शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

कोल्हापूर : शनिवारपासून हंगाम सुरू होणार, साखर कारखानदारांच्या पातळीवर हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:58 IST

पाण्याबरोबरच उसाच्या टंचाईमुळे हंगाम लांबला तर कारखान्यांसमोर अडचणी निर्माण होतील. त्यामुळे सरकारच्या पातळीवर मदतीसाठी प्रयत्न करूया, पण शनिवार(दि. १०)पासून हंगाम सुरू करायचा, अशा हालचाली साखर कारखानदारांच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत. कागल येथे जिल्ह्यातील कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यामध्ये हंगामाची चाचपणी करण्यात आली.

ठळक मुद्देशनिवारपासून हंगाम सुरू होणार, साखर कारखानदारांच्या पातळीवर हालचालीशेती अधिकाऱ्यांची झाली आढावा बैठक

कोल्हापूर : पाण्याबरोबरच उसाच्या टंचाईमुळे हंगाम लांबला तर कारखान्यांसमोर अडचणी निर्माण होतील. त्यामुळे सरकारच्या पातळीवर मदतीसाठी प्रयत्न करूया, पण शनिवार(दि. १०)पासून हंगाम सुरू करायचा, अशा हालचाली साखर कारखानदारांच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत. कागल येथे जिल्ह्यातील कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यामध्ये हंगामाची चाचपणी करण्यात आली.ऊसदराच्या प्रश्नांवरून साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची कोंडी निर्माण झाली आहे. रविवारी कारखानदारांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन एफआरपी देण्यासाठी मदत करण्याची मागणी केली होती. त्यावर ‘मदत करू पण हंगाम सुरू करा’, अशी सूचना मंत्री पाटील यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांची बैठक कागलमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये कारखानानिहाय आढावा घेण्यात आला.

‘एफआरपी’ देण्यासाठी पैसे उपलब्ध होत नाहीत, ही जरी वस्तुस्थिती असली तरी हंगाम लांबला तर कारखान्यांसमोर त्यापेक्षाही मोठे संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे दिवाळीचे चार दिवस थांबूया, पण शनिवारपासून हंगाम सुरू करावाच लागेल, अशी भूमिका बहुतांशी अधिकाऱ्यांनी मांडली.

ऊसतोडणी मजुुरांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे हात थांबल्याने त्यांना खावटी कर्ज उपलब्ध करून द्यावे लागणार असल्याने तो पेच आहे. त्यामुळे सरकारच्या पातळीवर मदतीसाठी प्रयत्न सुरू ठेवायचा पण कारखाने शनिवारपासून सुरू करावेत यावर एकमत झाल्याचे समजते.शुक्रवारी ‘भाऊबीज’ आहे, शनिवारी हंगाम सुरू करायचा म्हटले तरी मराठवाड्यातील ऊसतोड मजूर शनिवारचा मुहूर्त करत नसल्याचे अनेक कारखाना अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शुक्रवारी दुपारीच तोडण्या देऊन शनिवारपासून हंगाम सुरू होऊ शकतो.

जिल्ह्यात १२० लाख टन ऊस उपलब्धकृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्ह्यातील उसाच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. यंदा १२० लाख टन ऊस उभा असल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने चालणार का? हा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सूचित केल्याचे समजते. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर