शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

कोल्हापूरच्या महानगरपालिका सभेत थेट तिरडी मोर्चा, सत्तारुढ-विरोधी गटातील वादामुळे गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 15:20 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी पडू लागल्याच्या प्रश्नावरुन सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भागातील कार्यकर्त्यांसह थेट महानगरपालिकेच्या सभेत तिरडी मोर्चा आणल्याने बुधवारी गदारोळ उडाला. या सभेत विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सत्तारुढ नगरसेवकांवर टीका करताच विरोधकांवरही टीका झाल्यामुळे सभेतच गदारोळ उडाला.शहराची वाढणारी लोकसंख्या व त्या प्रमाणात मृतदेहांवर ...

ठळक मुद्देपंचगंगा स्मशानभूमीच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे आंदोलनथेट महापालिकेतील सभेतच तिरडी मोर्चा काढून आंदोलनपालकमंत्रीच निधी पुरवित नसल्याचा आरोप

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी पडू लागल्याच्या प्रश्नावरुन सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भागातील कार्यकर्त्यांसह थेट महानगरपालिकेच्या सभेत तिरडी मोर्चा आणल्याने बुधवारी गदारोळ उडाला. या सभेत विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सत्तारुढ नगरसेवकांवर टीका करताच विरोधकांवरही टीका झाल्यामुळे सभेतच गदारोळ उडाला.

शहराची वाढणारी लोकसंख्या व त्या प्रमाणात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पंचगंगा स्मशानभूमीत जागा अपुरी पडू लागली आहे. काही लोकप्रतिनिधींनी स्मशानभूमी विस्तारीकरणासाठी निधी व परिसरातील जागा देण्याच्या घोषणा केल्या आहेत; पण फक्त ‘वरकमाई’मागे धावाधाव करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या घोषणांचा पाठपुरावा केला नाही. परिणामी, विस्तारीकरणाअभावी अनेक मृतदेह स्मशानभूमीत पोहोचूनही त्यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी दहन बेड शिल्लक नसल्याने नातेवाईकांना ताटकळत बसावे लागत आहे. यामुळे गेल्या रविवारी स्मशानभूमीत रक्षाविसर्जनसाठी सर्व दहन बेड फुल्ल असल्यामुळे दोन मृतदेह घेऊन आलेल्या नातेवाईकांना अक्षरश: दोन तास रस्त्यावर मृतदेह ठेवून बेड रिकामे होण्याची प्रतीक्षा करावी लागली.या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि त्यांच्या प्रभागातील कार्यकर्ते बुधवारी आक्रमक झाले. नगरसेवक अफजल पिरजादे, सुनील पाटील, सचिन पाटील, मुरलीधर जाधव, अजिंक्य चव्हाण, संदीप कवाळे यांनी थेट महापालिकेतील सभेतच तिरडी मोर्चा काढून आंदोलन केले.दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सभेत तिरडी आणताच गदारोळी माजला. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सत्ता असताना नगरसेवक आंदोलन कसे करतात, त्यांनी निधी मंजूर करुन आणायला पाहिजे होता, अशी टीका करताच सत्तारुढ आघाडीच्या नगरसेवकांनीही पालकमंत्रीच निधी पुरवित नसल्याचा आरोप करत गोंधळ घातला. तुमच्या पक्षाचेच पालकमंत्री आहेत, त्यांनी महानगरपालिकेला देणारा निधी आखडता घेतल्याचा आरोप या नगरसेवकांनी करताच पुन्हा गोंधळ माजला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका