऱ्यांनी २०१३ साली जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात या जमिनी करवीर पीठाच्या असून आम्ही खंड भरत आहोत, असे निवेदन दिले आहे.- शिवस्वरूप भेंडे, सचिव, शंकराचार्य पीठ, करवीर  

 

टॅग्स :Templeमंदिरkolhapurकोल्हापूर