शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पूरक्षेत्रातील चार रुग्णालयांना कोल्हापूर पालिकेची नोटीस, ७८ नागरिकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 17:55 IST

संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना इतरत्र हलविण्याची सूचना

कोल्हापूर : पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असून, यापुढे ती आणखी वाढण्याची शक्यता असल्याने महानगरपालिका प्रशासनाने प्रभावी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पूरक्षेत्रात असलेल्या चार रुग्णालयांना सोमवारी रात्री उशिरा पालिकेच्या उपायुक्तांनी नोटीस पाठवून त्यांना नवीन रुग्णांची भरती करून घेऊ नये, तसेच सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना अन्यत्र हलविण्यात यावे, असे कळविले आहे.नोटीस पोहोचल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली नाही तर मात्र संबंधित रुग्णालयांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कारवाई करण्याचा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.सन २०१९ व २०२१ च्या महापुरावेळी पूर क्षेत्रात असलेल्या रुग्णालय प्रशासनाची, तसेच महापालिका प्रशासनाची खूप तारांबळ उडाली होती. महापुराचे पाणी जसे रुग्णालयात शिरायला लागले तसे रुग्णालयातील, तसेच अतिदक्षता विभागातील रुग्ण इतरत्र हलविताना नाकी दम आला होता. त्यावेळी रुग्णांचेही चांगलेच हाल झाले. महापूर येणार आहे हे समजल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली नव्हती.असा प्रसंग यापुढील काळात घडू नये म्हणून पालिका प्रशासनाने खबरदारी घेत सोमवारी ही नोटीस बजावली. अंतरंग, विन्स, डायमंड आणि ॲपल सरस्वती या चार रुग्णालयांचा नोटीस दिलेल्यांमध्ये समावेश आहे. पंचगंगा नदीने ३९ फूट ही इशारा पातळी गाठली आहे. त्यामुळे आपल्या रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना इतरत्र उपचारासाठी दाखल करावे, पूरपातळी कमी होईपर्यंत रुग्णालयात सुरू राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.जर नोटीस दिल्याप्रमाणे कार्यवाही केली नाही तर सर्वस्वी जबाबदार धरून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्तांनी म्हटले आहे. चारही रुग्णालयांना या नोटीस सोमवारी रात्री उशिरा देण्यात आल्या.शहरातील ७८ नागरिकांचे स्थलांतरपंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी इशारा पातळीवर गेली असल्याने शहरातील नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टीजवळील ५८ व सुतारवाडा येथील २० नागरिकांना रविवारी व सोमवारी सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले.चहा, नाश्ता, जेवणाची सोयशहरातील पुराचे पाणी आलेल्या तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टीजवळील ५८ व सुतारवाडा येथील २० नागरिकांचे सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतर करण्यात आले. वीटपट्टी येथील नागरिकांचे मार्केटयार्ड येथील एका हॉलमध्ये, तर सुतारवाडा येथील नागरिकांचे दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात स्थलांतर करण्यात आले आहे. या सर्वांना दोनवेळचे जेवण, दोनवेळचा चहा व एक वेळचा नाश्ता देण्याची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूर