शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
4
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
5
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
6
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
7
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
8
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
9
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
10
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
11
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
12
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
13
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
14
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
15
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
16
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
17
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
18
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
19
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
20
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर

कोल्हापूर : शनिवारपासून हंगाम सुरू होणार, साखर कारखानदारांच्या पातळीवर हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:58 IST

पाण्याबरोबरच उसाच्या टंचाईमुळे हंगाम लांबला तर कारखान्यांसमोर अडचणी निर्माण होतील. त्यामुळे सरकारच्या पातळीवर मदतीसाठी प्रयत्न करूया, पण शनिवार(दि. १०)पासून हंगाम सुरू करायचा, अशा हालचाली साखर कारखानदारांच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत. कागल येथे जिल्ह्यातील कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यामध्ये हंगामाची चाचपणी करण्यात आली.

ठळक मुद्देशनिवारपासून हंगाम सुरू होणार, साखर कारखानदारांच्या पातळीवर हालचालीशेती अधिकाऱ्यांची झाली आढावा बैठक

कोल्हापूर : पाण्याबरोबरच उसाच्या टंचाईमुळे हंगाम लांबला तर कारखान्यांसमोर अडचणी निर्माण होतील. त्यामुळे सरकारच्या पातळीवर मदतीसाठी प्रयत्न करूया, पण शनिवार(दि. १०)पासून हंगाम सुरू करायचा, अशा हालचाली साखर कारखानदारांच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत. कागल येथे जिल्ह्यातील कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यामध्ये हंगामाची चाचपणी करण्यात आली.ऊसदराच्या प्रश्नांवरून साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची कोंडी निर्माण झाली आहे. रविवारी कारखानदारांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन एफआरपी देण्यासाठी मदत करण्याची मागणी केली होती. त्यावर ‘मदत करू पण हंगाम सुरू करा’, अशी सूचना मंत्री पाटील यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांची बैठक कागलमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये कारखानानिहाय आढावा घेण्यात आला.

‘एफआरपी’ देण्यासाठी पैसे उपलब्ध होत नाहीत, ही जरी वस्तुस्थिती असली तरी हंगाम लांबला तर कारखान्यांसमोर त्यापेक्षाही मोठे संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे दिवाळीचे चार दिवस थांबूया, पण शनिवारपासून हंगाम सुरू करावाच लागेल, अशी भूमिका बहुतांशी अधिकाऱ्यांनी मांडली.

ऊसतोडणी मजुुरांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे हात थांबल्याने त्यांना खावटी कर्ज उपलब्ध करून द्यावे लागणार असल्याने तो पेच आहे. त्यामुळे सरकारच्या पातळीवर मदतीसाठी प्रयत्न सुरू ठेवायचा पण कारखाने शनिवारपासून सुरू करावेत यावर एकमत झाल्याचे समजते.शुक्रवारी ‘भाऊबीज’ आहे, शनिवारी हंगाम सुरू करायचा म्हटले तरी मराठवाड्यातील ऊसतोड मजूर शनिवारचा मुहूर्त करत नसल्याचे अनेक कारखाना अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शुक्रवारी दुपारीच तोडण्या देऊन शनिवारपासून हंगाम सुरू होऊ शकतो.

जिल्ह्यात १२० लाख टन ऊस उपलब्धकृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्ह्यातील उसाच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. यंदा १२० लाख टन ऊस उभा असल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने चालणार का? हा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सूचित केल्याचे समजते. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर