शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पूरक्षेत्रातील चार रुग्णालयांना कोल्हापूर पालिकेची नोटीस, ७८ नागरिकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 17:55 IST

संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना इतरत्र हलविण्याची सूचना

कोल्हापूर : पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असून, यापुढे ती आणखी वाढण्याची शक्यता असल्याने महानगरपालिका प्रशासनाने प्रभावी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पूरक्षेत्रात असलेल्या चार रुग्णालयांना सोमवारी रात्री उशिरा पालिकेच्या उपायुक्तांनी नोटीस पाठवून त्यांना नवीन रुग्णांची भरती करून घेऊ नये, तसेच सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना अन्यत्र हलविण्यात यावे, असे कळविले आहे.नोटीस पोहोचल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली नाही तर मात्र संबंधित रुग्णालयांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कारवाई करण्याचा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.सन २०१९ व २०२१ च्या महापुरावेळी पूर क्षेत्रात असलेल्या रुग्णालय प्रशासनाची, तसेच महापालिका प्रशासनाची खूप तारांबळ उडाली होती. महापुराचे पाणी जसे रुग्णालयात शिरायला लागले तसे रुग्णालयातील, तसेच अतिदक्षता विभागातील रुग्ण इतरत्र हलविताना नाकी दम आला होता. त्यावेळी रुग्णांचेही चांगलेच हाल झाले. महापूर येणार आहे हे समजल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली नव्हती.असा प्रसंग यापुढील काळात घडू नये म्हणून पालिका प्रशासनाने खबरदारी घेत सोमवारी ही नोटीस बजावली. अंतरंग, विन्स, डायमंड आणि ॲपल सरस्वती या चार रुग्णालयांचा नोटीस दिलेल्यांमध्ये समावेश आहे. पंचगंगा नदीने ३९ फूट ही इशारा पातळी गाठली आहे. त्यामुळे आपल्या रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना इतरत्र उपचारासाठी दाखल करावे, पूरपातळी कमी होईपर्यंत रुग्णालयात सुरू राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.जर नोटीस दिल्याप्रमाणे कार्यवाही केली नाही तर सर्वस्वी जबाबदार धरून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्तांनी म्हटले आहे. चारही रुग्णालयांना या नोटीस सोमवारी रात्री उशिरा देण्यात आल्या.शहरातील ७८ नागरिकांचे स्थलांतरपंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी इशारा पातळीवर गेली असल्याने शहरातील नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टीजवळील ५८ व सुतारवाडा येथील २० नागरिकांना रविवारी व सोमवारी सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले.चहा, नाश्ता, जेवणाची सोयशहरातील पुराचे पाणी आलेल्या तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टीजवळील ५८ व सुतारवाडा येथील २० नागरिकांचे सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतर करण्यात आले. वीटपट्टी येथील नागरिकांचे मार्केटयार्ड येथील एका हॉलमध्ये, तर सुतारवाडा येथील नागरिकांचे दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात स्थलांतर करण्यात आले आहे. या सर्वांना दोनवेळचे जेवण, दोनवेळचा चहा व एक वेळचा नाश्ता देण्याची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूर