शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

कोल्हापूरच्या महानगरपालिका सभेत थेट तिरडी मोर्चा, सत्तारुढ-विरोधी गटातील वादामुळे गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 15:20 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी पडू लागल्याच्या प्रश्नावरुन सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भागातील कार्यकर्त्यांसह थेट महानगरपालिकेच्या सभेत तिरडी मोर्चा आणल्याने बुधवारी गदारोळ उडाला. या सभेत विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सत्तारुढ नगरसेवकांवर टीका करताच विरोधकांवरही टीका झाल्यामुळे सभेतच गदारोळ उडाला.शहराची वाढणारी लोकसंख्या व त्या प्रमाणात मृतदेहांवर ...

ठळक मुद्देपंचगंगा स्मशानभूमीच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे आंदोलनथेट महापालिकेतील सभेतच तिरडी मोर्चा काढून आंदोलनपालकमंत्रीच निधी पुरवित नसल्याचा आरोप

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी पडू लागल्याच्या प्रश्नावरुन सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भागातील कार्यकर्त्यांसह थेट महानगरपालिकेच्या सभेत तिरडी मोर्चा आणल्याने बुधवारी गदारोळ उडाला. या सभेत विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सत्तारुढ नगरसेवकांवर टीका करताच विरोधकांवरही टीका झाल्यामुळे सभेतच गदारोळ उडाला.

शहराची वाढणारी लोकसंख्या व त्या प्रमाणात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पंचगंगा स्मशानभूमीत जागा अपुरी पडू लागली आहे. काही लोकप्रतिनिधींनी स्मशानभूमी विस्तारीकरणासाठी निधी व परिसरातील जागा देण्याच्या घोषणा केल्या आहेत; पण फक्त ‘वरकमाई’मागे धावाधाव करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या घोषणांचा पाठपुरावा केला नाही. परिणामी, विस्तारीकरणाअभावी अनेक मृतदेह स्मशानभूमीत पोहोचूनही त्यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी दहन बेड शिल्लक नसल्याने नातेवाईकांना ताटकळत बसावे लागत आहे. यामुळे गेल्या रविवारी स्मशानभूमीत रक्षाविसर्जनसाठी सर्व दहन बेड फुल्ल असल्यामुळे दोन मृतदेह घेऊन आलेल्या नातेवाईकांना अक्षरश: दोन तास रस्त्यावर मृतदेह ठेवून बेड रिकामे होण्याची प्रतीक्षा करावी लागली.या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि त्यांच्या प्रभागातील कार्यकर्ते बुधवारी आक्रमक झाले. नगरसेवक अफजल पिरजादे, सुनील पाटील, सचिन पाटील, मुरलीधर जाधव, अजिंक्य चव्हाण, संदीप कवाळे यांनी थेट महापालिकेतील सभेतच तिरडी मोर्चा काढून आंदोलन केले.दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सभेत तिरडी आणताच गदारोळी माजला. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सत्ता असताना नगरसेवक आंदोलन कसे करतात, त्यांनी निधी मंजूर करुन आणायला पाहिजे होता, अशी टीका करताच सत्तारुढ आघाडीच्या नगरसेवकांनीही पालकमंत्रीच निधी पुरवित नसल्याचा आरोप करत गोंधळ घातला. तुमच्या पक्षाचेच पालकमंत्री आहेत, त्यांनी महानगरपालिकेला देणारा निधी आखडता घेतल्याचा आरोप या नगरसेवकांनी करताच पुन्हा गोंधळ माजला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका