शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

‘डेंग्यू’वरुन कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 5:10 PM

कोल्हापूर शहरात झपाट्याने पसरलेल्या डेंग्यू रोगाची साथ अटोक्यात आणण्यात अगर उपाययोजना करण्यात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल मंगळवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

ठळक मुद्दे‘डेंग्यू’वरुन कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेत गदारोळसभेत प्रशासन धारेवर; हलगर्जीपणाबद्दल मुख्य आरोग्य निरीक्षक निलंबीतचे आदेश

कोल्हापूर : शहरात झपाट्याने पसरलेल्या डेंग्यू रोगाची साथ अटोक्यात आणण्यात अगर उपाययोजना करण्यात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल मंगळवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांकडे मुख्य आरोग्यनिरीक्षकचा पदभार कसा? असा प्रश्न विचारत सभागृहात सदस्यांनी गदारोळ माजवला. अखेर डेंग्यू, कचरा उठाव आदी विषयांवरुन वादळी चर्चा होत जबाबदार असणारे मुख्य आरोग्यनिरीक्षक विजय पाटील यांना निलंबीत करण्याचे आदेश सभाध्यक्ष महापौर शोभा बोंद्रे यांनी दिले.कोल्हापूर महानगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरात दिवसे-दिवस वाढणाऱ्या डेंग्यू विषयावरुन सदस्यांनी प्रशासनास सुरुवातीपासून लक्ष बनविले. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे डेंग्यू’चे रुग्ण शहरभर पसरल्याचा आरोप ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजीत कदम यांनी करत, डेंग्यू मध्ये बळी गेलेल्या कदमवाडीतील संजय लोहारच्या कुटूंबियांना महापालिकेतर्फे मदत जाहिर करावी अशी मागणी केली.

यावर सभागृह नेता दिलीप पवार यांनी, शहराच्या प्रत्येक गल्ली-बोळात ८-१० डेंग्यूचे रुग्ण असल्याचे सांगत खासगी रुग्णालयातील खर्च परवडत नसल्याचे सांगितले. डेंग्यूबाबत शहरात ठोस उपाययोजना न केल्याने प्रशासनास डेंग्यूं झाल्याचा आरोप भाजप गटनेते विजय सुर्यवंशी यांनी करुन प्रशासनाने फक्त डेंग्यू झालेल्या काही भागात भेटी देऊन रुग्णांच्या चुका काढण्याचे काम केल्याचे सांगितले.

याप्रसंगी मुख्य आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी शहरात मोजकेच डेंग्यूचे रुग्ण असून उपाययोजना करत असल्याचा खुलासा केला. त्यावर संतोष गायकवाड, विलास वास्कर, भूपाल शेटे, शारंगधर देशमुख यांनी डॉ. दिलीप पाटील यांच्यावर खोटी माहिती देत असल्याचा आरोप करत शहरातील खासगी रुग्णालये डेंग्यूच्या रुग्णांनी फुल्ल असताना हा प्रशासनाकडून होणारा अकडेवारीचा फसवा खेळ थांबवा अशी विनंती केली.त्यानंतर मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी गुरुवारपासून आठवडाभर विशेष मोहीम सुरु ठेवून ‘डेंग्यू’चे समुळ उच्चाटन करणार असल्याचे सांगून उपाययोजना सांगितल्या. त्यावर सदस्यांनी अक्षेप घेत पाटील यांपूर्वी का केल्या नाहीत असा कडक शब्दात जाब विचारला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर