शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिका : ‘स्थायी’तील गद्दारीची नेतृत्वाने चौकशी करावी: ए. वाय. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 19:12 IST

कोल्हापूर महापालिका स्थायी समिती सभापती निवडीतील पराभवाने आम्ही खचणार नाही, पण पक्षाची झालेली पिछेहाट जिव्हारी लागल्याची खंत व्यक्त करत पक्षात राहून ज्यांनी गद्दारी केली, त्याची चौकशी पक्ष नेतृत्वाने करून योग्य निर्णय घ्यावा. असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.

ठळक मुद्दे‘स्थायी’तील गद्दारीची नेतृत्वाने चौकशी करावी: ए. वाय. पाटीलपराभवाची खंत नाही पण पक्षाची पिछेहाट जिव्हारी

कोल्हापूर : महापालिका स्थायी समिती सभापती निवडीतील पराभवाने आम्ही खचणार नाही, राजकारणात असे अनेक चढउतार पाहिले असून मुले, स्नुषा सह्याद्रीसारखे पुन्हा उभे राहतील. पण पक्षाची झालेली पिछेहाट जिव्हारी लागल्याची खंत व्यक्त करत पक्षात राहून ज्यांनी गद्दारी केली, त्याची चौकशी पक्ष नेतृत्वाने करून योग्य निर्णय घ्यावा. असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.राष्ट्रवादीच्या पक्षातंर्गत निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्याबरोबरच निरीक्षकांची नेमणूक करण्यासाठी सोमवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे निरीक्षक, सांगली जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील होते.सुन स्थायी सभापती पदासाठी उभी असतानाही ए. वाय. पाटील हे शरद पवार यांच्या दौऱ्यात मग्न होते. इतका निष्ठावंत जिल्हाध्यक्ष आपण पाहिला नसल्याचे सांगत माजी खासदार निवेदिता माने यांनी ‘स्थायी’ निवडणूकीतील नाट्याला हात घातला.

आपल्या पराभवापेक्षा मुले, स्रुषाचा पराभव फार जिव्हारी लागतो. पक्षातील छुपी मंडळी पाय ओढण्याचे काम करत असल्याने पक्षाला गालबोट लागते. नेता सक्षम असल्याशिवाय बळ मिळत नाही, याचे भानही ‘त्या’ मंडळींनी ठेवले पाहिजे.पक्षाचा अहवालासह सभासद नोंदणीचे काम राज्यात पहिल्यांदा पुर्ण केल्याबद्दल सरचिटणीस अनिल साळोखे यांचा कौतुक करत ए. वाय. पाटील म्हणाले, ‘स्थायी’तील घडामोडीबाबत आतापर्यंत बोललो नाही आणि बोलणारही नव्हतो, पण निवेदिता माने यांनी विषयाला हात घातल्याने बोलणे क्रमप्राप्त ठरते.

पक्ष स्थापनेपासून नेतृत्व देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. ‘स्थायी’तील प्रकाराची खंत नाही, माझी मुले, स्रुषा सह्याद्रीसारखे उभे राहतील. चिंता पक्षाच्या अवमान व पिछेहाटाची असून गद्दारीची चौकशी नेतृत्वाने करावी. योग्य वेळी सगळे बोलूच, पण नेतृत्वाने पाठीवर हात ठेवून केवळ लढ म्हणावे, जिल्हा राष्ट्रवादीमय करू.निरीक्षक दिलीप पाटील म्हणाले, भाजप सरकारच्या काळात देशभरात ६५ हजार कोटीचे घोटाळे झाले आहेत. दोन्ही कॉँग्रेसची शक्तीस्थळे असलेला सहकार संपवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. सरकारच्या धोरणाने सामान्य माणूस मेटाकुटीला आला असून राष्ट्रवादी कॉग्रेसला चांगले दिवस येणार आहेत.

माजी आमदार के. पी. पाटील, नामदेवराव भोईटे, बाबासाहेब पाटील, अनिल साळोखे, भैया माने, युवराज पाटील, संगीता खाहे, रोहित पाटील, शिवाजी देसाई आदी उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष मधूकर जांभळे यांनी आभार मानले.

कोल्हापूरातील नेते फारच मोठेकोल्हापूरातील पक्षाच्या नेत्यांच्या टीकाटिपणीच्या बातम्या रोज वाचतो, आमच्या जिल्ह्यात असे धाडस कोणात नाही. निरीक्षक म्हणून आपण कोणाविरोधात तक्रार करणार नाही, कारण पवारसाहेंबांनीच आता येथे लक्ष घातले आहे. ते दौऱ्यावरून परत गेल्यानंतर लगेच राजकीय टोलेबाजी सुरू झाली, इतके मोठे नेते येथे आहेत. पण पक्षाच्या चौकटीत राहून काम करतील, असे अपेक्षा करतो, असा टोला दिलीप पाटील यांनी हाणला.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर