शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर :‘प्राधिकरणा’स ठोकले टाळे, शिवसेनेचे आंदोलन; अधिकाऱ्यांना काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 16:40 IST

शिवसेनेच्यावतीने मंगळवारी दुपारी मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीतील कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या कार्यालयास टाळे ठोकले. शिवसेना मोगलाई खपवून घेणार नाही, टाळे काढल्यास याद राखा असाही दम दिल्याने अधिकारी व कर्मचारी हतबल झाले.

ठळक मुद्दे‘प्राधिकरणा’स ठोकले टाळे, शिवसेनेचे आंदोलन; अधिकाऱ्यांना काढले बाहेरठोस धोरण-भूमीका नसल्याने आंदोलन

कोल्हापूर : ठोस धोरण नाही, कसे करावे मार्ग नाही तर भूमीकाही स्पष्ट नसल्याने ग्रामीण जनतेची प्राधिकरणाबाबतची संभ्रमावस्था व भिती निर्माण झाली आहे, प्रथम ही भीती दूर करा मगच कार्यालय सुरु ठेवा असा इशारा देत शिवसेनेच्यावतीने मंगळवारी दुपारी मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीतील कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या कार्यालयास टाळे ठोकले. शिवसेना मोगलाई खपवून घेणार नाही, टाळे काढल्यास याद राखा असाही दम दिल्याने अधिकारी व कर्मचारी हतबल झाले.प्राधिकरण स्थापनेपासूनच या प्राधिकरणाचा ठोस आराखडा तयार नसल्याने प्राधिकरणात समाविष्ठ असलेल्या ४२ गावातील जनतेत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे त्यामुळे शिवसेनेने आंदोलनाचे पाऊल उचलले.शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार आणि विजय देवणे, शहराध्यक्ष दुर्गेश लिंग्रस आणि शिवाजी यादव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी शिवसैनिक गळ्यात भगवे उपरणे आडकवून प्राधिकरण कार्यालयात आले. त्यांनी थेट प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

प्राधिकरणाबाबत ग्रामीण जनतेला माहिती आहे का? गावांच्या बैठका घेतल्या का? असे प्रश्न विचारले. ज्यावेळी ही माहिती ग्रामीण जनतेला होईल त्याचवेळी कार्यालय सुरु करा असा सल्ला देत संजय पवार व विजय देवणे यांनी, अधिकारी शिवराज पाटील व त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.

जोपर्यत गावांच्या बैठका घेऊन प्राधिकरण म्हणजे काय? याची माहिती दिली जात नाही, ग्रामीण जनतेच्या मनातील प्राधिकरणाची भिती जात नाही तोपर्यत कार्यालय सुरु करु नका असा इशारा देत शिवसैनिकांनी प्राधिकरणाच्या कार्यालयास टाळे ठोकले.या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, तालुका प्रमुख राजू यादव, तानाजी आंग्रे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश परमार, विराज पाटील, शशि बिडकर, सुनिल पोवार, सरदार तिप्पे, अनिल पाटील, विराज ओतारी, राजू जाधव, रणजीत आयरेकर, शुभांगी पोवार, रिया पाटील, दिपाली शिंदे आदींचा सहभाग होता.टाळे काढल्यास याद राखाप्राधिकरणा’च्या अधिकाऱ्यांना कार्यालयातून बाहेर काढल्यानंतर पवार आणि देवणे यांनी कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी अधिकारी शिवराज पाटील यांना बोलवून टाळे काढल्यास याद राखा असा दमच दिला.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकारShiv Senaशिवसेना